शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

मक्याला तूर्त जीवदान; खरिपाच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 01:03 IST

पावसामुळे मोड फुटण्याच्या तयारीत आलेल्या खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला असून, काही तालुक्यांमध्ये झालेल्या पावसामुळे मक्यावर प्रादुर्भाव केलेल्या लष्करी अळ्यांचा नायनाट करण्यास हा पाऊस फायदेशीर ठरला आहे.

नाशिक : पावसामुळे मोड फुटण्याच्या तयारीत आलेल्या खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला असून, काही तालुक्यांमध्ये झालेल्या पावसामुळे मक्यावर प्रादुर्भाव केलेल्या लष्करी अळ्यांचा नायनाट करण्यास हा पाऊस फायदेशीर ठरला आहे. पावसाने पुन्हा उघडीप दिल्याने पेरण्यांचा खोळंबा कायम असून, पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यांमध्ये मात्र पेरण्यांचा वेग कमी आहे.जून महिना कोरडा गेल्यावर मान्सूनने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात हजेरी लावली. सिन्नर, येवला, चांदवड, नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा व दिंडोरी तालुक्याला झोडपून काढणाºया या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला. मात्र त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारली. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाºया इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकला अधूनमधून पाऊस कायम असला तरी, तेथील भात पिकासाठी तो पुरेसा नसल्यामुळे पेठ, इगतपुरी, सुरगाणा व इगतपुरी तालुक्यात १० ते ३० टक्केच पेरण्या होऊ शकल्या आहेत. येवला, मालेगाव, नांदगाव, सिन्नर या दुष्काळी तालुक्यात पहिल्याच पावसाने शेतकºयांच्या आशा पल्लवित होऊन त्यांनी सरासरी ८० टक्के पेरण्या पूर्ण केल्या, परंतु पावसाच्या किमान दहा, बारा दिवसांच्या दडीमुळे तेथील पिके धोक्यात आली होती. जमिनीखालून मोड आलेल्या पिकांना पाण्याची गरज असताना उलट उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे शेतकºयांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. मात्र गेल्या शनिवार, रविवारपासून सलग दोन दिवस पावसाने पुन्हा हजेरी दिल्यामुळे या पिकांना तूर्त जीवदान मिळाले आहे. या पावसामुळे अपुºया राहिलेल्या पेरण्या पूर्ण होणार असल्या तरी, अजूनही शेतकºयांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे.गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात जवळपास सर्वच पेरण्या आटोपल्या होत्या. त्यानंतर पावसाने दडी मारली होती. यंदा मात्र पावसाच्या आगमनावर पेरण्या पुढे सरकत असून, ६० टक्क्यावर थांबलेल्या पेरण्या गेल्या दोन दिवसांपासून वाढल्या आहेत. विशेष करून भात लागवडीला वेग आला असून, गेल्या आठवड्यात जेमतेम २८ टक्के भात लागवड झाली होती, ती आता ६० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. मका व बाजरीची पेरणी जवळपास आटोपली आहे.पावसामुळे लष्करी अळी नष्टजिल्ह्णात मक्यावर लष्करी अळीने केलेल्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांसमोर मोठे संकट उभे ठाकले असून, लष्करी अळीने पीक उद्ध्वस्त केल्यामुळे अनेक शेतकºयांनी शेतात पुन्हा ट्रॅक्टर फिरवून पीक नष्ट केले. परंतु कृषी खात्याच्या म्हणण्यानुसार गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या फटक्यामुळे मक्यावरील लष्करी अळींचा नायनाट होण्यास मदत झाली आहे. मक्याच्या पानांमध्ये, देठांवर असलेल्या अळ्यांना पावसाच्या पाण्यापासून धोका असून, त्यामुळे त्यांचा नायनाट व संक्रमण रोखले जाते.अशा झाल्या पेरण्याजिल्ह्णात खरिपाचे पाच लाख ७५ हजार ५८८ इतके लागवडीचे क्षेत्र असून, त्यापैकी तीन लाख ४४ हजार ९०१ हेक्टरवर म्हणजे ६० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सर्वाधिक पेरण्या दुष्काळी म्हणून गणल्या गेलेल्या येवला तालुक्यात १११ टक्के झाल्या आहेत. अन्य तालुक्यात पुढीलप्रमाणे पेरण्या करण्यात आल्या आहेत. (टक्केवारीनुसार)* मालेगाव- ८५* बागलाण- ३७* कळवण- ६०* देवळा- ६३* नांदगाव- ८६* सुरगाणा- २५* नाशिक- ४* त्र्यंबक- ५६* दिंडोरी- ११* इगतपुरी- २१* पेठ- ९* निफाड- ३८* सिन्नर- ६९* येवला- १११* चांदवड- ५८

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस