शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

रिमझिम पावसामुळे खरीप पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:54 IST

गेल्या पंधरवड्यापासून दडी मारून बसलेल्या वरुणराजाने दोन-तीन दिवसांपासून रिमझिम स्वरुपात हजेरी लावल्याने खरिपाच्या पिकांना तात्पुरते जीवदान मिळाले आहे. अक्षरश: होरपळून निघत असलेल्या आणि चारा म्हणून वापरता येईल अशी पिकांची अवस्था झाली होती.

मेशी : गेल्या पंधरवड्यापासून दडी मारून बसलेल्या वरुणराजाने दोन-तीन दिवसांपासून रिमझिम स्वरुपात हजेरी लावल्याने खरिपाच्या पिकांना तात्पुरते जीवदान मिळाले आहे. अक्षरश: होरपळून निघत असलेल्या आणि चारा म्हणून वापरता येईल अशी पिकांची अवस्था झाली होती.अशातच अचानक वातावरणात बदल होऊन सलग दोन-तीन दिवस रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे दमदार पाऊस सुरू होईल अशी बळीराजाची अपेक्षा आहे. खरिपाला जीवदान मिळाले असेल तरीसुद्धा बळीराजाची चिंता कायम आहे. निम्मा पावसाळा संपत आला असताना अजून जोरदार पाऊस झालाच नाही. त्यामुळे विहीर, नाले कोरडे आहेत. याशिवाय खरिपाबरोबरच आगामी रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस होत असताना देवळा तालुक्यातील पूर्व भागात मात्र पाऊस झाला नाही.या भागातील तीनही हंगामातील प्रमुख पीक कांदा आहे. अजूनही चांगला पाऊस नसल्याने कांदा लागवड लांबणीवर पडली आहे.चणकापूर धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे गिरणा नदीला पूर आला आहे ; मात्र पूर पाण्याचा नदीकाठच्या गावांना फायदा होईल. इतर गावांतील शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.पावसाळ्याच्या उरलेल्या दिवसात पाऊस झाला नाही तर आगामी काळात दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकºयांसह सगळ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. श्रावण महिना सुरू असल्याने नागरिकांना पाऊस येईल अशी आशा होती. पूर्वी श्रावण महिन्यात संततधार पावसाने नागरिक त्रस्त होत असे. पण आता मात्र परिस्थिती बदलली आहे. सध्या थोड्याफार प्रमाणात कांदा लागवड केली जाते.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस