शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यातून लेखकाची भूमिका प्रकटते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:57 IST

प्रत्येक लेखक हा वैयक्तिक अथवा सामाजिक अनुभवातून अथवा कल्पनातून लेखन करीत असतो. असे लिखाण करताना त्याच्यासमोर बहुधा समाजातील दु:खच अधिक असते. हे समाजातील वास्तव मांडताना लेखक एक भूमिका घेऊन लिहित असतो आणि जरी लिखाणापूर्वी लेखकाची भूमिका स्पष्ट नसली तरी लेखकाच्या साहित्यातून त्याची भूमिका प्रकट होत असते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले आहे.

नाशिक : प्रत्येक लेखक हा वैयक्तिक अथवा सामाजिक अनुभवातून अथवा कल्पनातून लेखन करीत असतो. असे लिखाण करताना त्याच्यासमोर बहुधा समाजातील दु:खच अधिक असते. हे समाजातील वास्तव मांडताना लेखक एक भूमिका घेऊन लिहित असतो आणि जरी लिखाणापूर्वी लेखकाची भूमिका स्पष्ट नसली तरी लेखकाच्या साहित्यातून त्याची भूमिका प्रकट होत असते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले आहे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात शुक्रवारी (दि. २३) सार्वजनिक वाचनालय नाशिकतर्फे १७८व्या वार्षिक समारंभानिमित्त लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते विविध वाङ््मय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्याध्यक्ष अ‍ॅड. अभिजित बगदे, शंकरराव बर्वे, जयप्रकाश जातेगावकर, प्रा. शंकर बोºहाडे, देवदत्त जोशी, डॉ. वेदश्री थिगळे, वसंत खैरनार, बी. जी वाघ आदी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, लेखकाने भूमिका घेऊन लिहावे की लिहू नये, याबाबत वाद आहेत. आपण स्वत: मात्र भूमिका घेऊन लिहिणारे लेखक आहोत. गेल्या पन्नास वर्षांपासून मराठी साहित्यात वास्तववादी लेखनाकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्वानुभवातून लिहिलेल्या लेख नाला वैयक्तिक म्हणावे की सामाजिक, याबाबतही मतभेद आहेत. मात्र, लेखकाच्या लेखनात त्याच्या भूमिकेचे प्रतिबिंब उमटायलाच हवे. समाजात जास्त प्रश्न असतील तेव्हा लेखकाला लिहिण्याची जास्त संधी असते कारण लेखक दु:खाची कहाणी सांगतो. आजची परिस्थिती माणूस म्हणून जगण्यासाठी कठीण आहे. यात लेखक दिलासा देऊ शकतो का, हा माझा प्रयत्न आहे. लेखकाने लोकांसाठी लिहिले पाहिजे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक नानासाहेब बोरस्ते यांनी केले. अहवाल वाचन प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी केले. सूत्रसंचालन कवी किशोर पाठक यांनी केले. अ‍ॅड. भानुदास शौचे यांनी आभार मानले.पुरस्कारार्थींचा गौरवसावानाच्या वार्षिक समारंभात नितीन रिंढे यांना ‘लीळा पुस्तकांच्या’ पुस्तकासाठी डॉ. वि. म. गोगटे स्मृती ललितेतर ग्रंथ पुरस्कार, डॉ. अनघा केसकर यांना ‘दान’पुस्तकासाठी डॉ. अ. वा. वर्टी कथालेखक पुरस्कार, कृष्णा पवार यांना ‘ओढ शाश्वत अनुभूतीची’ पुस्तकासाठी मु. ब. यंदे पुरस्कार, सुनील जाधव यांना ‘माझं घर’ पुस्तकासाठी पु. ना. पंडित पुरस्कार, हृषिकेश गुप्ते यांना ‘दंशकाल’ पुस्तकासाठी धनंजय कुलकर्णी पुरस्कार, राजीव पटेल यांना ‘लोकनाथ’ पुस्तकासाठी अशोक टिळक पुरस्कार, अनुराधा प्रभुदेसाई यांना ‘तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा सैनिक’ पुस्तकासाठी ग. वि. अकोलकर, तर मीना शेटे-संभू यांना ‘वैद्य, हकीम आणि डॉक्टर’ या पुस्तकासाठी स्वा. वि. दा. सावरकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.जांभेकर पुरस्कारसार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्यातर्फे शनिवारी (दि. २४) सुनील चावके यांना बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. लोकमत वृत्तपत्र समूहाचे राजकीय संपादक सुरेश भटेवरा यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून, या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सावानातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक