शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

साहित्यातून लेखकाची भूमिका प्रकटते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:57 IST

प्रत्येक लेखक हा वैयक्तिक अथवा सामाजिक अनुभवातून अथवा कल्पनातून लेखन करीत असतो. असे लिखाण करताना त्याच्यासमोर बहुधा समाजातील दु:खच अधिक असते. हे समाजातील वास्तव मांडताना लेखक एक भूमिका घेऊन लिहित असतो आणि जरी लिखाणापूर्वी लेखकाची भूमिका स्पष्ट नसली तरी लेखकाच्या साहित्यातून त्याची भूमिका प्रकट होत असते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले आहे.

नाशिक : प्रत्येक लेखक हा वैयक्तिक अथवा सामाजिक अनुभवातून अथवा कल्पनातून लेखन करीत असतो. असे लिखाण करताना त्याच्यासमोर बहुधा समाजातील दु:खच अधिक असते. हे समाजातील वास्तव मांडताना लेखक एक भूमिका घेऊन लिहित असतो आणि जरी लिखाणापूर्वी लेखकाची भूमिका स्पष्ट नसली तरी लेखकाच्या साहित्यातून त्याची भूमिका प्रकट होत असते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले आहे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात शुक्रवारी (दि. २३) सार्वजनिक वाचनालय नाशिकतर्फे १७८व्या वार्षिक समारंभानिमित्त लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते विविध वाङ््मय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्याध्यक्ष अ‍ॅड. अभिजित बगदे, शंकरराव बर्वे, जयप्रकाश जातेगावकर, प्रा. शंकर बोºहाडे, देवदत्त जोशी, डॉ. वेदश्री थिगळे, वसंत खैरनार, बी. जी वाघ आदी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, लेखकाने भूमिका घेऊन लिहावे की लिहू नये, याबाबत वाद आहेत. आपण स्वत: मात्र भूमिका घेऊन लिहिणारे लेखक आहोत. गेल्या पन्नास वर्षांपासून मराठी साहित्यात वास्तववादी लेखनाकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्वानुभवातून लिहिलेल्या लेख नाला वैयक्तिक म्हणावे की सामाजिक, याबाबतही मतभेद आहेत. मात्र, लेखकाच्या लेखनात त्याच्या भूमिकेचे प्रतिबिंब उमटायलाच हवे. समाजात जास्त प्रश्न असतील तेव्हा लेखकाला लिहिण्याची जास्त संधी असते कारण लेखक दु:खाची कहाणी सांगतो. आजची परिस्थिती माणूस म्हणून जगण्यासाठी कठीण आहे. यात लेखक दिलासा देऊ शकतो का, हा माझा प्रयत्न आहे. लेखकाने लोकांसाठी लिहिले पाहिजे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक नानासाहेब बोरस्ते यांनी केले. अहवाल वाचन प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी केले. सूत्रसंचालन कवी किशोर पाठक यांनी केले. अ‍ॅड. भानुदास शौचे यांनी आभार मानले.पुरस्कारार्थींचा गौरवसावानाच्या वार्षिक समारंभात नितीन रिंढे यांना ‘लीळा पुस्तकांच्या’ पुस्तकासाठी डॉ. वि. म. गोगटे स्मृती ललितेतर ग्रंथ पुरस्कार, डॉ. अनघा केसकर यांना ‘दान’पुस्तकासाठी डॉ. अ. वा. वर्टी कथालेखक पुरस्कार, कृष्णा पवार यांना ‘ओढ शाश्वत अनुभूतीची’ पुस्तकासाठी मु. ब. यंदे पुरस्कार, सुनील जाधव यांना ‘माझं घर’ पुस्तकासाठी पु. ना. पंडित पुरस्कार, हृषिकेश गुप्ते यांना ‘दंशकाल’ पुस्तकासाठी धनंजय कुलकर्णी पुरस्कार, राजीव पटेल यांना ‘लोकनाथ’ पुस्तकासाठी अशोक टिळक पुरस्कार, अनुराधा प्रभुदेसाई यांना ‘तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा सैनिक’ पुस्तकासाठी ग. वि. अकोलकर, तर मीना शेटे-संभू यांना ‘वैद्य, हकीम आणि डॉक्टर’ या पुस्तकासाठी स्वा. वि. दा. सावरकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.जांभेकर पुरस्कारसार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्यातर्फे शनिवारी (दि. २४) सुनील चावके यांना बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. लोकमत वृत्तपत्र समूहाचे राजकीय संपादक सुरेश भटेवरा यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून, या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सावानातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक