शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

साहित्यातून लेखकाची भूमिका प्रकटते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:57 IST

प्रत्येक लेखक हा वैयक्तिक अथवा सामाजिक अनुभवातून अथवा कल्पनातून लेखन करीत असतो. असे लिखाण करताना त्याच्यासमोर बहुधा समाजातील दु:खच अधिक असते. हे समाजातील वास्तव मांडताना लेखक एक भूमिका घेऊन लिहित असतो आणि जरी लिखाणापूर्वी लेखकाची भूमिका स्पष्ट नसली तरी लेखकाच्या साहित्यातून त्याची भूमिका प्रकट होत असते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले आहे.

नाशिक : प्रत्येक लेखक हा वैयक्तिक अथवा सामाजिक अनुभवातून अथवा कल्पनातून लेखन करीत असतो. असे लिखाण करताना त्याच्यासमोर बहुधा समाजातील दु:खच अधिक असते. हे समाजातील वास्तव मांडताना लेखक एक भूमिका घेऊन लिहित असतो आणि जरी लिखाणापूर्वी लेखकाची भूमिका स्पष्ट नसली तरी लेखकाच्या साहित्यातून त्याची भूमिका प्रकट होत असते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले आहे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात शुक्रवारी (दि. २३) सार्वजनिक वाचनालय नाशिकतर्फे १७८व्या वार्षिक समारंभानिमित्त लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते विविध वाङ््मय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्याध्यक्ष अ‍ॅड. अभिजित बगदे, शंकरराव बर्वे, जयप्रकाश जातेगावकर, प्रा. शंकर बोºहाडे, देवदत्त जोशी, डॉ. वेदश्री थिगळे, वसंत खैरनार, बी. जी वाघ आदी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, लेखकाने भूमिका घेऊन लिहावे की लिहू नये, याबाबत वाद आहेत. आपण स्वत: मात्र भूमिका घेऊन लिहिणारे लेखक आहोत. गेल्या पन्नास वर्षांपासून मराठी साहित्यात वास्तववादी लेखनाकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्वानुभवातून लिहिलेल्या लेख नाला वैयक्तिक म्हणावे की सामाजिक, याबाबतही मतभेद आहेत. मात्र, लेखकाच्या लेखनात त्याच्या भूमिकेचे प्रतिबिंब उमटायलाच हवे. समाजात जास्त प्रश्न असतील तेव्हा लेखकाला लिहिण्याची जास्त संधी असते कारण लेखक दु:खाची कहाणी सांगतो. आजची परिस्थिती माणूस म्हणून जगण्यासाठी कठीण आहे. यात लेखक दिलासा देऊ शकतो का, हा माझा प्रयत्न आहे. लेखकाने लोकांसाठी लिहिले पाहिजे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक नानासाहेब बोरस्ते यांनी केले. अहवाल वाचन प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी केले. सूत्रसंचालन कवी किशोर पाठक यांनी केले. अ‍ॅड. भानुदास शौचे यांनी आभार मानले.पुरस्कारार्थींचा गौरवसावानाच्या वार्षिक समारंभात नितीन रिंढे यांना ‘लीळा पुस्तकांच्या’ पुस्तकासाठी डॉ. वि. म. गोगटे स्मृती ललितेतर ग्रंथ पुरस्कार, डॉ. अनघा केसकर यांना ‘दान’पुस्तकासाठी डॉ. अ. वा. वर्टी कथालेखक पुरस्कार, कृष्णा पवार यांना ‘ओढ शाश्वत अनुभूतीची’ पुस्तकासाठी मु. ब. यंदे पुरस्कार, सुनील जाधव यांना ‘माझं घर’ पुस्तकासाठी पु. ना. पंडित पुरस्कार, हृषिकेश गुप्ते यांना ‘दंशकाल’ पुस्तकासाठी धनंजय कुलकर्णी पुरस्कार, राजीव पटेल यांना ‘लोकनाथ’ पुस्तकासाठी अशोक टिळक पुरस्कार, अनुराधा प्रभुदेसाई यांना ‘तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा सैनिक’ पुस्तकासाठी ग. वि. अकोलकर, तर मीना शेटे-संभू यांना ‘वैद्य, हकीम आणि डॉक्टर’ या पुस्तकासाठी स्वा. वि. दा. सावरकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.जांभेकर पुरस्कारसार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्यातर्फे शनिवारी (दि. २४) सुनील चावके यांना बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. लोकमत वृत्तपत्र समूहाचे राजकीय संपादक सुरेश भटेवरा यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून, या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सावानातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक