शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

इंदिराजींच्या दोन सभा ऐकण्याचा योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 01:13 IST

आपल्या देशात लोकशाही असल्याने वेगवेगळ्या निवडणुका वेळोवेळी होतच असतात. गेल्या ५० ते ६० वर्षांत मी अनेक निवडणुका बघितल्या.

ठळक मुद्देआठवणीतील निवडणूक

आपल्या देशात लोकशाही असल्याने वेगवेगळ्या निवडणुका वेळोवेळी होतच असतात. गेल्या ५० ते ६० वर्षांत मी अनेक निवडणुका बघितल्या. नोकरी करीत असताना प्रत्यक्ष राजकारणात सहभागी होता आले नाही. वडील मात्र राजकारणात होते; मला राजकारण विषयाची आवड होती; परंतु पूर्वीचे राजकारण आणि आताचे राजकारण यात खूप फरक आहे. पूर्वीच्या काळात लोक नि:स्वार्थी होते. आता पैशाशिवाय कोणीही काम करीत नाही. सध्याच्या काळात प्रचार सभेला पैसे देऊन माणसे आणली जातात. मोठ्या राजकीय सभेला ६० टक्के लोक हे झोपडपट्टीमधून ५०० रुपये रोज देऊन आणले जातात. पूर्वी मात्र असे नव्हते. साधारणत: ४० वर्षांपूर्वीच्या काळातील एक निवडणूक आठवते. त्यावेळी कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते हे नि:स्वार्थीपणे प्रचार करताना दिसत. तेव्हा स्व. इंदिरा गांधी यांची धुळे येथे जाहीर सभा होती. आम्ही सर्व मित्र मिळून त्या सभेला गेलो होतो. तेथील प्रचार सभा आटोपून त्या मोटारीनेच नाशिककडे सभेसाठी रवाना झाल्या. तेव्हा दळणवळणाची साधने फारशी नव्हती. महामार्गदेखील रुंद नव्हते; परंतु इंदिराजी साधारणत: अडीच तासात नाशिकला पोहोचल्या. रस्त्यावरील अनेक गावांमधील लोक रस्त्याच्या कडेला उभे राहून स्वागत करीत होते. आम्हीदेखील मिळेल त्या वाहनाने नाशिककडे निघालो. नाशिकलादेखील इंदिराजींची जाहीर सभा झाली. लोकांनी सभेला प्रचंड गर्दी केली होती. लोक घोषणा देत होते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसत होते. एकच दिवसात इंदिरा गांधींच्या दोन सभांमधील भाषणे ऐकण्याचा योग आला होता. तेव्हा टीव्ही वगैरेंसारखी साधने नव्हती. आता मात्र एकच भाषण १० वेळा ऐकता येते. आताचे पुढारी प्रचाराला येतात; पण आपल्या वाहनामधून खाली उतरतदेखील नाहीत. पूर्वी नेते आणि कार्यकर्ते दोन्ही जमिनीवर होते. आता दोघेही गाड्यांमध्ये असतात. जनतेचे प्रश्न मात्र कायम आहेत.रमेश नागरे

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक