शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

श्ोतकऱ्यांनो, घाबरून जाऊ नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 01:04 IST

कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदी केली असली तरी, त्याचा बाजारभावावर विशेष परिणाम जाणवणार नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरून न जाता टप्याटप्याने कांदा विक्रीसाठी बाजारात आणावा, असे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी आणि काही व्यापाºयांनी व्यक्त केले आहे.

नाशिक : कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदी केली असली तरी, त्याचा बाजारभावावर विशेष परिणाम जाणवणार नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरून न जाता टप्याटप्याने कांदा विक्रीसाठी बाजारात आणावा, असे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी आणि काही व्यापाºयांनी व्यक्त केले आहे.मागील काही दिवसांपासून देशभरात कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने तब्बल चार वर्षांनंतर कांदा उत्पादकांना कांद्यापासून बºयापैकी आर्थिक उत्पन्न मिळू लागले आहे. घाऊक बाजारात दर वाढल्याने किरकोळ बाजारातही कांद्याने उच्चांकी दर गाठला आहे. परिणामी केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असली तरी, केंद्र शासनाचा हा निर्णय म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणण्याचा प्रकार असल्याचे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दर वाढल्याने केंद्र शासनाने प्रथम कांदा निर्यात किमान मूल्य वाढविले, मात्र तरीही दर कमी झाले नाहीत. यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे कांद्याचे नुकसान झाले आहे. परिणामी कांद्याची मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाल्याने नैसर्गिकरीत्या कांद्याच्या दरात वाढ झाली आहे, असे मत सह्याद्री फार्मस् प्रोड्युस कंपनीचे संचालक विलास शिंदे यांनी व्यक्त केले. सध्या स्थानिक बाजारातच मागणी अधिक आहे.दक्षिणेकडील राज्यांमधील कांदा अद्याप बाजारात आलेला नाही. त्याचबरोबर किमान निर्यातमूल्यही वाढलेले असल्याने कांद्याची निर्यात तशीही एक-दोन टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन फारसे काही साध्य होईल असे दिसत नाही. या निर्णयामुळे केवळ दबाव टाकण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यातून कांदा उत्पादकांबरोबरच आपल्या निर्यातीचेही नुकसान होणार आहे. नवीन कांदा बाजारात येण्यासाठी अद्याप महिनाभराचा अवधी आहे.निर्यात बंदी केल्याने लगेचच कांद्याचे दर खाली येतील असे होणार नाही. त्यामुळे शेतकºयांनी घाबरून न जाता आपल्याकडील कांदा टप्याटप्याने बाजारात विक्रीसाठी आणावा, असा सल्ला विलास शिंदे यांनी दिला आहे.शेतकºयांकडेही लक्ष द्यावेसध्या बाजारात नवीन कांदा आलेला नाही. जो कांदा देशात उपलब्ध आहे तो आपल्या देशातील नागरिकांना पुरवता यावा या हेतूने केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. शहरी भागातील ग्राहकांकडे लक्ष देताना शेतकºयांचे नुकसान होणार नाही, याकडेही शासनाने लक्ष द्यायला हवे. सध्या देशातून होणारी कांद्याची निर्यात नगण्य आहे. मात्र या निर्णयाचा नागरिकांवर मानसिक परिणाम होऊ शकेल, असे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका कांदा व्यापाºयाने सांगितले.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र