शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

श्ोतकऱ्यांनो, घाबरून जाऊ नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 01:04 IST

कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदी केली असली तरी, त्याचा बाजारभावावर विशेष परिणाम जाणवणार नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरून न जाता टप्याटप्याने कांदा विक्रीसाठी बाजारात आणावा, असे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी आणि काही व्यापाºयांनी व्यक्त केले आहे.

नाशिक : कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदी केली असली तरी, त्याचा बाजारभावावर विशेष परिणाम जाणवणार नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरून न जाता टप्याटप्याने कांदा विक्रीसाठी बाजारात आणावा, असे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी आणि काही व्यापाºयांनी व्यक्त केले आहे.मागील काही दिवसांपासून देशभरात कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने तब्बल चार वर्षांनंतर कांदा उत्पादकांना कांद्यापासून बºयापैकी आर्थिक उत्पन्न मिळू लागले आहे. घाऊक बाजारात दर वाढल्याने किरकोळ बाजारातही कांद्याने उच्चांकी दर गाठला आहे. परिणामी केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असली तरी, केंद्र शासनाचा हा निर्णय म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणण्याचा प्रकार असल्याचे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दर वाढल्याने केंद्र शासनाने प्रथम कांदा निर्यात किमान मूल्य वाढविले, मात्र तरीही दर कमी झाले नाहीत. यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे कांद्याचे नुकसान झाले आहे. परिणामी कांद्याची मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाल्याने नैसर्गिकरीत्या कांद्याच्या दरात वाढ झाली आहे, असे मत सह्याद्री फार्मस् प्रोड्युस कंपनीचे संचालक विलास शिंदे यांनी व्यक्त केले. सध्या स्थानिक बाजारातच मागणी अधिक आहे.दक्षिणेकडील राज्यांमधील कांदा अद्याप बाजारात आलेला नाही. त्याचबरोबर किमान निर्यातमूल्यही वाढलेले असल्याने कांद्याची निर्यात तशीही एक-दोन टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन फारसे काही साध्य होईल असे दिसत नाही. या निर्णयामुळे केवळ दबाव टाकण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यातून कांदा उत्पादकांबरोबरच आपल्या निर्यातीचेही नुकसान होणार आहे. नवीन कांदा बाजारात येण्यासाठी अद्याप महिनाभराचा अवधी आहे.निर्यात बंदी केल्याने लगेचच कांद्याचे दर खाली येतील असे होणार नाही. त्यामुळे शेतकºयांनी घाबरून न जाता आपल्याकडील कांदा टप्याटप्याने बाजारात विक्रीसाठी आणावा, असा सल्ला विलास शिंदे यांनी दिला आहे.शेतकºयांकडेही लक्ष द्यावेसध्या बाजारात नवीन कांदा आलेला नाही. जो कांदा देशात उपलब्ध आहे तो आपल्या देशातील नागरिकांना पुरवता यावा या हेतूने केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. शहरी भागातील ग्राहकांकडे लक्ष देताना शेतकºयांचे नुकसान होणार नाही, याकडेही शासनाने लक्ष द्यायला हवे. सध्या देशातून होणारी कांद्याची निर्यात नगण्य आहे. मात्र या निर्णयाचा नागरिकांवर मानसिक परिणाम होऊ शकेल, असे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका कांदा व्यापाºयाने सांगितले.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र