शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

राज्यात मद्य दुकानांना परवानगी, मग मंदिरांना का नाही? रामसनेहीदास महाराजांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 20:02 IST

नाशिक : लॉकडाऊनमध्ये आता शिथिलता आल्याने अनेक उद्योग व्यवसाय सुरू झाले आहेत. अगदी मदिरालये पण सुरू झाले असले तरी मंदिरे मात्र का खुली करू दिली जात नाही? असा सवाल नाशिकच्या बडा लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत रामसनेहीदास महाराज यांनी केला आहे. सध्या मंदिरे, मठ आणि अन्य सर्वच धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना हे मत व्यक्त केले.

ठळक मुद्देपरंपरा खंडित करू नकासुरक्षा नियमांचे पालन करावे

नाशिक : लॉकडाऊनमध्ये आता शिथिलता आल्याने अनेक उद्योग व्यवसाय सुरू झाले आहेत. अगदी मदिरालये पण सुरू झाले असले तरी मंदिरे मात्र का खुली करू दिली जात नाही? असा सवाल नाशिकच्या बडा लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत रामसनेहीदास महाराज यांनी केला आहे. सध्या मंदिरे, मठ आणि अन्य सर्वच धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना हे मत व्यक्त केले.

प्रश्न- सध्या मंदिरे उघडण्यासाठी दबाव वाढला आहे. त्याविषयी काय सांगाल?महंत- कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी शासनाने लॉकडाऊन लागू करून सर्व काही बंद केले त्यात मंदिरे आणि अन्य धर्मीयांच्या धार्मिक स्थळांचादेखील समावेश होता. मात्र, आता लॉकडाऊनचे निर्बंध बऱ्यापैकी शिथिल होत आहेत. शासनाला महसूल हवा म्हणून मदिरालये सुरू करण्यात आली आहेत, मग आता मंदिरे सुरू करण्याची मागणी पुढे आली तर गैर काय? नागरिकांची श्रद्धा असल्याने सर्व धार्मिक स्थळे आता खुली करायला हवी. शासनाच्या आदेशानुसार आरोग्य सुरक्षा नियमांचे पालन धार्मिक संस्था करतीलच, परंतु भाविकदेखील करतील, त्यामुळे आता मंदिरे आणि अन्य धर्मीयांची धार्मिक स्थळे सुरू करण्याची गरज आहे. राज्यात शिवसेनेसारख्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री असल्याने त्यांनी मुळातच याचा प्राधान्याने विचार करायला हवा.

प्रश्न- सध्या अनेक ठिकाणच्या यात्रादेखील बंद करण्यात येत आहेत, त्यामुळे मंदिरे उघडण्यास परवानगी मिळेल का?महंत-हा भाविकांच्या श्रद्धेचा तसेच सनातन धर्माचा आणि अन्य धर्मांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. पुरी येथील यात्रेवरदेखील निर्बंध घालण्यात आले; परंतु ती यात्रा पार पडली. आता गणेशोत्सवावर निर्बंध घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर दुर्गापूजादेखील आहे. अशाप्रकारे सनातन धर्माच्या परंपरा खंडित करणे अत्यंत चुकीचे आहे. यंदा कोरोनाचे कारण देऊन बंदी घातली जाईल आणि पुढील वर्षी आणखी नवा मुद्दा उपस्थित करून गेल्यावर्षी उत्सव झाला नाही म्हणून यंदाही उत्सव करू नका, असे सांगितले जाईल. अशा परंपरा खंडित झाल्या तर सनातन धर्मच लोप पावेल. शासनाने नियम, मर्यादा काहीही करावे मात्र परंपरा खंडित करू नये, मशिदी, गुरुद्वारा सर्वच सुरू करावे अशी अपेक्षा आहे.

प्रश्न- मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळी नागरिक नियमांचे पालन करतील काय?महंत- अनेक मंदिरांमध्ये आजही अंतर्गत व्यवस्था सुरू आहे. तेथे सुरक्षित अंतर, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून कामकाज चालते. काही खुल्या मंदिरात एक दोन भाविक येतात; परंतु तेही सुरक्षा नियमांचे पालन करतात. मंदिरे खुली करताना चार ते पाच नागरिकांनाच प्रवेश, मास्क आवश्यक असे नियम केले तरी चालू शकतात. मुळाच आता बाहेरगावाहून भाविक येण्याचा प्रश्न नाही आणि स्थानिक स्तरावरील नागरिक फार मोठ्या संख्येने येतील असे नाही. त्यामुळे मंदिरे आणि सर्वच धर्मीयांची धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबत परवानगी दिली पाहिजे.

मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याReligious Placesधार्मिक स्थळेTempleमंदिरGovernmentसरकार