शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण-शहरी मतदारांमधील दुहीचा युतीला फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:38 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकालात शेतमालाला अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात शेतकरी संपासारखी ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकालात शेतमालाला अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात शेतकरी संपासारखी आंदोलने झाली. त्यातून शहरवासीयांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र आंदोलनानंतरही शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे आपोआपच शहरवासीयांना स्वस्तात भाजीपाला मिळाला. या काळात शहरी आणि ग्रामीण अशी दुही निर्माण झाली होती. त्याचे प्रतिबिंब या निवडणुकीत दिसून आले. शहरी मतदारांनी युतीला दिलेली साथ दिली असून, नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी मतदारांमधील या दुहीचा फायदा युतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी निश्चितच फायदा झाला आहे.सतराव्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी आणि शेतीचे प्रश्न महत्त्वाचे होते. परंतु, देश संरक्षणाच्या मुद्द्यांसमोर मतदारांनी सर्व प्रश्न बाजूला ठेवून देशाला भक्कम सरकार देण्यासाठी मोदींच्या नेतृत्वाला पसंती दिली. शिवाय राज्य सरकारने दिलेल्या सशर्त कर्जमाफीचा काही शेतकऱ्यांना लाभ मिळाला. शिवाय शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी न देता त्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचा सरकारचा विचारही अनेक शेतकºयांना पटला. त्यामुळे देशाचे संरक्षण आणि भक्कम सरकार देण्याची क्षमता याचा विचार करून ग्रामीण भागातून मतदाने झाल्याचे दिसून आले. यात एकीकडे शहरी ग्रामीण भागातील दुहीमुळे आणि देश संरक्षणाच्या मुद्द्यावर सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदांसह देवळाली छावनी परिषद क्षेत्र आणि नाशिक महानगरपालिक  क्षेत्रातील शहरी मतदारांनी युतीला पसंती दिलेली असताना दुसरीकडे ग्रामीण भागातही मोदींच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्वास ठेवल्याचे दिसून आले. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभक्ती आणि राष्ट्रवादाचा मुद्दा उपस्थित करून इतर प्रश्नांकडून मतदारांचे लक्ष वळवले. शेतकºयांच्या बाबतीतही हेच घडले. त्यांनीही देश संरक्षणाच्या मुद्द्यावर मोदी सरकारला पसंती दिल्याचे दिसून आले. ग्रामीण भागात शेतीवर उदर निर्वाह करणाºया लोकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. अनेक शेतकरी कुटुंबातील तरुण रोजगारासाठी शहराकडे धाव घेत आहे. या तरुणांनाही रोजगार आणि शेतीच्या प्रश्नांपेक्षा देश भक्ती आणि देशप्रेम हे मुद्दे अधिक भावल्याने तरुणांनी मोंदीच्या आवाहानाला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. शिवाय राज्यात आणि देशभरात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधात विरोधक एकत्रित येऊ शकले नाही. त्यामुळे विखुरलेल्या विरोधकांना या निवडणुकीत एनडीएला भक्कम पर्याय देण्यात अपयश आले. हीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यातही दिसून आली. युतीच्या उमेदवारांविरोधात आघाडीतील घटकपक्षांमध्ये एकसंघता दिसून आली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते पूर्ण ताकदीने एकत्र आल्याचे सुरुवातीपासूनच दिसले नाही. शेतकरी व ग्रामीण मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी आश्वासक संवाद साधण्यात आघाडीला अपयश आले.तानाजी गायधनी

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालagricultureशेतीFarmerशेतकरीnashik-pcनाशिक