शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

होऊ आम्ही नीतिवंत.. कलागुणी बुद्धिवंत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 21:34 IST

वडनेर : मालेगाव तालुक्यातील काटवण परिसरात चांगला पाऊस झाल्याने पेरणीची कामे जोरात सुरू आहेत. आपल्या शेतात रब्बीच्या पेरणीत मग्न असलेल्या शेतकर्यास आपल्या मुलीने उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातल्याची माहिती मिळते अन् आभाळच ठेंगणं झाल्याचा आभास होतो.

ठळक मुद्देखाकुर्डी येथील जयश्री ठाकरे, पाटोळेचा गणेश खताळेची उपजिल्हाधिकारीपदी भरारी

लोकमत न्यूज नेटवर्कवडनेर : मालेगाव तालुक्यातील काटवण परिसरात चांगला पाऊस झाल्याने पेरणीची कामे जोरात सुरू आहेत. आपल्या शेतात रब्बीच्या पेरणीत मग्न असलेल्या शेतकर्यास आपल्या मुलीने उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातल्याची माहिती मिळते अन् आभाळच ठेंगणं झाल्याचा आभास होतो.हे बोलके चित्र आहे मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी गावातील आदर्श शेतकरी म्हणून परिचित असलेल्या सुरेश शिवाजी ठाकरे यांच्या घरचे. भूमिकन्या डॉ. जयश्री ठाकरे यांनी उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे. या निकालाने तालुक्याला सुखद धक्का दिला आहे.डॉ. जयश्री या ओबीसी संवर्गातून राज्यातून मुलींमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. जयश्रीने प्राथमिक शिक्षण अंबासनच्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतून केल्यानंतर आपल्या प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर नवोदय परीक्षा पास करत माध्यमिक शिक्षण दिंडोरी(नाशिक) येथील नवोदय विद्यालयात पूर्ण केले आहे. तर पुढील वैद्यकीय शिक्षण बीएएमएस सावंतवाडी जि. रत्नागिरी येथे पूर्ण केले. याआधी 2017 मध्ये राज्य लोकसेवा आयोगामार्फत त्यांची मुंबई मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून नियुक्त झाली होती. त्याचे प्रशिक्षण सुरू आहे. यामध्येच ही नवी आनंदाची बातमी मिळाली आहे.

सिन्नर : विडी वळण्याचे काम करणारी आई आणि शेती करणारे वडील, आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची, शिवाय दुष्काळ पाचवीला पुजलेला. अशा बिकट परिस्थितीतून दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मार्ग काढत जिद्द, चिकाटी आणि अभ्यास या त्रिसुत्रीचा अवलंब करत तालुक्यातील पाटोळे गावचा गणेश तुकाराम खताळे याने उपजिल्हाधिकारी पदावर यशाची मोहर उमटवली आहे.पाटोळे गावासह तालुक्याच्या नावलौकीकात मानाचा तुरा खोवला आहे. राज्याच्या गुणवत्ता यादीत त्यांनी 17 वे स्थान पटकाविले असून इतर मागास प्रवर्गात ते राज्यात दुसर्याक्र मांकाने उत्तीर्ण झाला आहे. गणेश यांनी आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही अहोरात्र कष्ट उपसत उच्च दर्जाचे शिक्षण घेतले. गणेशचे प्राथमिक शिक्षण पाटोळे येथील जिल्हा परिषद शाळेत झाले, माध्यमिक शिक्षण मनेगाव येथील नूतन जवाहर विद्यालयात तर बारावी सायन्स पर्यंतचे शिक्षण सिन्नर महाविद्यालयात झाले. त्यानंतर नाशिकच्या के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनिअरींगची पदवी संपादन केली. त्यानंतर रेंज फॉरेस्ट आॅफिसर, 2017 साली कक्ष अधिकारी पदावर यश संपादन केले. सध्या ते मंत्रालयात कक्ष अधिकारी असतानाही हे यश मिळविले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी