शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

होऊ आम्ही नीतिवंत.. कलागुणी बुद्धिवंत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 21:34 IST

वडनेर : मालेगाव तालुक्यातील काटवण परिसरात चांगला पाऊस झाल्याने पेरणीची कामे जोरात सुरू आहेत. आपल्या शेतात रब्बीच्या पेरणीत मग्न असलेल्या शेतकर्यास आपल्या मुलीने उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातल्याची माहिती मिळते अन् आभाळच ठेंगणं झाल्याचा आभास होतो.

ठळक मुद्देखाकुर्डी येथील जयश्री ठाकरे, पाटोळेचा गणेश खताळेची उपजिल्हाधिकारीपदी भरारी

लोकमत न्यूज नेटवर्कवडनेर : मालेगाव तालुक्यातील काटवण परिसरात चांगला पाऊस झाल्याने पेरणीची कामे जोरात सुरू आहेत. आपल्या शेतात रब्बीच्या पेरणीत मग्न असलेल्या शेतकर्यास आपल्या मुलीने उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातल्याची माहिती मिळते अन् आभाळच ठेंगणं झाल्याचा आभास होतो.हे बोलके चित्र आहे मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी गावातील आदर्श शेतकरी म्हणून परिचित असलेल्या सुरेश शिवाजी ठाकरे यांच्या घरचे. भूमिकन्या डॉ. जयश्री ठाकरे यांनी उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे. या निकालाने तालुक्याला सुखद धक्का दिला आहे.डॉ. जयश्री या ओबीसी संवर्गातून राज्यातून मुलींमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. जयश्रीने प्राथमिक शिक्षण अंबासनच्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतून केल्यानंतर आपल्या प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर नवोदय परीक्षा पास करत माध्यमिक शिक्षण दिंडोरी(नाशिक) येथील नवोदय विद्यालयात पूर्ण केले आहे. तर पुढील वैद्यकीय शिक्षण बीएएमएस सावंतवाडी जि. रत्नागिरी येथे पूर्ण केले. याआधी 2017 मध्ये राज्य लोकसेवा आयोगामार्फत त्यांची मुंबई मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून नियुक्त झाली होती. त्याचे प्रशिक्षण सुरू आहे. यामध्येच ही नवी आनंदाची बातमी मिळाली आहे.

सिन्नर : विडी वळण्याचे काम करणारी आई आणि शेती करणारे वडील, आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची, शिवाय दुष्काळ पाचवीला पुजलेला. अशा बिकट परिस्थितीतून दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मार्ग काढत जिद्द, चिकाटी आणि अभ्यास या त्रिसुत्रीचा अवलंब करत तालुक्यातील पाटोळे गावचा गणेश तुकाराम खताळे याने उपजिल्हाधिकारी पदावर यशाची मोहर उमटवली आहे.पाटोळे गावासह तालुक्याच्या नावलौकीकात मानाचा तुरा खोवला आहे. राज्याच्या गुणवत्ता यादीत त्यांनी 17 वे स्थान पटकाविले असून इतर मागास प्रवर्गात ते राज्यात दुसर्याक्र मांकाने उत्तीर्ण झाला आहे. गणेश यांनी आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही अहोरात्र कष्ट उपसत उच्च दर्जाचे शिक्षण घेतले. गणेशचे प्राथमिक शिक्षण पाटोळे येथील जिल्हा परिषद शाळेत झाले, माध्यमिक शिक्षण मनेगाव येथील नूतन जवाहर विद्यालयात तर बारावी सायन्स पर्यंतचे शिक्षण सिन्नर महाविद्यालयात झाले. त्यानंतर नाशिकच्या के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनिअरींगची पदवी संपादन केली. त्यानंतर रेंज फॉरेस्ट आॅफिसर, 2017 साली कक्ष अधिकारी पदावर यश संपादन केले. सध्या ते मंत्रालयात कक्ष अधिकारी असतानाही हे यश मिळविले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी