शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीच्या तोंडावर डाळी महागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:04 IST

नाशिक : सणासुदीच्या काळात डाळींचे भाव वधारल्याने गृहिणींमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला असून, महागाईची झळ स्वयंपाकघरापर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे बाजारात मुगाची आवक सुरू झाली असतानाही मूगडाळीच्या किमती वधारल्या आहेत. तसेच हरभराडाळ आणि तूर डाळींच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने येत्या काळात डाळींच्या किमती आणखी भडकण्याच्या भीतीने ...

नाशिक : सणासुदीच्या काळात डाळींचे भाव वधारल्याने गृहिणींमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला असून, महागाईची झळ स्वयंपाकघरापर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे बाजारात मुगाची आवक सुरू झाली असतानाही मूगडाळीच्या किमती वधारल्या आहेत. तसेच हरभराडाळ आणि तूर डाळींच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने येत्या काळात डाळींच्या किमती आणखी भडकण्याच्या भीतीने स्वयंपाकघरातील बजेटचा समतोल राखण्याचे गृहिणींसमोर आव्हान निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी संपूर्ण देशभरात डाळींचे भाव गगनाला भिडल्यामुळे सामान्यांच्या जीवनाचा आधार असणाºया डाळी ताटाबाहेरही गेल्या होत्या. यावर्षीही डाळींचे भाव वधारण्यास सुरुवात झाली असून, गेल्या पंधरवड्यात डाळींच्या किमतींमध्ये सुमारे १० ते १२ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्यावर्षाप्रमाणेच यंदाही डाळींच्या किमती कडाडण्याची भीती ग्राहकांमध्ये निर्माण झाली आहे.  ही संधी साधून डाळींचा हंगामी व्यापार करणाºया काळ्याबाजारींकडून डाळींची साठेबाजी होण्याची शक्यता व्यक्त होत असून सरकारने सुरुवातीपासूनच साठेबाजांविरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. गेल्या वर्षी डाळींच्या विक्रमी दरवाढीमुळे शहरासह संपूर्ण देशवासीयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचे चित्र तत्कालीन परिस्थितीत पहायला मिळाले. ही भाववाढ डाळींची आवक घटल्यामुळे नाही, तर साठेबाजीमुळे झाल्याचा आरोप झाला. त्यानंतर सरकाने सर्व राज्य सरकारांना साठेबाजांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु, यावर्षी सरकाने सुरुवातीपासूनच खबरदारीची भूमिका घेण्याची गरज ग्राहक आणि व्यापारी वर्गातूनही व्यक्त होत आहे.किमती उतरल्यास ग्राहकांना फायदा नाहीनाशिकमध्ये राजस्थान, इंदूर, लातूर, सोलापूर, बार्शी, जळगाव, अकोला, अकोट या भागातून प्रामुख्याने डाळींचा पुरवठा होतो. यात तूरडाळीसोबतच मूग, उडीद, मसूर व चणाडाळीचे प्रमाण मोठे आहे. डाळींच्या वाहतूक भाड्यापोटी प्रतिक्विंटल सुमारे २०० रुपये खर्च येतो. त्यात दलाल, घाऊक व्यापारी व किरकोळ व्यापाºयाचा नफा मिळवून ग्राहकाला पुरवठा होतो. दलाल प्रतिक्विंटल मागे केवळ १२ रुपयांपर्यत नफा कमावतो. तर घाऊक व्यापारी व किरकोळ व्यापारी बहुदा अधिक नफा कमवतात. किरकोळ दुकानदार नफा कमावण्यासाठी डाळींच्या उतरलेल्या किमती बाजारात तत्काळ लागू करीत नाहीत. त्या तुलनेत डाळींचे भाव चढले तर तत्काळ दरवाढ लागू करतात. त्यामुळे डाळींचे भाव उतरल्यानंतर त्याचा परिणाम दिसून येत नाही.डाळींचे भाव वधारल्याने पुन्हा मागच्या वर्षासारखीच परिस्थिती निर्माण होते की काय अशी भीती आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात दीडशे ते दोनशे रुपयांनी डाळी खरेदी कराव्या लागल्या होत्या. यावर्षी पुन्हा सणासुदीच्या काळात डाळींच्या किमती वाढू लागल्या असून त्यामुळे घरचे बजेटच बिघडून जाण्याची शक्यता आहे. - ऋजुता तानपाठक, गृहिणीगेल्या वर्षी सर्वच डाळी शंभरी पार कल्यामुळे डाळी खरेदी करताना घरातल्या इतर गरजांना मुरड घालावी लागत होती. त्यामुळे किमान यावर्षी तरी अशाप्रकारे भाववाढ होऊ नये यासाठी सरकारने योग्य नियोजन करण्याची गरज आहे. - शिल्पा पिसोळकर