शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

सणासुदीच्या तोंडावर डाळी महागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:04 IST

नाशिक : सणासुदीच्या काळात डाळींचे भाव वधारल्याने गृहिणींमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला असून, महागाईची झळ स्वयंपाकघरापर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे बाजारात मुगाची आवक सुरू झाली असतानाही मूगडाळीच्या किमती वधारल्या आहेत. तसेच हरभराडाळ आणि तूर डाळींच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने येत्या काळात डाळींच्या किमती आणखी भडकण्याच्या भीतीने ...

नाशिक : सणासुदीच्या काळात डाळींचे भाव वधारल्याने गृहिणींमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला असून, महागाईची झळ स्वयंपाकघरापर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे बाजारात मुगाची आवक सुरू झाली असतानाही मूगडाळीच्या किमती वधारल्या आहेत. तसेच हरभराडाळ आणि तूर डाळींच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने येत्या काळात डाळींच्या किमती आणखी भडकण्याच्या भीतीने स्वयंपाकघरातील बजेटचा समतोल राखण्याचे गृहिणींसमोर आव्हान निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी संपूर्ण देशभरात डाळींचे भाव गगनाला भिडल्यामुळे सामान्यांच्या जीवनाचा आधार असणाºया डाळी ताटाबाहेरही गेल्या होत्या. यावर्षीही डाळींचे भाव वधारण्यास सुरुवात झाली असून, गेल्या पंधरवड्यात डाळींच्या किमतींमध्ये सुमारे १० ते १२ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्यावर्षाप्रमाणेच यंदाही डाळींच्या किमती कडाडण्याची भीती ग्राहकांमध्ये निर्माण झाली आहे.  ही संधी साधून डाळींचा हंगामी व्यापार करणाºया काळ्याबाजारींकडून डाळींची साठेबाजी होण्याची शक्यता व्यक्त होत असून सरकारने सुरुवातीपासूनच साठेबाजांविरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. गेल्या वर्षी डाळींच्या विक्रमी दरवाढीमुळे शहरासह संपूर्ण देशवासीयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचे चित्र तत्कालीन परिस्थितीत पहायला मिळाले. ही भाववाढ डाळींची आवक घटल्यामुळे नाही, तर साठेबाजीमुळे झाल्याचा आरोप झाला. त्यानंतर सरकाने सर्व राज्य सरकारांना साठेबाजांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु, यावर्षी सरकाने सुरुवातीपासूनच खबरदारीची भूमिका घेण्याची गरज ग्राहक आणि व्यापारी वर्गातूनही व्यक्त होत आहे.किमती उतरल्यास ग्राहकांना फायदा नाहीनाशिकमध्ये राजस्थान, इंदूर, लातूर, सोलापूर, बार्शी, जळगाव, अकोला, अकोट या भागातून प्रामुख्याने डाळींचा पुरवठा होतो. यात तूरडाळीसोबतच मूग, उडीद, मसूर व चणाडाळीचे प्रमाण मोठे आहे. डाळींच्या वाहतूक भाड्यापोटी प्रतिक्विंटल सुमारे २०० रुपये खर्च येतो. त्यात दलाल, घाऊक व्यापारी व किरकोळ व्यापाºयाचा नफा मिळवून ग्राहकाला पुरवठा होतो. दलाल प्रतिक्विंटल मागे केवळ १२ रुपयांपर्यत नफा कमावतो. तर घाऊक व्यापारी व किरकोळ व्यापारी बहुदा अधिक नफा कमवतात. किरकोळ दुकानदार नफा कमावण्यासाठी डाळींच्या उतरलेल्या किमती बाजारात तत्काळ लागू करीत नाहीत. त्या तुलनेत डाळींचे भाव चढले तर तत्काळ दरवाढ लागू करतात. त्यामुळे डाळींचे भाव उतरल्यानंतर त्याचा परिणाम दिसून येत नाही.डाळींचे भाव वधारल्याने पुन्हा मागच्या वर्षासारखीच परिस्थिती निर्माण होते की काय अशी भीती आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात दीडशे ते दोनशे रुपयांनी डाळी खरेदी कराव्या लागल्या होत्या. यावर्षी पुन्हा सणासुदीच्या काळात डाळींच्या किमती वाढू लागल्या असून त्यामुळे घरचे बजेटच बिघडून जाण्याची शक्यता आहे. - ऋजुता तानपाठक, गृहिणीगेल्या वर्षी सर्वच डाळी शंभरी पार कल्यामुळे डाळी खरेदी करताना घरातल्या इतर गरजांना मुरड घालावी लागत होती. त्यामुळे किमान यावर्षी तरी अशाप्रकारे भाववाढ होऊ नये यासाठी सरकारने योग्य नियोजन करण्याची गरज आहे. - शिल्पा पिसोळकर