शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

अंबोलीतून गाळाचा उपसा

By admin | Updated: May 18, 2016 23:40 IST

लोकसहभाग : तब्बल ३८ वर्षांनी काम सुरू; साठवण क्षमतेत होणार वाढ

 त्र्यंबकेश्वर : शहराची तहान ज्या पाण्यावर भागवली जाते त्या अंबोली धरणातील गाळ लोकसहभागातून तब्बल ३८ वर्षांनी काढण्यास सुरुवात झाली आहे.लोकसहभागातून धरणातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील काही युवा शेतकऱ्यांनी जेसीबी व ट्रकच्या साह्याने गाळ काढणे सुरू केले आहे. गाळ काढण्यासाठी अंबोलीचा कार्यभार असलेले वराटे व त्यांचे सहायक बी.जी. शिंदे यांची परवानगी घेण्यात आली होती. गाळ शेतात टाकण्याच्या अटीवर या कामास परवानगी देण्यात आली. त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार नरेश बहिरम यांनीही येथे भेट दिली आहे. पाण्याचे उद्भव खोल करणे व त्यातील चिखल गाळ, माती शेतीमध्ये टाकावयाची असल्यास तहसील कार्यालयाकडून अडवणूक केली जात नसल्याचे तहसीलदारांनी सांगितले. आज धरणातील पाणी तीव्र उन्हाने झपाट्याने कमी होत आहे. उन्हाची दाहकता वाढत आहे. उष्णतेच्या लाटांवर लाटा येत आहेत. त्यामुळे धरणसाठा आणखी कमी होणार आहे. वास्तविक त्र्यंबक नगरपालिकेनेदेखील गाळ काढण्यास सहभाग नोंदविणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

धरण बांधल्यापासून आजपर्यंत धरणातील गाळ कधीच काढण्यात आला नसल्याने हा गाळ (माती) शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. शेतकरी स्वखर्चाने गाळाच्या ट्रक आपल्या शेतावर नेत आहेत. यासाठी असलेले जेसीबींच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस पाणी कमी होत असल्याने धरणातील माती-गाळ काढणे सुलभ होत आहे. त्र्यंबक नगरपालिकेने सध्या अहिल्या धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानंतर गंगासागर तलाव, मुकुंद तलाव आदि तलावांतील गाळ काढण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. परिसरातील जलस्रोतातील गाळ काढण्याची कामे जलदगतीने हाती घेतली आहेत. त्र्यंबकेश्वरपासून ११ कि.मी. अंतरावर अंबोली बंधारा आहे. या बंधाऱ्यातूनच त्र्यंबकेश्वर शहराला १९८७-८८पासून पाणीपुरवठा होत आहे. अंबोली येथील सामाजिक कार्यकर्ते विठोबा पाटील मेढे यांच्या सततच्या प्रयत्नाने अंबोली एमआय टॅँक मंजूर करून आणला. सन १९७२च्या दरम्यान या लघु पाटबंधाऱ्याचे काम सुरू झाले आणि १९७८ला धरण पूर्णत्वास आले. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.