शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

अंबोलीतून गाळाचा उपसा

By admin | Updated: May 18, 2016 23:40 IST

लोकसहभाग : तब्बल ३८ वर्षांनी काम सुरू; साठवण क्षमतेत होणार वाढ

 त्र्यंबकेश्वर : शहराची तहान ज्या पाण्यावर भागवली जाते त्या अंबोली धरणातील गाळ लोकसहभागातून तब्बल ३८ वर्षांनी काढण्यास सुरुवात झाली आहे.लोकसहभागातून धरणातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील काही युवा शेतकऱ्यांनी जेसीबी व ट्रकच्या साह्याने गाळ काढणे सुरू केले आहे. गाळ काढण्यासाठी अंबोलीचा कार्यभार असलेले वराटे व त्यांचे सहायक बी.जी. शिंदे यांची परवानगी घेण्यात आली होती. गाळ शेतात टाकण्याच्या अटीवर या कामास परवानगी देण्यात आली. त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार नरेश बहिरम यांनीही येथे भेट दिली आहे. पाण्याचे उद्भव खोल करणे व त्यातील चिखल गाळ, माती शेतीमध्ये टाकावयाची असल्यास तहसील कार्यालयाकडून अडवणूक केली जात नसल्याचे तहसीलदारांनी सांगितले. आज धरणातील पाणी तीव्र उन्हाने झपाट्याने कमी होत आहे. उन्हाची दाहकता वाढत आहे. उष्णतेच्या लाटांवर लाटा येत आहेत. त्यामुळे धरणसाठा आणखी कमी होणार आहे. वास्तविक त्र्यंबक नगरपालिकेनेदेखील गाळ काढण्यास सहभाग नोंदविणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

धरण बांधल्यापासून आजपर्यंत धरणातील गाळ कधीच काढण्यात आला नसल्याने हा गाळ (माती) शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. शेतकरी स्वखर्चाने गाळाच्या ट्रक आपल्या शेतावर नेत आहेत. यासाठी असलेले जेसीबींच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस पाणी कमी होत असल्याने धरणातील माती-गाळ काढणे सुलभ होत आहे. त्र्यंबक नगरपालिकेने सध्या अहिल्या धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानंतर गंगासागर तलाव, मुकुंद तलाव आदि तलावांतील गाळ काढण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. परिसरातील जलस्रोतातील गाळ काढण्याची कामे जलदगतीने हाती घेतली आहेत. त्र्यंबकेश्वरपासून ११ कि.मी. अंतरावर अंबोली बंधारा आहे. या बंधाऱ्यातूनच त्र्यंबकेश्वर शहराला १९८७-८८पासून पाणीपुरवठा होत आहे. अंबोली येथील सामाजिक कार्यकर्ते विठोबा पाटील मेढे यांच्या सततच्या प्रयत्नाने अंबोली एमआय टॅँक मंजूर करून आणला. सन १९७२च्या दरम्यान या लघु पाटबंधाऱ्याचे काम सुरू झाले आणि १९७८ला धरण पूर्णत्वास आले. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.