शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा केंद्राचा डाव :  वृंदा करात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 01:00 IST

वनहक्क कायद्यामध्ये मोठे बदल करून वनजमीन कसणाºया शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. त्यामुळे या विरोधात मोठे जनआंदोलन उभे करण्याची गरज असल्याचे माकपच्या पॉलिट ब्यूरो सदस्य वृंदा करात यांनी केले.

कळवण : वनहक्क कायद्यामध्ये मोठे बदल करून वनजमीन कसणाºया शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. त्यामुळे या विरोधात मोठे जनआंदोलन उभे करण्याची गरज असल्याचे माकपच्या पॉलिट ब्यूरो सदस्य वृंदा करात यांनी केले.नाशिक जिल्हा किसान सभेच्या वतीने मंगळवारी दुपारी विविध मागण्यांसाठी कळवणच्या प्रांत कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रांत कार्यालयाच्या आवारात झालेल्या जाहीर सभेत वृंदा करात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी सैनिक बाळासाहेब गांगुर्डे होते. मोर्चाला अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे, आमदार जे. पी. गावित आदी उपस्थित होते.वृंदा करात यांनी यावेळी मोदी सरकारच्या धोरणांवर कडाडून हल्ला चढविला. मोदी सरकारने वनहक्क कायद्यात सुधारणा करणारा प्रस्ताव लोकसभेत मांडला आहे. या प्रस्तावावर किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सर्वाेच्च न्यायालयात जाऊन ३० जुलैपर्यंत स्थगिती मिळविली आहे. ३० जुलैला स्थगिती उठल्यास वनहक्क कायद्यात मोठ्या प्रमाणात फेरबदल करून शेतकºयांना मिळालेली व कसत असलेली जमीन काढून घेऊन सरकार वनजमीन कसणाºया शेतकºयांना भूमिहीन करण्याच्या प्रयत्नात आहे. हा धोका ओळखून रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन उभे करावे लागणार आहे. यासाठी सर्व वनजमीनधारकांनी सज्ज राहावे, असे आवाहनही करात यांनी केले.आमदार गावित म्हणाले की, यंदा पावसाने दडी मारल्याने मागील वर्षापासूनचा दुष्काळ अजून शेतकºयांचा पिच्छा सोडत नाही. यामुळे शासनाने कर्जमाफीची अंमलबजावणी करावी, शेतकरी सन्मान योजनेचे पैसे शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करावेत व शेतकरी बांधवांना खरीप हंगामासाठी नव्याने कर्जपुरवठा करावा. तसेच मुंबई येथे नेण्यात आलेल्या लॉँगमार्चला वनजमिनी व शेतकºयांच्या मान्य केलेल्या अन्य मागण्यांची अंमलबजावणी तत्काळ करावी, अशी मागणीही केली. सटाणा शहराला पिण्यासाठी पाणी देण्यास विरोध नाही; मात्र पाइपलाइनऐवजी ते कालव्यातून द्यावे, अशी मागणी आमदार जे. पी. गावित यांनी केली. असे न केल्यास पाइपलाइनचे काम बंद पाडू व शासनाचा निर्णय होईपर्यंत प्रांत कार्यालयावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, दुपारी अडीच वाजेला सुरू झालेले ठिय्या आंदोलन सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होते.यावेळी शेतकरी संघटनेचे नेते शांताराम जाधव, मोहन जाधव, किसन गुजर, भाऊसाहेब पवार, सावळीराम पवार आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी इंद्रजित गावित, इरफान पठाण, सुवर्णा गांगुर्डे, दीपक देशमुख, टिनू पगार, कैलास सूर्यवंशी, दामू पवार, रशीद शेख, भरत शिंदे, साहेबराव पवार, अजय पगार, हरी पाटील, गोरख खैरनार, जगन साबळे, सचिन वाघ, जगन बर्डे, गंगाराम गावित, दिनेश पवार, किशोर जाधव, रमेश पवार, यशवंत बहिरम, उत्तम गायकवाड आदींसह हजारो पुरु ष व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.बेमुदत धरणे सुरूया आंदोलनात कळवण, सुरगाणा, देवळा, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, चांदवड आदी ठिकाणचे हजारो वनजमीनधारक शेतकरी उपस्थित होते. मोर्चा कळवण शहरातून सुरू झाल्यापासून कोल्हापूर फाटा येथील प्रशासकीय इमारतीपर्यंत एकेरी वाहतूक सुरू होती. यामुळे वाहतूक खोळंबली होती. या मोर्चातील मोर्चेकरी आश्वासनांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करीत आहेत. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ते प्रांत कार्यालयाच्या आवारामध्ये बसून होते.

टॅग्स :FarmerशेतकरीCommunist Party of India (markjhista)कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (मार्क्झिस्ट)