शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा केंद्राचा डाव :  वृंदा करात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 01:00 IST

वनहक्क कायद्यामध्ये मोठे बदल करून वनजमीन कसणाºया शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. त्यामुळे या विरोधात मोठे जनआंदोलन उभे करण्याची गरज असल्याचे माकपच्या पॉलिट ब्यूरो सदस्य वृंदा करात यांनी केले.

कळवण : वनहक्क कायद्यामध्ये मोठे बदल करून वनजमीन कसणाºया शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. त्यामुळे या विरोधात मोठे जनआंदोलन उभे करण्याची गरज असल्याचे माकपच्या पॉलिट ब्यूरो सदस्य वृंदा करात यांनी केले.नाशिक जिल्हा किसान सभेच्या वतीने मंगळवारी दुपारी विविध मागण्यांसाठी कळवणच्या प्रांत कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रांत कार्यालयाच्या आवारात झालेल्या जाहीर सभेत वृंदा करात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी सैनिक बाळासाहेब गांगुर्डे होते. मोर्चाला अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे, आमदार जे. पी. गावित आदी उपस्थित होते.वृंदा करात यांनी यावेळी मोदी सरकारच्या धोरणांवर कडाडून हल्ला चढविला. मोदी सरकारने वनहक्क कायद्यात सुधारणा करणारा प्रस्ताव लोकसभेत मांडला आहे. या प्रस्तावावर किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सर्वाेच्च न्यायालयात जाऊन ३० जुलैपर्यंत स्थगिती मिळविली आहे. ३० जुलैला स्थगिती उठल्यास वनहक्क कायद्यात मोठ्या प्रमाणात फेरबदल करून शेतकºयांना मिळालेली व कसत असलेली जमीन काढून घेऊन सरकार वनजमीन कसणाºया शेतकºयांना भूमिहीन करण्याच्या प्रयत्नात आहे. हा धोका ओळखून रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन उभे करावे लागणार आहे. यासाठी सर्व वनजमीनधारकांनी सज्ज राहावे, असे आवाहनही करात यांनी केले.आमदार गावित म्हणाले की, यंदा पावसाने दडी मारल्याने मागील वर्षापासूनचा दुष्काळ अजून शेतकºयांचा पिच्छा सोडत नाही. यामुळे शासनाने कर्जमाफीची अंमलबजावणी करावी, शेतकरी सन्मान योजनेचे पैसे शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करावेत व शेतकरी बांधवांना खरीप हंगामासाठी नव्याने कर्जपुरवठा करावा. तसेच मुंबई येथे नेण्यात आलेल्या लॉँगमार्चला वनजमिनी व शेतकºयांच्या मान्य केलेल्या अन्य मागण्यांची अंमलबजावणी तत्काळ करावी, अशी मागणीही केली. सटाणा शहराला पिण्यासाठी पाणी देण्यास विरोध नाही; मात्र पाइपलाइनऐवजी ते कालव्यातून द्यावे, अशी मागणी आमदार जे. पी. गावित यांनी केली. असे न केल्यास पाइपलाइनचे काम बंद पाडू व शासनाचा निर्णय होईपर्यंत प्रांत कार्यालयावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, दुपारी अडीच वाजेला सुरू झालेले ठिय्या आंदोलन सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होते.यावेळी शेतकरी संघटनेचे नेते शांताराम जाधव, मोहन जाधव, किसन गुजर, भाऊसाहेब पवार, सावळीराम पवार आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी इंद्रजित गावित, इरफान पठाण, सुवर्णा गांगुर्डे, दीपक देशमुख, टिनू पगार, कैलास सूर्यवंशी, दामू पवार, रशीद शेख, भरत शिंदे, साहेबराव पवार, अजय पगार, हरी पाटील, गोरख खैरनार, जगन साबळे, सचिन वाघ, जगन बर्डे, गंगाराम गावित, दिनेश पवार, किशोर जाधव, रमेश पवार, यशवंत बहिरम, उत्तम गायकवाड आदींसह हजारो पुरु ष व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.बेमुदत धरणे सुरूया आंदोलनात कळवण, सुरगाणा, देवळा, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, चांदवड आदी ठिकाणचे हजारो वनजमीनधारक शेतकरी उपस्थित होते. मोर्चा कळवण शहरातून सुरू झाल्यापासून कोल्हापूर फाटा येथील प्रशासकीय इमारतीपर्यंत एकेरी वाहतूक सुरू होती. यामुळे वाहतूक खोळंबली होती. या मोर्चातील मोर्चेकरी आश्वासनांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करीत आहेत. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ते प्रांत कार्यालयाच्या आवारामध्ये बसून होते.

टॅग्स :FarmerशेतकरीCommunist Party of India (markjhista)कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (मार्क्झिस्ट)