शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

उंबरदरी धरणातून आवर्तन सोडले

By admin | Updated: January 12, 2016 22:21 IST

सिंचनासाठी पाणी : ठाणगाव, पाडळी, टेंभूरवाडीला होणार लाभ

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातल्या ठाणगाव येथील उंबरदरी धरणातून शेती सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आले. यामुळे ठाणगावसह टेंभूरवाडी व पाडळी परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.उंबरदरी धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याबाबत ७ जानेवारीला शेतकरी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत पाडळी व टेंभूरवाडी येथील शेतकऱ्यांनी तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली, तर ठाणगावकरांनी २० जानेवारीस आवर्तन सोडण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे बैठकीत आवर्तन सोडण्याबाबत एकमत न झाल्याने त्याच दिवशी रात्री उशिरा आमदार राजाभाऊ वाजे यांच्या कार्यालयात तिन्ही गावांतील शेतकऱ्यांची पुन्हा बैठक घेण्यात आली. यावेळी वाजे यांनी शेतकऱ्यांची भूमिका समजावून घेत व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून १२ जानेवारीस पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी ११ वाजता लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता बी.एस. जाधव, कालवा निरीक्षक पी.डी. साळुंके, यू.टी. माळोदे, टी. आर. द्याने यांच्यासह ठाणगाव, पाडळी व टेंभूरवाडी येथील शेतकऱ्यांच्या उपस्थित उंबरदरी धरणातून आवर्तन सोडण्यात आले. केवळ एक दिवस आवर्तन सुरू राहणार असल्याने गैरप्रकार रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाचे कर्मचारी धरणावरच तळ ठोकून होते. आवर्तनाचे पाणी म्हाळुंगी नदीपात्राद्वारे पाडळी व टेंभूरवाडी येथील साठवण बंधाऱ्यांमध्ये सोडले जात आहे. रब्बीच्या पिकांसाठी ऐन गरजेच्या वेळी आवर्तन उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. गहू, हरभऱ्यासह उन्हाळ कांदा, लसूण आदि पिकांना या आवर्तनाचा लाभ होणार आहे. (वार्ताहर)