शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

उंबरदरी धरणातून आवर्तन सोडले

By admin | Updated: January 12, 2016 22:21 IST

सिंचनासाठी पाणी : ठाणगाव, पाडळी, टेंभूरवाडीला होणार लाभ

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातल्या ठाणगाव येथील उंबरदरी धरणातून शेती सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आले. यामुळे ठाणगावसह टेंभूरवाडी व पाडळी परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.उंबरदरी धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याबाबत ७ जानेवारीला शेतकरी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत पाडळी व टेंभूरवाडी येथील शेतकऱ्यांनी तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली, तर ठाणगावकरांनी २० जानेवारीस आवर्तन सोडण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे बैठकीत आवर्तन सोडण्याबाबत एकमत न झाल्याने त्याच दिवशी रात्री उशिरा आमदार राजाभाऊ वाजे यांच्या कार्यालयात तिन्ही गावांतील शेतकऱ्यांची पुन्हा बैठक घेण्यात आली. यावेळी वाजे यांनी शेतकऱ्यांची भूमिका समजावून घेत व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून १२ जानेवारीस पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी ११ वाजता लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता बी.एस. जाधव, कालवा निरीक्षक पी.डी. साळुंके, यू.टी. माळोदे, टी. आर. द्याने यांच्यासह ठाणगाव, पाडळी व टेंभूरवाडी येथील शेतकऱ्यांच्या उपस्थित उंबरदरी धरणातून आवर्तन सोडण्यात आले. केवळ एक दिवस आवर्तन सुरू राहणार असल्याने गैरप्रकार रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाचे कर्मचारी धरणावरच तळ ठोकून होते. आवर्तनाचे पाणी म्हाळुंगी नदीपात्राद्वारे पाडळी व टेंभूरवाडी येथील साठवण बंधाऱ्यांमध्ये सोडले जात आहे. रब्बीच्या पिकांसाठी ऐन गरजेच्या वेळी आवर्तन उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. गहू, हरभऱ्यासह उन्हाळ कांदा, लसूण आदि पिकांना या आवर्तनाचा लाभ होणार आहे. (वार्ताहर)