शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

किमान ७० टक्के आश्रमशाळा सुरु होण्याची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 02:01 IST

राज्यातील आश्रमशाळा २ ऑगस्टपासून सुरु करण्याचे आदेश राज्य शासनाने दिल्यानंतर आदिवासी विकास विभागाने प्रकल्पस्तरावर शाळा सुरु करण्याची तयारी सुरु केली असून ज्या ठिकाणी कोणतीही अडचणी नाही अशा ठिकाणी सोमवारपासून आश्रमशाळा सुरु होण्याची शक्यता आहे; मात्र मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची संमती महत्त्वाची असल्याने याला पालकांकडून कसा प्रतिसाद मिळतो यावरच पुढील भवितव्य अवलंबून आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची तयारी पूर्ण : पालकांचे संमतीपत्र ठरणार महत्त्वाची बाब

नाशिक : राज्यातील आश्रमशाळा २ ऑगस्टपासून सुरु करण्याचे आदेश राज्य शासनाने दिल्यानंतर आदिवासी विकास विभागाने प्रकल्पस्तरावर शाळा सुरु करण्याची तयारी सुरु केली असून ज्या ठिकाणी कोणतीही अडचणी नाही अशा ठिकाणी सोमवारपासून आश्रमशाळा सुरु होण्याची शक्यता आहे; मात्र मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची संमती महत्त्वाची असल्याने याला पालकांकडून कसा प्रतिसाद मिळतो यावरच पुढील भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, बहुतांशी शाळांमध्ये सोमवारपासून विद्यार्थी दाखल होण्यास प्रारंभ होईल त्यामुळे ७० ते ८० टक्के शाळा सुरु होण्यास फारसी अडचण येणार नसल्याचा अंदाज अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात आहे. ज्या गावात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे आणि आश्रमशाळा असलेल्या गावात महिनाभरात एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही अशा ठिकाणी २ ऑगस्टपासून आश्रमशाळा सुरु करण्याचे आदेश राज्य शासनाने आदिवासी विकास विभागाला दिले आहेत. यादृष्टीने प्रकल्प स्तरावर त्याची कार्यवाही सुरु झाली आहे. प्रकल्प कार्यालयाकडून सर्व आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांना या संबंधीचे पत्र पाठविण्यात आले आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे ग्रामपंचायतींचे ठराव करण्याचे काम मुख्याध्यापकांनी सुरु केले आहे. शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि संबंधित ठिकाणचे आरोग्य केंद्र यांच्या संमतीचे पत्र सादर केल्यानंतर शाळा सुरु करण्यास प्रकल्पस्तरावरुन मान्यता देण्यात येणार आहे. या प्रक्रियेला किमान दोन-तीन दिवसांचा कालावधी जाऊ शकतो. त्यानंतर प्रत्यक्ष शाळेच्या कामकाजाला सुरुवात होईल असे सांगितले जात आहे. ज्या ठिकाणी कोणतीही अडचण नाही अशा ठिकाणी सोमवारपासून विद्यार्थी येण्यास प्रारंभ होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

चौकट-

आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा निवासी असल्यामुळे मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे संमतीपत्र महत्त्वाचे आहे. काही पालकांमध्ये अद्याप कोरोनाची भीती कायम असल्यामुळे ते पाल्यांंना शाळेत पाठविण्यास कितपत सकारात्मकता दाखवितात यावरच पुढील निर्णय अवलंबून राहणार आहे. दरम्यान, शाळा सुरु करण्यासाठी आवश्यक असलेली तयारी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली असून आरोग्याच्या खबरदारीच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा