शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
2
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?
5
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
6
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
7
शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम
8
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
9
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
10
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
11
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
12
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
13
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
14
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
15
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
16
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
17
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
18
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
19
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
20
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान

नेता बोले, तरीही दल ना हले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 01:26 IST

नेत्यांमधील विसंवाद, एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न ही कारणे त्यामागे आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यानंतर उद‌्भवलेली ही स्थिती पाहता भाजपसारख्या शिस्तबद्ध पक्षापुढे भविष्यात मोठी आव्हाने आहेत उभी ठाकतील, हे उघड आहे.

ठळक मुद्देमनमाड, दिंडोरी, सुरगाणा, बागलाण, देवळा येथील तालुकाध्यक्षांच्या बदलाविषयी चर्चा होणार होती.नाशिककरांच्या अपेक्षांवर भाजपने बोळा फिरवल्यानंतर ही मल्लीनाथी जखमेवर मीठ चोळणारी आहे हे पाटील यांना लक्षात कसे आले नाही, याचे आश्चर्य वाटते.

मिलिंद कुलकर्णी

बेरीज वजाबाकीराजकारण हे अळवावरच्या पाण्यासारखे आहे. हाती सापडत नाही. त्याचा रंग वेगळाच आहे. भल्या भल्यांना चकवा देते. त्यात सत्तेला फार महत्त्व असते. ती नसेल तर पक्ष, कार्यकर्ते सांभाळणे जिकिरीचे होते. याचा अनुभव नाशिक जिल्ह्यात दोन राष्ट्रीय पक्षांच्या प्रदेश नेत्यांनी घेतला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाशिकला तीन दिवस मुक्काम ठोकून शहर व ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी यांच्या व्यक्तिगत भेटी घेऊन पक्षांतर्गत स्थिती समजून घेतली. पाटील यांच्या संघटन कार्यातील दांडगा अनुभव, त्यांचा पक्षातील दरारा पाहता भाजपमधील विस्कटलेली घडी सुरळीत होईल, अशी आशा निर्माण झालेली असतानाच दोन दिवसांनी झालेल्या महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपने हक्काची जागा गमावली. नेत्यांमधील विसंवाद, एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न ही कारणे त्यामागे आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यानंतर उद‌्भवलेली ही स्थिती पाहता भाजपसारख्या शिस्तबद्ध पक्षापुढे भविष्यात मोठी आव्हाने आहेत उभी ठाकतील, हे उघड आहे. संकटमोचक म्हणून लौकिक मिळविलेल्या गिरीश महाजन यांनी नाशिकचे पाच वर्षे पालकमंत्रिपद भूषविले. या काळात त्यांनी महापालिकेत स्वबळावर सत्ता आणली. मात्र सत्ता राबविताना पक्षांतर्गत सुंदोपसुंदी रोखणे त्यांनाही अवघड गेले. राज्यातील सत्ता जाताच महाजन यांच्याऐवजी नाशिकची संघटनात्मक जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांचे दुसरे विश्वासू सहकारी जयकुमार रावल यांच्याकडे सोपविण्यात आली. प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीमुळे रावलांना पक्षातील बेदिलीचा अंदाज आला असेल. त्यांची पुढील व्यूहरचनाही या अनुभवावर बेतलेली असेल. कॉंग्रेस या दुसऱ्या राष्ट्रीय पक्षाचे प्रदेश निरीक्षक विनायक देशमुख यांनी जिल्ह्यातील कॉंग्रेसजनांची बैठक बोलावली. या बैठकीत मनमाड, दिंडोरी, सुरगाणा, बागलाण, देवळा येथील तालुकाध्यक्षांच्या बदलाविषयी चर्चा होणार होती. मात्र याविषयावरून बैठकीत गदारोळ झाला. तालुकाध्यक्षांचा आढावा त्या तालुक्यात जाऊन घ्यायला हवा, तो घेतला का, असा प्रतिसवाल प्रदेश निरीक्षकांना विचारण्यात आला. जिल्हाध्यक्षांच्या निष्क्रियतेविषयी काहींनी तक्रारी केल्या. जिल्ह्यात पक्षाचे एकमेव आमदार असताना त्यांना बळ देण्यासाठी प्रदेश समिती व वरिष्ठांनी काय केले? अशी विचारणा करण्यात आली. राज्याचे मंत्री जिल्ह्यात फिरकत नाही. राज्याच्या सत्तेचा लाभ पक्षाला कसा मिळेल, अशी कैफियत मांडण्यात आली.एकटे पडल्यावर नारा काय उपयोगाचा?काँग्रेसजनांची या बैठकीतील व्यथा रास्त आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सत्तेतील भागीदार पक्ष जिल्ह्यात सत्ता राबविताना दिसून येतात. मंत्री, आमदार मंत्रालयातून विकासकामे मंजूर करून आणतात आणि त्याचा गवगवा करतात. भाजपनेदेखील खासदार डॉ.भारती पवार यांना केंद्रात मंत्रिपद देऊन नाशिकला महत्व दिले आहे. आदिवासी समाजाला जोडले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष केवळ भूतकाळातील कामगिरीवर पुढे वाटचाल करू शकणार नाही. वर्तमानकाळात तुम्ही काय केले, हे मतदारांना सांगावे लागणार आहे. काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांच्या शिक्षणसंस्था, कार्यक्षेत्र, नातेसंबंध नाशिक जिल्ह्यात आहेत; पण ते पक्षवाढीत लक्ष घालत नाही, अशी तक्रार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही दौरा रद्द झाला. काँग्रेसजनांना त्यांची व्यथा मांडायला विनायक देशमुख आयते सापडले आणि त्यांना टीकेचा भडिमार सहन करावा लागला. प्रदेशाध्यक्ष ह्यएकला चलो रेह्णचा नारा देत असले तरी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष एकटा पडला आहे हे वास्तव कधी समजून घेतले जाणार? महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आतापासून सुरू झाल्याचे राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांमुळे दिसून येत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा दोन दिवसांचा दौरा याच पार्श्वभूमीवर होता. मनसेतील गटबाजीची चर्चा त्यांच्या दौऱ्याच्या वेळी झाली. जुने व युवक असे दोन गट असून, दोघांनी राज ठाकरे यांच्याकडे बाजू मांडली. राज यांनी चातुर्य दाखवत पुत्र अमित यांना बोलावून त्यांना परिस्थितीचा अंदाज घ्यायला सांगितला. कोणालाही कोणतेही आश्वासन न देता त्यांनी चर्चेचा सगळा फोकस अमित ठाकरे यांची एन्ट्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची झालेली भेट यावरच ठेवला. त्यामुळे पक्षांतर्गत खदखद, नाराजीच्या बातम्या बाहेर आल्या नाहीत. राज यांची पक्षावरील पकड आणि टायमिंग परफेक्ट असते, हे पुन्हा एकदा दिसून आले.याउलट चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेतील पाच वर्षांच्या भाजपच्या कामगिरीचे प्रसारमाध्यमात नकारात्मक चित्रण येत असल्याची भूमिका मांडली. नाशिककरांच्या अपेक्षांवर भाजपने बोळा फिरवल्यानंतर ही मल्लीनाथी जखमेवर मीठ चोळणारी आहे हे पाटील यांना लक्षात कसे आले नाही, याचे आश्चर्य वाटते.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण