शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

शाळेतूनच कायद्याचे शिक्षण दिले जावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 13:21 IST

समाजातील मागास, दुर्बल घटकांपर्यंत कायद्यांचीमाहिती पोहोचणे गरजेचे आहे. त्यांच्या जीवनातील प्रश्न सोडवून जीवन सुसह्य व्हायला हवे त्यासाठी काम करणा-या विभागांनी त्यांच्यापर्यंत पोहोचावे असे प्रतिपादन राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य न्या. सी.एल. थूल यांनी केले आहे.

ठळक मुद्देसी.एल. थूल : नागरी संरक्षण कायद्यावर कार्यशाळा समाजातील भेदाभेद मिटविण्यासाठी निर्माण झालेल्या कायद्यांचा वापर प्रभावीपणे व्हायला हवे

नाशिक : समाजातील भेदाभेद मिटविण्यासाठी निर्माण झालेल्या कायद्यांचा वापर प्रभावीपणे होण्यासाठी आणि समाजातील वातावरण चांगले राहण्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय जीवनात या विषयांचे ज्ञान दिले जाणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य न्या. सी.एल. थूल यांनी केले आहे.राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आयोजीत नागरी संरक्षण कायदा, अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम या विषयावरील विभागीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, समाजातील मागास, दुर्बल घटकांपर्यंत कायद्यांचीमाहिती पोहोचणे गरजेचे आहे. त्यांच्या जीवनातील प्रश्न सोडवून जीवन सुसह्य व्हायला हवे त्यासाठी काम करणा-या विभागांनी त्यांच्यापर्यंत पोहोचावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी न्या. थूल यांनी नागरी संरक्षण कायदा, अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम यांची निर्मितीमागची पार्श्वभुमी, त्यातील सुधारणा, घटनाक्रम, हिंदु कोड बीलाचे महत्व व त्या त्या वेळची सामाजिक परिस्थितीती आदीची माहिती विविध न्यायालयीन खटल्यांच्या संदर्भानिशी दिली.विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी, सामाजिक न्याय विभागाच्या कामाचे व्यापक स्वरूप आहे. विभागामार्फत वृद्धांसाठी विविध योजना, त्यांच्यासाठी वृद्धाश्रम, निर्वाहभत्ता आदि महत्वाचे विषय हाताळले जाता. त्याच बरोबर शेतक-यांच्यासाठी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, परदेशी शिक्षण आदि समाजाशी निगडीत महत्वपुर्ण कामे केली जातात. समाजातील दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी या विभागाचे काम महत्वाचे आहे असे सागितले. समाजकल्याण उपायुक्त राजेंद्र कलाल यांनी कल्याणकारी राज्य ही संकल्पना आपण स्विकारली आहे. त्यामुळे सामाजिक सेवा देण्याची जबाबदारी संविधानाने आपल्यावर सोपविली आहे. सामाजिक भावनेतून काम करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेत केलेल्या तरतुदीही महत्वपूर्ण ठरत असल्याचे सांगितले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी, ‘सामाजिक कायदे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भुमिका’ या विषयावर सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची माहिती दिली. बार्टीचे प्रकल्प संचालक लक्ष्मीकांत देशमुख, उपायुक्त सदानंद पाटील, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्यावतीने तयार केलेल्या नागरी संरक्षण कायदा १९५५, अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ वरील पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

टॅग्स :Social Welfare office Puneपुणे समाजकल्याण विभागNashikनाशिक