शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

शाळेतूनच कायद्याचे शिक्षण दिले जावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 13:21 IST

समाजातील मागास, दुर्बल घटकांपर्यंत कायद्यांचीमाहिती पोहोचणे गरजेचे आहे. त्यांच्या जीवनातील प्रश्न सोडवून जीवन सुसह्य व्हायला हवे त्यासाठी काम करणा-या विभागांनी त्यांच्यापर्यंत पोहोचावे असे प्रतिपादन राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य न्या. सी.एल. थूल यांनी केले आहे.

ठळक मुद्देसी.एल. थूल : नागरी संरक्षण कायद्यावर कार्यशाळा समाजातील भेदाभेद मिटविण्यासाठी निर्माण झालेल्या कायद्यांचा वापर प्रभावीपणे व्हायला हवे

नाशिक : समाजातील भेदाभेद मिटविण्यासाठी निर्माण झालेल्या कायद्यांचा वापर प्रभावीपणे होण्यासाठी आणि समाजातील वातावरण चांगले राहण्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय जीवनात या विषयांचे ज्ञान दिले जाणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य न्या. सी.एल. थूल यांनी केले आहे.राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आयोजीत नागरी संरक्षण कायदा, अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम या विषयावरील विभागीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, समाजातील मागास, दुर्बल घटकांपर्यंत कायद्यांचीमाहिती पोहोचणे गरजेचे आहे. त्यांच्या जीवनातील प्रश्न सोडवून जीवन सुसह्य व्हायला हवे त्यासाठी काम करणा-या विभागांनी त्यांच्यापर्यंत पोहोचावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी न्या. थूल यांनी नागरी संरक्षण कायदा, अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम यांची निर्मितीमागची पार्श्वभुमी, त्यातील सुधारणा, घटनाक्रम, हिंदु कोड बीलाचे महत्व व त्या त्या वेळची सामाजिक परिस्थितीती आदीची माहिती विविध न्यायालयीन खटल्यांच्या संदर्भानिशी दिली.विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी, सामाजिक न्याय विभागाच्या कामाचे व्यापक स्वरूप आहे. विभागामार्फत वृद्धांसाठी विविध योजना, त्यांच्यासाठी वृद्धाश्रम, निर्वाहभत्ता आदि महत्वाचे विषय हाताळले जाता. त्याच बरोबर शेतक-यांच्यासाठी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, परदेशी शिक्षण आदि समाजाशी निगडीत महत्वपुर्ण कामे केली जातात. समाजातील दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी या विभागाचे काम महत्वाचे आहे असे सागितले. समाजकल्याण उपायुक्त राजेंद्र कलाल यांनी कल्याणकारी राज्य ही संकल्पना आपण स्विकारली आहे. त्यामुळे सामाजिक सेवा देण्याची जबाबदारी संविधानाने आपल्यावर सोपविली आहे. सामाजिक भावनेतून काम करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेत केलेल्या तरतुदीही महत्वपूर्ण ठरत असल्याचे सांगितले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी, ‘सामाजिक कायदे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भुमिका’ या विषयावर सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची माहिती दिली. बार्टीचे प्रकल्प संचालक लक्ष्मीकांत देशमुख, उपायुक्त सदानंद पाटील, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्यावतीने तयार केलेल्या नागरी संरक्षण कायदा १९५५, अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ वरील पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

टॅग्स :Social Welfare office Puneपुणे समाजकल्याण विभागNashikनाशिक