शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
3
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
4
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
5
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
6
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
7
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
8
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
9
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
10
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
11
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
12
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
13
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
14
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
15
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
16
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
17
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
18
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
19
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
20
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...

तळवाडे दिगरच्या माध्यमिक शाळेस लावले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 20:42 IST

तळवाडे दिगर : शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी महाराष्ट्रभर कानाकोपर्यातील शाळांमध्ये बालगोपाळांचे तसेच नवागतांचे स्वागत होत असताना तळवाडे दिगर येथील माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी मात्र शासनाच्या या उपक्र माला केराची टोपली दाखवत चक्क शाळेत वेळेवर न येण्याची तसेच काही शिक्षकांनी दांडी मारण्याची हिम्मत केली आहे.मात्र तळवाड दिगर येथील जागरूक पालकांनी हातात शाळेच्या वेळेच्या पुराव्यासाठी घड्याळ दाखवत शाळेला कुलूप लावून शिक्षकांना चांगलीच अद्दल घडवली असून आपल्या पाल्यांना घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देग्रामस्थ संतप्त : शाळेत शिक्षकच आले ऊशिरा तर काहींनी मारली दांडी

तळवाडे दिगर : शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी महाराष्ट्रभर कानाकोपर्यातील शाळांमध्ये बालगोपाळांचे तसेच नवागतांचे स्वागत होत असताना तळवाडे दिगर येथील माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी मात्र शासनाच्या या उपक्र माला केराची टोपली दाखवत चक्क शाळेत वेळेवर न येण्याची तसेच काही शिक्षकांनी दांडी मारण्याची हिम्मत केली आहे.मात्र तळवाड दिगर येथील जागरूक पालकांनी हातात शाळेच्या वेळेच्या पुराव्यासाठी घड्याळ दाखवत शाळेला कुलूप लावून शिक्षकांना चांगलीच अद्दल घडवली असून आपल्या पाल्यांना घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे.शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व वर्ग २, ३, ४ कर्मचाऱ्यांनी १०.४५ वाजता शाळेच्या आवारात हजर राहणे आवश्यक आहे. मात्र ११.१५ वाजले तरीही शिक्षक हजर नसल्यामुळे सर्व विद्यार्थी गेटच्या बाहेर असल्याने त्याठिकाणी एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. जमलेली गर्दी बघून काही पालक त्याठिकाणी गेले असता शिक्षकच हजर नसल्याचे निदर्शनास आले. संतप्त पालकांनी गावातील सरपंच देविदास अहिरे, पोलीस पाटील गणेश ठाकरे, स्कुल कमिटी चेअरमन ज्ञानेश्वर अहिरे, पंकज ठाकरे, डॉ मुरलीधर पवार, हेमंत पवार, देविदास ठाकरे व इतर पालकांना घटनास्थळी बोलावून घेतशाळेच्या मुख्य प्रवेश द्वाराला कुलूप लावण्याचा निर्णय घेतला.शासनाकडून भराती प्रक्रि येबाबत संस्थांना निर्बंध लादण्यात आल्यामुळे या शाळेत पाच ते सहा वर्षांपासून पाच शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तुकड्या वाचवण्यासाठी जून मिहन्यात प्रवेशापुरते पालकांना मानधनावर शिक्षक भरती करतो असे आश्वासन दिले जाते. नंतर मात्र नाममात्र आलेले मान धणावरच्या शिक्षकांना संस्थेचा खर्च होऊ नये म्हणून सोयीने घरचा रस्ता दाखवला जातो.अशा प्रकारच्या सुडबुद्धीच्या शिक्षण व्यवस्थेला कोण जबाबदार आहे. दोन पैसे हाती असलेल्या पालकांनी त्यांची मुलं इतरत्र खाजगी शाळांमध्ये दाखल केली मात्र आमच्याकडे दोन वेळच्या अन्नाच्या सोईपुरताही पैसा नाही मग आमच्या मुलांच्या शिक्षणाचे काय होईल असा सवाल पालकांकडून केला जात आहेदरम्यान सदर घटनबोबत संथाप्रमुख रामा सूर्यवंशी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही तसेच मुख्याध्यापक काकाजी अहिरे यांनीही पगार पत्रकाचे निमित्त सांगितले.लिपिक खुशाल अहिरे हेही हजर नसल्याने रजा अर्ज अथवा हालचाल नोंदवही पाहता आली नाही. राजेंद्र निकम हे शिक्षक परवानगीशिवाय गैरहजर आढळून आले. घडलेल्या घटनेचे वृत्त पंचायत समिती सटाणा यांना कळविली असता शिक्षण विस्तार अधिकारी टी. के. घोंगडे यांनी शाळेस भेट देऊन पालकांची समज घातली व घडलेल्या घटनेचा लेखी अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला.प्रतिक्रि या-गेल्या अनेक वर्षापासून येथील माध्यमिक शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता पूर्णपणे ढासळली आहे. इयत्ता पहिली पासून ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास करू नये या शासनाच्या धोरणामुळे शिक्षकाला परीक्षेच्या निकालाबाबत धाक राहिली नाही.- देविदास अहिरे,सरपंच- तळवाडे दिगर.शासनाचे धोरण हे नेहमी विध्यार्थी केंद्रित असते. विद्यार्थ्यास नापास जरी करावयाचे नसले तरी नैतिकतेचा विचार करून घरी अध्ययन करून अध्यापन करावे. अलीकडच्या काळात अशी मानसिकता शिक्षकांमध्ये राहिली नाही.- पंकज ठाकरे, अध्यक्ष,श्री कपालेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ तळवाडे दिगर.येथील विषय शिक्षकांना स्वत:च्या विषयाच्या गाभाभूत घटकांचे ज्ञान असणे क्र मप्राप्त आहे ते ज्ञान शिक्षकाकडे नसल्याचे विद्यार्थ्यांना कसे शिकवत असतील. ज्ञानदान हे अतिशय पवित्र कार्य नव्हे तर ती देशसेवाच आहे. शिक्षकांनी नैतिकता जपावी.- डॉ. मुरलीधर पवार, प्रगतिशील शेतकरीमागील वर्षी अभ्यासक्र म पूर्ण न करता वार्षिक परीक्षा घेण्यात आली. शिकवलेच नाही तर मुलांनी पेपर लिहिलेच कसे. मुलं पास झाली खरी याचा अर्थ मुलांनी पाहून लिहिले किंवा शिक्षकांनी स्वत: पेपर लिहून घेतले. अशा प्रकारे दिशाभूल होत असेल तर येणारी पिढी बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही आणि यास फक्त शिक्षकच जबाबदार राहील.- हेमंत पवार, शेतकरी,तळवाडे दिगर.