शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

वल्गना युद्धाच्या, भाषा तहाची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:16 IST

प्रशासनाला जाहीरपणे जाब विचारण्याचे माध्यम मिळत नसल्याची खंत असल्यामुळे जेव्हा जशी संधी मिळेल तशी खदखद व्यक्त केली गेली. जणू ...

प्रशासनाला जाहीरपणे जाब विचारण्याचे माध्यम मिळत नसल्याची खंत असल्यामुळे जेव्हा जशी संधी मिळेल तशी खदखद व्यक्त केली गेली. जणू काही कोरोना काळात प्रशासनाने बेबंद कारभार करून जिल्ह्याचे व पर्यायाने शासनाचे नुकसान चालविल्याची भावना व्यक्त करणारे रकानेही कसे भरले जातील, याची काळजीही घेतली गेली. पंधराव्या वित्त आयोगाचे नियोजन, फाईलींचा प्रवास, गैरव्यवहाराच्या तक्रारी, अशा एक नव्हे अनेक प्रश्न सभागृहात उपस्थित करण्याची व प्रसंगी प्रश्नांची तड लावल्याशिवाय सभागृह न सोडण्याची भाषाही करण्यात आली. दीड वर्षापासून साचलेल्या ‘वाफेत’ सभागृह हरवते की काय? अशी वातावरण निर्मिती करण्यात आल्याने या सभेविषयी उत्सुकता वाढीस लागणे साहजिकच. वास्तवात मात्र सभागृह दणाणून सोडणाऱ्यांचे ‘घसे’ बसल्याचे जाणवले. पंधरावा वित्त आयोग असो वा समान निधीच्या वाटपाच्या विषयावर महिला सदस्यांनीच आक्रमकता दाखविली. त्याच वेळी स्वत:ला ‘सभागृह पुरुष’ सदस्य म्हणवून घेणाऱ्यांची या प्रश्नी बसलेली ‘दातखिळी’ अनाकलनीय ठरली. एरव्ही विषय कोणताही असो, अग्रहक्काने त्यात साऱ्यांनाच ‘सल्ले’ देण्याची भूमिका वठविणाऱ्यांनीदेखील निधी वाटपाच्या प्रश्नावर सभागृहात मिठाची गुळणी धरल्याचे पाहून तर सारे कसे सोयी-सोयीचे असते, याचे प्रत्यंतरही आले. मग प्रश्न राहतो, सभागृहाबाहेर बाह्या सरसावणाऱ्यांना सभागृहात कापरे का भरते? अर्थातच याचे उत्तर मिळू शकणार नाही. उपरोक्त वर्णन केल्याप्रमाणे लुटुपुटीची लढाईतही तहाची बोलणी करून स्वत:चा स्वार्थ साधण्यापलीकडे आजवर जिल्हा परिषदेत काहीच घडले नाही. अशा लढायांची भाषा कशासाठी केली जाते हे जाणून असलेल्या प्रशासनालाही त्याची सवय जडलेली. त्यामुळे ‘दुखत कुठे असेल तरी सांगण्याची पद्धत वेगळी’ अवलंबणाऱ्यांविषयी आता सभागृहदेखील गेल्या साडेचार वर्षांत पुरेपूर जाणून आहे. फरक इतकाच आहे की, मोजक्याच व्यक्तींनी स्वत:ची मक्तेदारी समजून जिल्हा परिषदेचा ताबा घेण्याचा चालविलेला प्रयत्न किती केविलवाणा असतो हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

-श्याम बागुल