शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाचा अभाव : सुरक्षिततेचे गांभीर्य नसल्याचेही उघड प्रश्नपत्रिका वाटपात गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:06 IST

महाराष्टÑ विद्या प्राधिकरणाच्या वतीने इयत्ता पहिली ते आठवीसाठी शाळांना देण्यात येणाºया प्रश्नपत्रिका सलग दुसºया दिवशी कमी पडल्याने ऐन परीक्षेत शाळा प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.

ठळक मुद्देसप्टेंबरमध्ये अशाच प्रकारचा गोंधळपरीक्षेला प्रश्नपत्रिका वाटपाचा प्रचंड गोंधळ ऐनवेळी यंत्रणेला धावाधाव करावी लागलीपुरेपूर प्रश्नपत्रिका पुरविण्यात आल्याचा दावा

नाशिक : महाराष्टÑ विद्या प्राधिकरणाच्या वतीने इयत्ता पहिली ते आठवीसाठी शाळांना देण्यात येणाºया प्रश्नपत्रिका सलग दुसºया दिवशी कमी पडल्याने ऐन परीक्षेत शाळा प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. धावाधाव केल्यानंतर शहरातील शाळांना प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्याही मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा झेरॉक्स प्रश्नपत्रिकेवर घ्यावी लागल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये अशाच प्रकारचा गोंधळ होऊनही शिक्षण विभागाने कोणताही धडा घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.शासनाच्या आदेशान्वये यंदा दिवाळीनंतर सहामाही परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील शाळांनी दोन महिन्यांपूर्वीच विद्यार्थी संख्या आणि माध्यमनिहाय प्रश्नपत्रिकांची मागणी नोंदविलेली आहे. असे असतानाही बुधवार आणि गुरुवारीही भाषा आणि इंग्रजी विषयाच्या परीक्षेला प्रश्नपत्रिका वाटपाचा प्रचंड गोंधळ निर्माण झाला. शहरातील अनेक शाळांना प्रश्नपत्रिका मिळाल्याच नसल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित शाळाच्या यंत्रणेची धावपळ झाली. काही ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळांना सेमी इंग्रजीच्या, तर सेमी इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका मराठी माध्यमांना मिळाल्याने ऐनवेळी यंत्रणेला धावाधाव करावी लागली. प्रश्नपत्रिका कमी मिळाल्याच्या तक्रारी शहरातील अनेक शाळांनी केल्यानंतर वाटप केंद्राने शाळांना प्रश्नपत्रिकांची झेरॉक्स काढण्याचा सल्ला दिल्याची तक्रार अनेक शिक्षकांनी केली आहे. ज्या यंत्रणेकडे प्रश्नपत्रिकेच्या गोपनीयतेची जबाबदारी आहे त्यांच्याकडून झेरॉक्स काढण्याचा सल्ला देण्यात येत असल्याने शिक्षकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, दोन महिने अगोदर प्रश्नपत्रिकांची मागणी नोंदवूनही वाटपाचे नियोजन फसल्याने शिक्षण विभागाच्या यंत्रणेविषयी शंका उपस्थित करण्यात आली. शहरातील एका बड्या शाळेला तब्बल ५००, तर इतर काही शाळांना ६० ते ७० प्रश्नपत्रिका कमी आल्याच्या तक्रारी बुधवारी नोंदविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रश्नपत्रिका कमी आल्याचे लेखीपत्र मुख्याध्यापकांकडून घेण्यात येत होते. अर्थात असा कोणताही प्रकार झाला नसून पुरेपूर प्रश्नपत्रिका पुरविण्यात आल्याचा दावा येथील केंद्राकडून करण्यात आला.