शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

नियोजनाचा अभाव : सुरक्षिततेचे गांभीर्य नसल्याचेही उघड प्रश्नपत्रिका वाटपात गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:06 IST

महाराष्टÑ विद्या प्राधिकरणाच्या वतीने इयत्ता पहिली ते आठवीसाठी शाळांना देण्यात येणाºया प्रश्नपत्रिका सलग दुसºया दिवशी कमी पडल्याने ऐन परीक्षेत शाळा प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.

ठळक मुद्देसप्टेंबरमध्ये अशाच प्रकारचा गोंधळपरीक्षेला प्रश्नपत्रिका वाटपाचा प्रचंड गोंधळ ऐनवेळी यंत्रणेला धावाधाव करावी लागलीपुरेपूर प्रश्नपत्रिका पुरविण्यात आल्याचा दावा

नाशिक : महाराष्टÑ विद्या प्राधिकरणाच्या वतीने इयत्ता पहिली ते आठवीसाठी शाळांना देण्यात येणाºया प्रश्नपत्रिका सलग दुसºया दिवशी कमी पडल्याने ऐन परीक्षेत शाळा प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. धावाधाव केल्यानंतर शहरातील शाळांना प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्याही मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा झेरॉक्स प्रश्नपत्रिकेवर घ्यावी लागल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये अशाच प्रकारचा गोंधळ होऊनही शिक्षण विभागाने कोणताही धडा घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.शासनाच्या आदेशान्वये यंदा दिवाळीनंतर सहामाही परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील शाळांनी दोन महिन्यांपूर्वीच विद्यार्थी संख्या आणि माध्यमनिहाय प्रश्नपत्रिकांची मागणी नोंदविलेली आहे. असे असतानाही बुधवार आणि गुरुवारीही भाषा आणि इंग्रजी विषयाच्या परीक्षेला प्रश्नपत्रिका वाटपाचा प्रचंड गोंधळ निर्माण झाला. शहरातील अनेक शाळांना प्रश्नपत्रिका मिळाल्याच नसल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित शाळाच्या यंत्रणेची धावपळ झाली. काही ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळांना सेमी इंग्रजीच्या, तर सेमी इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका मराठी माध्यमांना मिळाल्याने ऐनवेळी यंत्रणेला धावाधाव करावी लागली. प्रश्नपत्रिका कमी मिळाल्याच्या तक्रारी शहरातील अनेक शाळांनी केल्यानंतर वाटप केंद्राने शाळांना प्रश्नपत्रिकांची झेरॉक्स काढण्याचा सल्ला दिल्याची तक्रार अनेक शिक्षकांनी केली आहे. ज्या यंत्रणेकडे प्रश्नपत्रिकेच्या गोपनीयतेची जबाबदारी आहे त्यांच्याकडून झेरॉक्स काढण्याचा सल्ला देण्यात येत असल्याने शिक्षकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, दोन महिने अगोदर प्रश्नपत्रिकांची मागणी नोंदवूनही वाटपाचे नियोजन फसल्याने शिक्षण विभागाच्या यंत्रणेविषयी शंका उपस्थित करण्यात आली. शहरातील एका बड्या शाळेला तब्बल ५००, तर इतर काही शाळांना ६० ते ७० प्रश्नपत्रिका कमी आल्याच्या तक्रारी बुधवारी नोंदविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रश्नपत्रिका कमी आल्याचे लेखीपत्र मुख्याध्यापकांकडून घेण्यात येत होते. अर्थात असा कोणताही प्रकार झाला नसून पुरेपूर प्रश्नपत्रिका पुरविण्यात आल्याचा दावा येथील केंद्राकडून करण्यात आला.