शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

ज्ञानातून व्हावी समाजाची जडणघडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:15 IST

आपण समाजासाठी आपल्या ज्ञानाचा कितपत उपयोग करतो, याचे आत्मपरीक्षण पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी करावे. आपला सर्वांगीण विकास शिक्षणाच्या माध्यमातून साधताना समाजाच्या जडणघडणीसाठी आत्मसात केलेल्या ज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना केले.

नाशिक : आपण समाजासाठी आपल्या ज्ञानाचा कितपत उपयोग करतो, याचे आत्मपरीक्षण पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी करावे. आपला सर्वांगीण विकास शिक्षणाच्या माध्यमातून साधताना समाजाच्या जडणघडणीसाठी आत्मसात केलेल्या ज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना केले.  निमित्त होते, मराठा विद्या प्रसारक समाजाच्या तृतीय पदवीप्रदान सोहळ्याचे. गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात सोमवारी (दि.१२) पार पडलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार होत्या. तसेच नाना महाले, भाऊसाहेब खातळे, सचिन पिंगळे, हेमंत वाजे, प्रा. नानासाहेब दाते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी चव्हाण म्हणाले, स्पर्धेच्या या युगात स्वत:ला टिकवून सिद्ध करण्यासाठी अभ्यासासोबत माहिती-तंत्रज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे. एकूण आपले व्यक्तिमत्त्व ‘स्मार्ट’ करण्यावर भर द्यावा.  मंगेश पाडगावकर लिखित ‘ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान’ या विद्यापीठ गीताने पदवीप्रदान सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. सूत्रसंचालन तुषार पाटील व डॉ. सुरेश जाधव यांनी केले. सिडको महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांनी आभार मानले. विद्यापीठामध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त मविप्र संस्थेच्या नऊ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना चव्हाण यांच्या हस्ते पदवीप्रदान करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी पदवीग्रहण क रण्याप्रसंगी असलेला विशेष गणवेश परिधान केला होता. याबरोबरच व्यासपीठावर मान्यवरांनीही पदवीदान करतानाचा गणवेश परिधान केला होता.

टॅग्स :educationशैक्षणिकStudentविद्यार्थी