शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
4
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
5
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
6
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
7
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
8
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
9
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
10
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
11
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
12
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
13
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
14
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
15
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
16
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
17
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
18
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
19
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
20
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले

दिंड्यांनाही नोटाबंदीचा फटका

By admin | Updated: January 21, 2017 00:07 IST

संत निवृत्तिनाथ यात्रा : वारकऱ्यांची संख्या यंदा निम्म्याने घटली

भाग्यश्री मुळे :  नाशिकवाढती थंडी, नोटाबंदीमुळे आर्थिक चणचण, अपुरी शेतीची कामे आदि विविध कारणांमुळे यंदा त्र्यंबकेश्वरच्या निवृत्तिनाथ यात्रेला येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या निम्म्याने घटली आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने वारकरी असणाऱ्या दिंड्या यावर्षी छोट्या झाल्याचे दिसून येत आहे. आर्थिक घडी सुरळीत झाल्यानंतर यावर्षी नाही, तर पुढील वर्षी दिंडीबरोबर यात्रेला जाऊ, असा पवित्रा घेत बहुतांशी वारकऱ्यांनी यंदा घरीच राहणे पसंत केले आहे. नाशिकमध्ये दाखल झालेल्या दिंड्यांशी संवाद साधला असता त्यातील वारकऱ्यांनीही या गोष्टीशी सहमती दर्शविली.  नोव्हेंबरमध्ये मोदी सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर गत अडीच महिन्यांपासून देशातील आर्थिक घडी विस्कळीत झाली असून, सर्वच क्षेत्रांमध्ये त्याचा परिणाम दिसून येत आहे. दरवर्षी शेतीची कामे मार्गी लावून श्रद्धेने संत निवृत्तिनाथ महाराज यांच्या यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दिंडीद्वारे श्रद्धेने पायी त्र्यंबकनगरीला येत असतात. आबालवृद्धांचा त्यात सक्रिय सहभाग असतो. यंदा दिंड्यांमधील वारकऱ्यांची संख्या रोडावल्याचे चित्र दिसून येत आहे. त्या कारणांचा शोध घेतला असता नोटाबंदीनंतर प्रामुख्याने शेतीकामावर अवलंबून असणाऱ्या वारकऱ्यांना पैशांची जाणवत असलेली चणचण, रेंगाळलेली शेतीकामे आणि वाढती थंडी या गोष्टी समोर आल्या. आर्थिक संकटात सापडल्याने वारकऱ्यांनाही यंदा माउलींच्या सेवेऐवजी कुटुंबाची आर्थिक घडी बसवण्याला प्राधान्य द्यावे लागत असल्याचे दिसून येत आहे. दिंड्यांबरोबरच त्र्यंबकेश्वरी भरणाऱ्या यात्रेलाही आर्थिक फटका बसतो की काय, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.