शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

दिंड्यांनाही नोटाबंदीचा फटका

By admin | Updated: January 21, 2017 00:07 IST

संत निवृत्तिनाथ यात्रा : वारकऱ्यांची संख्या यंदा निम्म्याने घटली

भाग्यश्री मुळे :  नाशिकवाढती थंडी, नोटाबंदीमुळे आर्थिक चणचण, अपुरी शेतीची कामे आदि विविध कारणांमुळे यंदा त्र्यंबकेश्वरच्या निवृत्तिनाथ यात्रेला येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या निम्म्याने घटली आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने वारकरी असणाऱ्या दिंड्या यावर्षी छोट्या झाल्याचे दिसून येत आहे. आर्थिक घडी सुरळीत झाल्यानंतर यावर्षी नाही, तर पुढील वर्षी दिंडीबरोबर यात्रेला जाऊ, असा पवित्रा घेत बहुतांशी वारकऱ्यांनी यंदा घरीच राहणे पसंत केले आहे. नाशिकमध्ये दाखल झालेल्या दिंड्यांशी संवाद साधला असता त्यातील वारकऱ्यांनीही या गोष्टीशी सहमती दर्शविली.  नोव्हेंबरमध्ये मोदी सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर गत अडीच महिन्यांपासून देशातील आर्थिक घडी विस्कळीत झाली असून, सर्वच क्षेत्रांमध्ये त्याचा परिणाम दिसून येत आहे. दरवर्षी शेतीची कामे मार्गी लावून श्रद्धेने संत निवृत्तिनाथ महाराज यांच्या यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दिंडीद्वारे श्रद्धेने पायी त्र्यंबकनगरीला येत असतात. आबालवृद्धांचा त्यात सक्रिय सहभाग असतो. यंदा दिंड्यांमधील वारकऱ्यांची संख्या रोडावल्याचे चित्र दिसून येत आहे. त्या कारणांचा शोध घेतला असता नोटाबंदीनंतर प्रामुख्याने शेतीकामावर अवलंबून असणाऱ्या वारकऱ्यांना पैशांची जाणवत असलेली चणचण, रेंगाळलेली शेतीकामे आणि वाढती थंडी या गोष्टी समोर आल्या. आर्थिक संकटात सापडल्याने वारकऱ्यांनाही यंदा माउलींच्या सेवेऐवजी कुटुंबाची आर्थिक घडी बसवण्याला प्राधान्य द्यावे लागत असल्याचे दिसून येत आहे. दिंड्यांबरोबरच त्र्यंबकेश्वरी भरणाऱ्या यात्रेलाही आर्थिक फटका बसतो की काय, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.