शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

शिक्षणासह संस्कारांची रुजवणूकही महत्त्वाची  : किरण अग्रवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:14 IST

सोशल मीडियाच्या वाढत्या कोलाहलात विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याबरोबरच त्यांच्यात संस्कारांची रुजवणूक करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी केले.  येथील श्री महावीर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या शुभारंभ-प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रह्मेचा होते.

लासलगाव : सोशल मीडियाच्या वाढत्या कोलाहलात विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याबरोबरच त्यांच्यात संस्कारांची रुजवणूक करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी केले.  येथील श्री महावीर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या शुभारंभ-प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रह्मेचा होते. व्यासपीठावर जैन सोशल ग्रुपच्या महाराष्टÑ रिजनल कमेटीचे चेअरमन सतीश कोठारी, शिवसेनेचे निफाड तालुका अध्यक्ष सुधीर कराड, नाशिकचे सनदी लेखपाल प्रफुल्ल बरडिया, महावीर विद्यालयाचे अध्यक्ष सुनील आबड, जैन प्राथमिक शिक्षण मंदिराचे अध्यक्ष महावीर चोपडा, कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रह्मेचा, मानद सचिव शांतीलाल जैन, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन बरडिया, अमित जैन, मनोज रेदासणी, संतोष ब्रह्मेचा, महावीर विद्यालयाचे प्राचार्य डी. एस. डुंगरवाल, मुख्याध्यापिका नलिनी शिंदे, प्राचार्य एस.बी. हांडगे व जैन वसतिगृहाचे अधीक्षक डी.एस. कोल्हापुरे उपस्थित होते.  महावीर विद्यालयाच्या वाटचालीचा गौरवपूर्ण उल्लेख करीत अग्रवाल पुढे म्हणाले, शालेय अवस्थेत शिक्षण घेताना विद्यार्थी मातीच्या गोळ्यासारखे असतात, त्यांना जसा आकार दिला जातो तसा त्यांच्या जीवनाला आकार प्राप्त होतो. यासाठी संविधानाला अभिप्रेत असलेली समता, ममता व बंधुत्व या सुसंस्कारांची शिकवण मोलाची ठरणार असून, आजच्या बदलत्या सामाजिक वातावरणात हेच बाळकडू मुलांच्या प्रगतीसाठी पूरक ठरेल, असेही अग्रवाल यांनी नमूद केले. याप्रसंगी स्वागत सुनील आबड यांनी केले, तर कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रह्मेचा यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. प्राचार्य दिलीप डुंगरवाल यांनी शालेय प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी कोठारी, बरडिया यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन पारस लोहाडे, आर्या चोरडिया, तन्वी देशमुख, प्रथमेश कुलकर्णी, पृथ्वीराज पाटील, नूपुर जैन यांनी, तर आभार मधुकर बोडखे यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.विद्यार्थ्यांना दिली शपथ़़़‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी मार्गदर्शन करीत असताना अचानक व्यासपीठाखाली येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अशाप्रकारच्या अनपेक्षित संवादामुळे कार्यक्रमाचा माहोलच बदलून गेला. यावेळी अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना ‘मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी एका वृक्षाची लागवड करून त्याचे संवर्धन करणार, प्लॅस्टिक पिशवी न वापरता पर्यावरणाचे रक्षण करणार व स्वत:चे घर-अंगण रोज स्वच्छ ठेवणार’ अशा तीन शपथ दिल्या. विद्यार्थ्यांनीही हात पुढे करून उंच स्वरात उत्साहपूर्ण वातावरणात शपथ घेतल्या.

टॅग्स :Schoolशाळा