शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

राजेंनी सर्व समाजाचा विचार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 00:48 IST

नाशिक: राजे हे कोणा एका समाजाचे व धर्माचे नसतात तर ते सर्व जनतेचे राजे असतात. त्यामुळे त्यांनी सर्व समाजाचा विचार करावा, असा टोला राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी छत्रपती संभाजीराजे यांना लगावला. त्याच बरोबर सध्या सुरू असलेले शाब्दिक वाद थांबवावेत असे मतही व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देछगन भुजबळ : संभाजीराजे यांना टोला

नाशिक: राजे हे कोणा एका समाजाचे व धर्माचे नसतात तर ते सर्व जनतेचे राजे असतात. त्यामुळे त्यांनी सर्व समाजाचा विचार करावा, असा टोला राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी छत्रपती संभाजीराजे यांना लगावला. त्याच बरोबर सध्या सुरू असलेले शाब्दिक वाद थांबवावेत असे मतही व्यक्त केले आहे.सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्नावर संभाजीराजे यांनी तलवार काढू या वक्त्यव्याने वाद सुरू असून त्यावर पत्रकार परिषदेत बोलताना भुजबळ यांनी, राजे तलवारीचा उपयोग ओबीसी वर करतात की आदिवासीवर हा प्रश्न उपस्थित होत असून, मराठा-ओबीसी हे भांडण आता थांबायला हवे, तलवारी नाही पण शब्दांची खणखण देखील थांबायला हवी अशी भूमिकाही त्यांनी मांडली. एमपीएससीच्या परीक्षा रद्द करू नये ही बहुजन समाज विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांची भूमिका रास्तच होती. ते स्वत: त्या खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे त्यांचे बोलणे समजून घेतले जाव,े असे सांगून भुजबळ यांनी वडेट्टीवार यांचे समर्थन केले. एमपीएससी परीक्षा रद्द करू नये हे माझे व्यक्तीगत मत आहे, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जास्त काही बोलता येणार नाही. पण परीक्षा झाली पाहिजे असे काहींचे म्हणणे होते. आता पुन्हा परिक्षेबाबत आयोग व मुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.सुशांतप्रकरणी राजकारणसुशांतसिंग राजपूत प्रकरण मिटत असल्याने काही लोक राजकारण करण्यासाठी राज्यात काही तरी झाले पाहिजे अशा प्रयत्नात आहेत. अशा वेळी राज्यातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी सर्वांनीच घेण्याची गरज असल्याचे सांगून भुजबळ यांनी, महाराष्ट्रातील कांद्याला निर्यात बंदी लादून केंद्र सरकार दुजाभाव करीत असल्याचा आरोप केला.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणChagan Bhujbalछगन भुजबळ