शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

खेडलेझुंगे परिसरात द्राक्ष मण्यांना तडे, बागायतदार हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 17:20 IST

खेडलेझुंगे : मागील आठवड्यापासून वातावरणातील सततच्या बदलामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. वातावरणातील बदलामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडत चालला आहे. मागील ३/४ दिवसांपासून अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, धुके, दव, कडाक्याचा गारठा, यामुळे पाणी उतरलेल्या/साखर उतरलेल्या द्राक्षांच्या मण्यांना तडे जात आहेत. त्यामुळे परिसरातील द्राक्ष बागायतदारांचे नुकसान होत आहे. अर्ली द्राक्ष बागायतादारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करून वाचविलेल्या बागा अवकाळीमुळे नुकसानग्रस्त होत आहेत. त्यामुळे शेतकरी पूर्णतः हतबल झालेला आहे. 

मागील वर्षीचे काढणीला आलेले पीक कोविड १९ मुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये सापडले. बाजारपेठा कधी चालू तर कधी बंद, निर्यात बंदी, शेतीमालाला नसलेला भाव, यामुळे मागील वर्षीचे नुकसान सहन करीत नव्याने या वर्षी केलेली मशागत आणि खर्चही अवकाळीमुळे वाया जाणार असल्याचे चिन्ह परिसरात दिसून येत आहे. डाळिंब बागायतदार यांनी फळधारणा जोमाने होण्यासाठी बगीचांना पाण्याचा ताण देण्यास सुरुवात केलेली असतानाच, झालेल्या पावसामुळे त्यांच्याही पदरी निराशा पडलेली आहे. त्यामुळे या वर्षी द्राक्ष आणि डाळिंब बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. घडांवर पाणी शिल्लक राहत असल्याने, घड सडू लागले आहेत. मणी क्रॅक झाल्याने पूर्ण घड सडणार आहे. मावा, तुडतुडे यांसारख्या किटकांचा वावर वाढणार आहे. त्यामुळे किटकनाशकांचा खर्च वाढणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती