शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

पावसाच्या ओढीमुळे खरीप हंगाम लांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 16:52 IST

सायखेडा : मृग नक्षत्राच्या सुरुवातीला दमदार सुरुवात केलेल्या पावसाने अचानक ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांची पेरणी आणि नगदी पिकांची लागवड लांबली असून, पाऊस पडत नसल्याने बळीराजा चिंतित आहे.

ठळक मुद्देगोदाकाठ परिसरात बळीराजा चिंतित

सायखेडा : मृग नक्षत्राच्या सुरुवातीला दमदार सुरुवात केलेल्या पावसाने अचानक ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांची पेरणी आणि नगदी पिकांची लागवड लांबली असून, पाऊस पडत नसल्याने बळीराजा चिंतित आहे.जून महिना सुरू झाला आणि पावसाने हजेरी लावली होती. पाऊस वेळेवर दाखल झाल्याचा आनंद शेतकऱ्यांना झाला मात्र हा आनंद फार दिवस टिकला नाही, केवळ पाच दिवस जोरदार पाऊस बरसला आणि पावसाने दडी मारली. त्यामुळे पेरणीपूर्व मशागती झालेल्या जमिनीत बी पेरण्याची कामे शेतकऱ्यांना थांबवावी लागली. जमिनीत वापसा झाली; पण पाऊस पडत नसल्याचे चित्र निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना पेरणी थांबवावी लागली.

या हंगामात टमाटे, कोबी, फ्लॉवर, भाजीपाला यासारखे नगदी पिके घेतली जातात. चार पैसे मिळाले तर पुढील हंगामातील पिकांना भांडवल उभे करता येते मात्र पाऊस नसल्याने नगदी पिकांची लागवड थांबली आहे. रोपे तयार असूनही पाणी नसल्याने पीकलागवड करता येत नाही.मागील वर्षीच्या तुलनेत निम्मा पाऊस पडला आहे. मागील वर्षी जून महिन्याच्या मध्यवर्ती जिल्ह्यात सगळीकडे चांगला पाऊस पडला होता. पिकांची पेरणी आणि नगदी पिकांची लागवड वेळेत झाली होती. यंदा मात्र निम्मादेखील पाऊस पडला नसल्याने पेरणी करता येत नाही. अशा परिस्थिती पेरणी केली तर ती वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवल्या आहेत.जून महिन्यात पावसाला जोरात सुरुवात झाल्याने यंदा पाऊस वेळेवर पडेल अशी अपेक्षा होती. पण अवघ्या चार दिवसात पाऊस थांबला आणि मशागत करून ठेवलेल्या जमिनीवरील पेरणी थांबवली. नगदी पिकांची लागवड करायचा हंगाम असलातरी पाऊस पडत नसल्याने पिकांची लागवड झालेली नाही. खरीप हंगाम लांबला तर वर्षातील सर्व पिके उशिरा येऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे लवकरात लवकर पाऊस पडला पाहिजे.-दत्तू भुसारे, शेतकरी, भुसे 

 

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस