शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

पावसाच्या ओढीमुळे खरीप हंगाम लांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 16:52 IST

सायखेडा : मृग नक्षत्राच्या सुरुवातीला दमदार सुरुवात केलेल्या पावसाने अचानक ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांची पेरणी आणि नगदी पिकांची लागवड लांबली असून, पाऊस पडत नसल्याने बळीराजा चिंतित आहे.

ठळक मुद्देगोदाकाठ परिसरात बळीराजा चिंतित

सायखेडा : मृग नक्षत्राच्या सुरुवातीला दमदार सुरुवात केलेल्या पावसाने अचानक ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांची पेरणी आणि नगदी पिकांची लागवड लांबली असून, पाऊस पडत नसल्याने बळीराजा चिंतित आहे.जून महिना सुरू झाला आणि पावसाने हजेरी लावली होती. पाऊस वेळेवर दाखल झाल्याचा आनंद शेतकऱ्यांना झाला मात्र हा आनंद फार दिवस टिकला नाही, केवळ पाच दिवस जोरदार पाऊस बरसला आणि पावसाने दडी मारली. त्यामुळे पेरणीपूर्व मशागती झालेल्या जमिनीत बी पेरण्याची कामे शेतकऱ्यांना थांबवावी लागली. जमिनीत वापसा झाली; पण पाऊस पडत नसल्याचे चित्र निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना पेरणी थांबवावी लागली.

या हंगामात टमाटे, कोबी, फ्लॉवर, भाजीपाला यासारखे नगदी पिके घेतली जातात. चार पैसे मिळाले तर पुढील हंगामातील पिकांना भांडवल उभे करता येते मात्र पाऊस नसल्याने नगदी पिकांची लागवड थांबली आहे. रोपे तयार असूनही पाणी नसल्याने पीकलागवड करता येत नाही.मागील वर्षीच्या तुलनेत निम्मा पाऊस पडला आहे. मागील वर्षी जून महिन्याच्या मध्यवर्ती जिल्ह्यात सगळीकडे चांगला पाऊस पडला होता. पिकांची पेरणी आणि नगदी पिकांची लागवड वेळेत झाली होती. यंदा मात्र निम्मादेखील पाऊस पडला नसल्याने पेरणी करता येत नाही. अशा परिस्थिती पेरणी केली तर ती वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवल्या आहेत.जून महिन्यात पावसाला जोरात सुरुवात झाल्याने यंदा पाऊस वेळेवर पडेल अशी अपेक्षा होती. पण अवघ्या चार दिवसात पाऊस थांबला आणि मशागत करून ठेवलेल्या जमिनीवरील पेरणी थांबवली. नगदी पिकांची लागवड करायचा हंगाम असलातरी पाऊस पडत नसल्याने पिकांची लागवड झालेली नाही. खरीप हंगाम लांबला तर वर्षातील सर्व पिके उशिरा येऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे लवकरात लवकर पाऊस पडला पाहिजे.-दत्तू भुसारे, शेतकरी, भुसे 

 

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस