शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी खरीप धोक्यात

By admin | Updated: July 18, 2014 00:35 IST

पावसाअभावी खरीप धोक्यात

नायगाव : सलग चौथ्या वर्षीही पावसाने पाठ फिरवल्याने यंदाही खरीप हंगाम धोक्यात आला असून, पाणी, चाराटंचाईने बळी राजा हवालदिल झाला आहे. आषाढ महिन्यात पेरण्या होऊ न शकल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे.वाढती महागाई, सर्वच जलस्रोत कोरडेठाक पडल्याने निर्माण झालेली पाणीटंचाई, चारा मिळणेही दुरापास्त झाल्याने पशुधन कसे वाचवायचे या विवंचनेत बळीराजा सापडला आहे. जुलै महिना अर्ध्यावर आला तरीही पाऊस होत नसल्याने अनेक पिकांची पेरणी यापुढे अशक्य झाल्याने यंदा बळी राजाच्या हातात खरीप हंगामातील पिके लागणार नसल्याचे चिन्ह दिसू लागली आहेत. नायगाव खोऱ्यासह सिन्नर तालुक्यावर गेल्या चार वर्षांपासून पावसाने अवकृपा केल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यंदाही अद्यापही पावसाने हुलकावणी दिल्याने परिस्थिती कमालीची बिकट बनली आहे. पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने पाण्याची पातळी खोलवर जात आहे. परिसरातील सर्वच गावांना व वाड्यावस्त्यांना पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांपैकी जून व जुलै हे दोन महिने खरिपासाठी महत्त्वाचे असून, तेही कोरडे गेल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. सर्वच लागवडीयोग्य क्षेत्र सध्या रिकामे असल्यामुळे शेतकऱ्यांबरोबर मजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्यांची स्थिती बिकट बनली असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. जून महिन्यापासून अधूनमधून निर्माण होणारे पावसाचे वातावरण आजही तयार होत, मात्र आभाळात जमा होणारे काळे ढग जमिनीच्या दिशेने जाण्याऐवजी जोरदार वाऱ्यामुळे वरच्यावरच विरळून जात आहेत. त्यामुळे आभाळमाया बरसत नसल्याने हवामान खात्याचे अंदाजही खरे ठरत नसल्याने पावसाचे काम राम भरोसे बनले आहे. अशा परिस्थितीतही आज ना उद्या पडेल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील भाजीपाल्याची रोपे तयार केली आहे. ती रोपे आता लागवडीसाठी तयार झाली आहेत. मात्र पाण्याअभावी ही रोपे इतरत्र विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर असलेली रोपे घेण्यास कोणीही धजावत नसल्याने रोपे घ्या रोपे असे म्हणण्याची वेळ आली आहे. सध्या वातावरणात बदल घडत असताना केव्हा दमट हवामान निर्माण होऊन ढगांची गर्दी होते काही वेळा थंडगार वाऱ्याची झुळूक येऊन वातावरणात थंडीची चाहूल लागते. भरदुपारी तर उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहे. (वार्ताहर)