शहरं
Join us  
Trending Stories
1
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
2
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
3
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
4
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
5
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
6
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
7
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
8
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
9
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
10
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
11
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
12
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
13
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
14
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
15
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
16
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
17
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
18
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
19
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
20
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  

पावसाअभावी खरीप धोक्यात

By admin | Updated: July 18, 2014 00:35 IST

पावसाअभावी खरीप धोक्यात

नायगाव : सलग चौथ्या वर्षीही पावसाने पाठ फिरवल्याने यंदाही खरीप हंगाम धोक्यात आला असून, पाणी, चाराटंचाईने बळी राजा हवालदिल झाला आहे. आषाढ महिन्यात पेरण्या होऊ न शकल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे.वाढती महागाई, सर्वच जलस्रोत कोरडेठाक पडल्याने निर्माण झालेली पाणीटंचाई, चारा मिळणेही दुरापास्त झाल्याने पशुधन कसे वाचवायचे या विवंचनेत बळीराजा सापडला आहे. जुलै महिना अर्ध्यावर आला तरीही पाऊस होत नसल्याने अनेक पिकांची पेरणी यापुढे अशक्य झाल्याने यंदा बळी राजाच्या हातात खरीप हंगामातील पिके लागणार नसल्याचे चिन्ह दिसू लागली आहेत. नायगाव खोऱ्यासह सिन्नर तालुक्यावर गेल्या चार वर्षांपासून पावसाने अवकृपा केल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यंदाही अद्यापही पावसाने हुलकावणी दिल्याने परिस्थिती कमालीची बिकट बनली आहे. पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने पाण्याची पातळी खोलवर जात आहे. परिसरातील सर्वच गावांना व वाड्यावस्त्यांना पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांपैकी जून व जुलै हे दोन महिने खरिपासाठी महत्त्वाचे असून, तेही कोरडे गेल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. सर्वच लागवडीयोग्य क्षेत्र सध्या रिकामे असल्यामुळे शेतकऱ्यांबरोबर मजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्यांची स्थिती बिकट बनली असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. जून महिन्यापासून अधूनमधून निर्माण होणारे पावसाचे वातावरण आजही तयार होत, मात्र आभाळात जमा होणारे काळे ढग जमिनीच्या दिशेने जाण्याऐवजी जोरदार वाऱ्यामुळे वरच्यावरच विरळून जात आहेत. त्यामुळे आभाळमाया बरसत नसल्याने हवामान खात्याचे अंदाजही खरे ठरत नसल्याने पावसाचे काम राम भरोसे बनले आहे. अशा परिस्थितीतही आज ना उद्या पडेल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील भाजीपाल्याची रोपे तयार केली आहे. ती रोपे आता लागवडीसाठी तयार झाली आहेत. मात्र पाण्याअभावी ही रोपे इतरत्र विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर असलेली रोपे घेण्यास कोणीही धजावत नसल्याने रोपे घ्या रोपे असे म्हणण्याची वेळ आली आहे. सध्या वातावरणात बदल घडत असताना केव्हा दमट हवामान निर्माण होऊन ढगांची गर्दी होते काही वेळा थंडगार वाऱ्याची झुळूक येऊन वातावरणात थंडीची चाहूल लागते. भरदुपारी तर उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहे. (वार्ताहर)