शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

महापालिकेत खांदेपालट

By admin | Updated: January 25, 2016 23:03 IST

बदल्यांची हंडी फुटली : पहिल्या टप्प्यात २४९ कर्मचारी

नाशिक : गेल्या महिनाभरापासून महापालिकेत चर्चेत असलेली बदल्यांची हंडी अखेर फुटली असून, पहिल्या टप्प्यात ११ संवर्गातील २४९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश प्रशासनाने काढले आहेत. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बदलीजागेवर रुजू न झाल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात तांत्रिक संवर्गातील, तर तिसऱ्या टप्प्यात वरिष्ठ-कनिष्ठ लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार असल्याची माहिती प्रशासन उपआयुक्त विजय पगार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी तीन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ एकाच जागेवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार, गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून प्रशासकीय स्तरावर माहिती संकलनाची कार्यवाही सुरू होती. अखेर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रशासनाने बदल्यांची हंडी एकदाची फोडली. पहिल्या टप्प्यात ११ संवर्गातील २४९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात सहायक आयुक्त, अधीक्षक, सहायक अधीक्षक, नाईक/दप्तरी, शिपाई, कनिष्ठ अभियंता विद्युत, इलेक्ट्रिशियन, मिस्तरी, रोड मुकादम, उद्यान निरीक्षक आणि हेड माळी यांचा समावेश आहे. बदल्यांच्या प्रक्रियेबाबत विजय पगार यांनी सांगितले की, ३० सप्टेंबर २०१५ रोजी ज्यांचा कालावधी तीन वर्षे किंवा त्याहून अधिक झाला आहे, त्यांनाच बदलीपात्र ठरविण्यात आले आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी, नाईक/दप्तरी, शिपाई, बिगारी आदि पदांवरील बदलीपात्र कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ८० टक्के आढळून आली. परंतु कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून या पदांसाठी १२ वर्षे व त्यावरील कालावधी निश्चित करण्यात आला. सुमारे २२ संवर्गामध्ये १११० कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. तांत्रिक संवर्गातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक कनिष्ठ अभियंता, बिगारी, फायरमन, माळी, विभागीय स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक या सुमारे ५३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या दुसऱ्या टप्प्यात येत्या १५ ते २० दिवसांत करण्यात येणार आहेत. सध्या करवसुलीवर परिणाम होऊ नये यासाठी वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक या संवर्गातील सुमारे ३५५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या तिसऱ्या टप्प्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार आहेत. सदर बदल्या करताना विभागनिहाय गरजेनुसार पदांचे वाटप करण्यात आल्याची माहितीही पगार यांनी दिली. नगररचना विभागात ज्यांना पदे हवीत त्यांना जबाबदाऱ्याही पेलाव्या लागणार आहेत. त्यासाठी त्यांची पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्ती होणार आहे. येत्या ३० जानेवारीपर्यंत बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी आपल्या बदलीच्या ठिकाणी रुजू व्हायचे आहे. आदेशाचे पालन न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचेही पगार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)