शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत खांदेपालट

By admin | Updated: January 25, 2016 23:03 IST

बदल्यांची हंडी फुटली : पहिल्या टप्प्यात २४९ कर्मचारी

नाशिक : गेल्या महिनाभरापासून महापालिकेत चर्चेत असलेली बदल्यांची हंडी अखेर फुटली असून, पहिल्या टप्प्यात ११ संवर्गातील २४९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश प्रशासनाने काढले आहेत. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बदलीजागेवर रुजू न झाल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात तांत्रिक संवर्गातील, तर तिसऱ्या टप्प्यात वरिष्ठ-कनिष्ठ लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार असल्याची माहिती प्रशासन उपआयुक्त विजय पगार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी तीन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ एकाच जागेवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार, गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून प्रशासकीय स्तरावर माहिती संकलनाची कार्यवाही सुरू होती. अखेर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रशासनाने बदल्यांची हंडी एकदाची फोडली. पहिल्या टप्प्यात ११ संवर्गातील २४९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात सहायक आयुक्त, अधीक्षक, सहायक अधीक्षक, नाईक/दप्तरी, शिपाई, कनिष्ठ अभियंता विद्युत, इलेक्ट्रिशियन, मिस्तरी, रोड मुकादम, उद्यान निरीक्षक आणि हेड माळी यांचा समावेश आहे. बदल्यांच्या प्रक्रियेबाबत विजय पगार यांनी सांगितले की, ३० सप्टेंबर २०१५ रोजी ज्यांचा कालावधी तीन वर्षे किंवा त्याहून अधिक झाला आहे, त्यांनाच बदलीपात्र ठरविण्यात आले आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी, नाईक/दप्तरी, शिपाई, बिगारी आदि पदांवरील बदलीपात्र कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ८० टक्के आढळून आली. परंतु कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून या पदांसाठी १२ वर्षे व त्यावरील कालावधी निश्चित करण्यात आला. सुमारे २२ संवर्गामध्ये १११० कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. तांत्रिक संवर्गातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक कनिष्ठ अभियंता, बिगारी, फायरमन, माळी, विभागीय स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक या सुमारे ५३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या दुसऱ्या टप्प्यात येत्या १५ ते २० दिवसांत करण्यात येणार आहेत. सध्या करवसुलीवर परिणाम होऊ नये यासाठी वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक या संवर्गातील सुमारे ३५५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या तिसऱ्या टप्प्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार आहेत. सदर बदल्या करताना विभागनिहाय गरजेनुसार पदांचे वाटप करण्यात आल्याची माहितीही पगार यांनी दिली. नगररचना विभागात ज्यांना पदे हवीत त्यांना जबाबदाऱ्याही पेलाव्या लागणार आहेत. त्यासाठी त्यांची पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्ती होणार आहे. येत्या ३० जानेवारीपर्यंत बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी आपल्या बदलीच्या ठिकाणी रुजू व्हायचे आहे. आदेशाचे पालन न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचेही पगार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)