शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

महापालिकेत खांदेपालट

By admin | Updated: January 25, 2016 23:03 IST

बदल्यांची हंडी फुटली : पहिल्या टप्प्यात २४९ कर्मचारी

नाशिक : गेल्या महिनाभरापासून महापालिकेत चर्चेत असलेली बदल्यांची हंडी अखेर फुटली असून, पहिल्या टप्प्यात ११ संवर्गातील २४९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश प्रशासनाने काढले आहेत. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बदलीजागेवर रुजू न झाल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात तांत्रिक संवर्गातील, तर तिसऱ्या टप्प्यात वरिष्ठ-कनिष्ठ लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार असल्याची माहिती प्रशासन उपआयुक्त विजय पगार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी तीन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ एकाच जागेवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार, गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून प्रशासकीय स्तरावर माहिती संकलनाची कार्यवाही सुरू होती. अखेर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रशासनाने बदल्यांची हंडी एकदाची फोडली. पहिल्या टप्प्यात ११ संवर्गातील २४९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात सहायक आयुक्त, अधीक्षक, सहायक अधीक्षक, नाईक/दप्तरी, शिपाई, कनिष्ठ अभियंता विद्युत, इलेक्ट्रिशियन, मिस्तरी, रोड मुकादम, उद्यान निरीक्षक आणि हेड माळी यांचा समावेश आहे. बदल्यांच्या प्रक्रियेबाबत विजय पगार यांनी सांगितले की, ३० सप्टेंबर २०१५ रोजी ज्यांचा कालावधी तीन वर्षे किंवा त्याहून अधिक झाला आहे, त्यांनाच बदलीपात्र ठरविण्यात आले आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी, नाईक/दप्तरी, शिपाई, बिगारी आदि पदांवरील बदलीपात्र कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ८० टक्के आढळून आली. परंतु कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून या पदांसाठी १२ वर्षे व त्यावरील कालावधी निश्चित करण्यात आला. सुमारे २२ संवर्गामध्ये १११० कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. तांत्रिक संवर्गातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक कनिष्ठ अभियंता, बिगारी, फायरमन, माळी, विभागीय स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक या सुमारे ५३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या दुसऱ्या टप्प्यात येत्या १५ ते २० दिवसांत करण्यात येणार आहेत. सध्या करवसुलीवर परिणाम होऊ नये यासाठी वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक या संवर्गातील सुमारे ३५५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या तिसऱ्या टप्प्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार आहेत. सदर बदल्या करताना विभागनिहाय गरजेनुसार पदांचे वाटप करण्यात आल्याची माहितीही पगार यांनी दिली. नगररचना विभागात ज्यांना पदे हवीत त्यांना जबाबदाऱ्याही पेलाव्या लागणार आहेत. त्यासाठी त्यांची पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्ती होणार आहे. येत्या ३० जानेवारीपर्यंत बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी आपल्या बदलीच्या ठिकाणी रुजू व्हायचे आहे. आदेशाचे पालन न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचेही पगार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)