शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

भाजपा नगरसेवकांमध्ये खदखद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 01:00 IST

महापालिकेत स्पष्ट बहुमत असूनही विकासकामांबाबत होत असलेली परवड, करवाढीवरून नागरिकांकडून जाब विचारला जात असताना पक्षनेतृत्वाने धारण केलेले मौन, शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्याविरुद्धचा वाढत चाललेला रोष आणि विधान परिषद निवडणुकीत विश्वासात न घेता होत असलेल्या राजकारणामुळे भाजपा नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर खदखद दिसून येत आहे.

नाशिक : महापालिकेत स्पष्ट बहुमत असूनही विकासकामांबाबत होत असलेली परवड, करवाढीवरून नागरिकांकडून जाब विचारला जात असताना पक्षनेतृत्वाने धारण केलेले मौन, शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्याविरुद्धचा वाढत चाललेला रोष आणि विधान परिषद निवडणुकीत विश्वासात न घेता होत असलेल्या राजकारणामुळे भाजपा नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर खदखद दिसून येत आहे. काही नगरसेवक उघडपणे स्थानिक पक्षनेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त करू लागल्याने येत्या काळात भाजपात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या त्रिसूत्रीमुळे मागील वर्षी मंजूर करण्यात आलेल्या अनेक विकासकामांना कात्री लागल्याने भाजपासह विरोधी नगरसेवकांमध्येही नाराजीचा सूर आहे. त्यातच, आयुक्तांनी अंदाजपत्रकातील तरतुदीनुसारच विकासकामे होणार असल्याचे स्पष्ट केल्याने कोणत्याही नव्या कामांचा प्रस्ताव प्रशासकीय पातळीवरून धुडकावला जाऊ लागला आहे. अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आलेली कामेच होतील आणि सदर कामांना अंदाजपत्रकीय विशेष महासभेतच प्रशासकीय मंजुरी मिळालेली असल्याने ती कामे पुन्हा महासभेवर येणार नाहीत. परिणामी, गेल्या तीन महिन्यांत झालेल्या महासभांमध्ये एकही प्रस्ताव दाखल होऊ शकलेला नाही. केवळ इतिवृत्तांना मंजुरी देण्याचेच काम महासभेला उरले आहे. नवीन कामे घेतली जाणार नसल्याने महापालिका मुख्यालयातील नगरसेवकांची वर्दळही रोडावली आहे. आयुक्तांनी तक्रारींसाठी एनएमसी ई-कनेक्ट हे मोबाइल अ‍ॅप आणल्याने आणि या अ‍ॅपवर नगरसेवकांनीही तक्रारी कराव्यात, असे सांगितले जात असल्याने नगरसेवकांचे नेमके काम काय? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. सत्तेत असूनही बेदखल केले जात असल्याने भाजपा नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीचा सूर दिसून येत आहे.खांदेपालटाची शक्यताभाजपाच्या हाती सत्ता येऊन सव्वा वर्षांचा कालावधी झाला आहे. या काळात ठोस अशी कोणतीही कामे न झाल्याने सत्ताधारी भाजपात कमालीचा रोष आहे. त्यातच आयुक्तांची ‘एकला चलो रे’ भूमिका असल्याने नगरसेवकांना काहीच काम उरले नसल्याची भावना बळावत चालली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून प्रभागातील कामेही ठप्प झालेली आहेत. मंजूर कामेही रद्द करण्यात आलेली आहेत. जून महिन्यात महापौरांसह पदाधिकाऱ्यांचा सव्वा वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. पालकमंत्र्यांनी यापूर्वीच या पदाधिकाºयांचे राजीनामे घेऊन ठेवलेले आहेत. त्यामुळे एकूणच स्थिती पाहता, जून महिन्यात खांदेपालट होण्याची शक्यता असून, भाजपा संघटन पातळीवरही मोठ्या प्रमाणावर फेरबदलाचे संकेत मिळत आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका