शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

तरसाळी ग्रामपंचायतीत सत्तेच्या चाव्या‘समर्थ’च्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 17:54 IST

वीरगाव : बागलाण तालुक्यातील तरसाळी येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत समर्थ ग्रामविकास या सत्ताधारी पॅनलने बाजी मारत सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी समर्थ ग्रामविकास पॅनलला सहा जागा मिळाल्या, तर विरोधी बंडूबाबा ग्रामविकास पॅनलला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले.

ठळक मुद्दे सत्ताधारी गटाला बहुमत; बंडूबाबा पॅनलला तीन जागा

येथील ग्रामपंचायतीची सत्ता वर्षानुवर्षे एका विशिष्ट गटाच्या हातातच राहिल्यानंतर पाच वर्षांपूर्वी लखन पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने ही सत्ता आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळविले होते. यानंतर पाच वर्षांच्या कालावधीत केलेल्या विकासकामांच्या जोरावर पवार यांचे सत्ताधारी पॅनल पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले होते. विरोधी बंडूबाबा ग्रामविकास पॅनलने सत्ताधारी गटापुढे मोठे आव्हान उभे केले होते. मात्र मतदारांनी सलग दुसऱ्यांदा पवार यांच्या सत्ताधारी गटाच्या हातीच सत्तेची चावी दिली. विजयी झालेल्या उमेदवार (कंसात मिळालेली मते) असे- वॉर्ड क्र. १ मधून दीपक रौंदळ (२७०), अर्चना रौंदळ (२८७), अनिता रौंदळ (२७१) वॉर्ड क्र. २ मध्ये लखन पवार (१८७), काळू पिंपळसे (१८४), निंबाबाई माळी (बिनविरोध), तर वॉर्ड क्र. ३ मध्ये नामदेव बोरसे (३३२), कमल गांगुर्डे (३१६), मंगल मोहन (३१२) यांचा समावेश आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी गटाला वॉर्ड क्र. १ मधील तीनही जागा मिळाल्या तर सत्ताधारी गटाला वॉर्ड क्र. २ व ३ मधील प्रत्येकी तीन अशा सहा जागा मिळाल्या.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत