शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

फक्त सर्वेक्षणासाठीच शहर स्वच्छ ठेवायचे का?

By संजय पाठक | Updated: January 17, 2020 15:48 IST

नाशिक- केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणा अंतर्गत महापालिका कामाला लागली आहे. महापालिकेत जणू कोणतेही नागरी कामे शिल्लकच नाहीत अशा रितीने प्रशासन कामाला लागले असून सर्व अधिकारी खाते प्रमुख केवळ स्वच्छता सर्वेक्षणासाठी जुंपण्यात आले आहेत. शहरात स्वच्छता असावी आणि त्यात पहिल्या दहात नव्हे तर पहिला नंबर नाशिकचा यावा याबाबत दुमत नाही. मात्र, स्वच्छता केवळ स्पर्धे पुरतीच हवी काय, इतर वेळी महापालिका इतक्या गांभिर्याने का घेत नाही हा खरा प्रश्न आहे.

ठळक मुद्देमनपाची धावपळ स्पर्धेपुरतीअन्य वेळी अस्वच्छता कायम

संजय पाठक,नाशिक- केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणा अंतर्गत महापालिका कामाला लागली आहे. महापालिकेत जणू कोणतेही नागरी कामे शिल्लकच नाहीत अशा रितीने प्रशासन कामाला लागले असून सर्व अधिकारी खाते प्रमुख केवळ स्वच्छता सर्वेक्षणासाठी जुंपण्यात आले आहेत. शहरात स्वच्छता असावी आणि त्यात पहिल्या दहात नव्हे तर पहिला नंबर नाशिकचा यावा याबाबत दुमत नाही. मात्र, स्वच्छता केवळ स्पर्धे पुरतीच हवी काय, इतर वेळी महापालिका इतक्या गांभिर्याने का घेत नाही हा खरा प्रश्न आहे.

केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये स्वच्छ शहर स्पर्धा सुरू झाली असून आता ती अंतिम टप्प्यात आहे. राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत स्वच्छता बऱ्या पैकी असते आणि यंत्रणा दखल घेतात, असे सांगितले जाते. कच-यावर शास्त्रीय पध्दतीने प्रक्रीया केली जाते. इतकेच नव्हे तर हॉस्पीटल वेस्टच्या कचºयावर देखील प्रक्रिया केली जाते. केवळ घन कचराच नाही परंतु सार्वजनिक ठिकाणी असलेली स्वच्छता, शाळा महाविद्यालये आणि बस- रेल्वे स्थानक या सर्वच भागातील स्वच्छता तपासली जाते. शौचालये आणि शासकिय कार्यालये देखील यात येतात. केंद्र सरकारने २०१६ मध्ये ही स्पर्धा आखली तेव्हा २०१६ मध्ये ७३ शहरांमध्ये नाशिकचा ३१ वा क्रमांक आला होता. २०१७ मध्ये हा क्रमांक घसरून थेट १५१ वर आला होता. अर्थात, त्यावेळी स्पर्धेत ४७४ शहर या सर्वेक्षणात सहभागी झाले होते. २०१८ मध्ये पाचशे शहरांमध्ये ६३ आणि २०१९ मध्ये ४ हजार २३७ शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक ६७ वा आला होता. त्यावेळी महापालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे होते आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतल्याने त्यावेळी टॉप टेन मध्ये नाशिक आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. परंतु त्यात यश आले नव्हते.

आता यावर्षी स्पर्धेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. ती चांगलीच आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहेत. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकरला म्हणून १३ हजार ४६० रूपयांचा दंड गेल्याच आठवड्यात वसुल करण्यात आला आहे. तर ओला आणि सुका कचरा वर्गीकरण न करणाºया १२ नागरीकांकडून ४८०० रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. मोकळ्या भूखंडावर कचरा टाकणाऱ्यांवर देखील दंडाचा बडगा उगारण्यात आला असून पाच हजार रूपये त्यातून जमा झाले आहे. महापालिकेची सर्व यंत्रणा अत्यंत कृती प्रवण झाली असून अस्वच्छतेविषयी आॅनलाईन तक्रार केली की, तत्काळ दखल देखील घेतली जाते. महापालिकेच्या सर्व खाते प्रमुखांना प्रभाग वाटून देण्यात आले असून दिवसभर रस्ते, कचºयाचे ब्लॅक स्पॉट, शौचालये, बस स्थानके असे सर्वच तपासून ते फोटो व्हॉटस अप ग्रुपवर शेअर करीत आहेत. त्यात जीओ टॅगींग असल्याने फसवणूकीची सोय नाही. कोणत्याही क्षणी केंद्र सरकारचे स्वच्छता पथक येणार असल्याने त्रस्त होऊनही अधिकारी गुमानपणे प्रभागात फिरत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळो ही शुभेच्छा परंतु केवळ सर्वेक्षणा पुरतेच हे चित्र मर्यादीत राहील का ही खरी शंका आहे.

स्वच्छ शहर सर्वेक्षण आल्याने सजग झालेली महापालिकेची यंत्रणा एरव्ही निद्रीस्त असते. घंटागाडया दिवसाआड येत असून सुध्दा तीन वर्षाेंसाठी एकदा ठेका दिल्यानंतर त्याकडे पहाण्यासाठी अधिका-यांना वेळ नसतो. घंटागाडी ठेकेदार आणि त्यांचे कर्मचारी एवढे बहाद्दर की, जीपीएसच्या नोंदी करण्या करीता केवळ घंटागाड्या फिरवणे सोडाच परंतु दुचाकीवर जीपीएस लावून फिरून येतात, तरी त्यांचा ठेका काढणे महापालिकेला शक्य होत नाही. ब्लॅक स्पॉट हटविण्यासाठी आता प्रयत्न होत असले तरी नंतर मात्र चौकातील - मोकळ्या भुखंडावरील कचरा देखील हटविला जात नाही. गोदावरी आणि नासर्डी नदीपात्राकडे तर सर्वेक्षण करणारे पथक न गेलेलेच बरे. त्यामुळे खूप यंत्रणा कामाला लागली असली तरी ती अशीच नियमीत राहावी. अन्यथा सर्वेक्षण संपल्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती. मग, केवळ महिनाभर राखलेल्या स्वच्छतेसाठीच हा पुरस्कार असेल तर काय उपयोग?

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान