शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
2
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
3
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
4
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
5
रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
6
Operation Sindoor Live Updates: अमृतसरवरील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळला
7
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
8
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
9
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
10
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
11
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
12
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
13
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
14
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
15
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
16
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
17
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
18
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
19
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
20
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’

काजवा महोत्सव : पर्यटकांच्या धिंगाण्याला लागणार चाप

By admin | Updated: May 22, 2017 15:54 IST

नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेरेषवरील परिसरात भरणाऱ्या काजवा महोत्सवामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण महिना ते दीड महिना कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरातील नैसर्गिक जैवविविधता धोक्यात येते.

नाशिक : नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेरेषवरील परिसरात भरणाऱ्या काजवा महोत्सवामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण महिना ते दीड महिना कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरातील नैसर्गिक जैवविविधता धोक्यात येते. पर्यटकांचा धिंगाणा सुरक्षेला तडा देणारा ठरतो. यामुळे या भागात वनविभाग व अकोला पोलीस ठाणेअंतर्गत गस्त वाढविली जाणार असून वाहनांची तपासणी केली जाणार आहे. मद्यप्राशनला संपुर्णपणे आळा घालून हा परिसर पर्यटकांच्या धिंगाण्यापासून सुरक्षित करण्यासाठी वनविभाग व वन्यजीव विभाग यावर्षी प्रयत्न करणार आहेत. काजवा महोत्सवाचे ‘ब्रॅन्डिंग’ मोठ्या प्रमाणात झाल्याने दरवर्षी या ठिकाणी सुमारे दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधीपर्यंत पर्यटकांची संध्याकाळपासून तर रात्री उशीरापर्यंत मोठी गर्दी उसळते. या अभयारण्याच्या क्षेत्रात सादडा, बेहडा, उंबर, बोंडारा, करंज, हिरडा या वृक्षांची संख्या जास्त असून या वृक्षांवर काजव्यांची संख्या जास्त असते. काजवे बिलांमधून बाहेर येऊन रात्रीच्या वेळी झाडांची पाने खातात. त्यामुळे ते चमकताना दिसतात. त्यांची चमचम बघण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडते. यावेळी प्रामाणिकपणे निसर्ग अनुभवणारे व निसर्गासोबत मैत्री जपणारे पर्यटक अपवादानेच येथे येतात. त्यांच्या तुलनेने धिंगाणा घालणारे पर्यटक येथे जास्त येतात. यावेळी वाहनांच्या हॉर्नचा कर्णकर्कश आवाज, साऊंडचा दणदणाट, वाहनांच्या दिव्यांचा लख्ख प्रकाश, प्लॅस्टिकचा कचरा, दारुच्या रित्या झालेल्या बाटल्या अशा सर्व प्रकाराने निसर्गाची अपरिमित हानी होते. यामुळे काजवा महोत्सव बंद करण्याची खरी गरज असल्याचे मतदेखील काही पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे. स्थानिक आदिवासींना या काजवा महोत्सवाचा रोजगाराच्या दृष्टीने कवडीचा फायदा होत नाही. महाराष्ट्र पर्यटन विकास महमंडळामार्फत जाणाऱ्या पर्यटकांना वगळले तर कोणतेही पर्यटक जे स्वयंस्फूर्तीने या अभयारण्याच्या परिसरात हजेरी लावतात त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारे स्वयंशिस्तीचे पालन किंवा निसर्गाच्या संरक्षणाची काळजी घेतली जात नसल्याचे विदारक चित्र पहावयास मिळते.