शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

काजवा महोत्सव : पर्यटकांच्या धिंगाण्याला लागणार चाप

By admin | Updated: May 22, 2017 15:54 IST

नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेरेषवरील परिसरात भरणाऱ्या काजवा महोत्सवामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण महिना ते दीड महिना कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरातील नैसर्गिक जैवविविधता धोक्यात येते.

नाशिक : नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेरेषवरील परिसरात भरणाऱ्या काजवा महोत्सवामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण महिना ते दीड महिना कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरातील नैसर्गिक जैवविविधता धोक्यात येते. पर्यटकांचा धिंगाणा सुरक्षेला तडा देणारा ठरतो. यामुळे या भागात वनविभाग व अकोला पोलीस ठाणेअंतर्गत गस्त वाढविली जाणार असून वाहनांची तपासणी केली जाणार आहे. मद्यप्राशनला संपुर्णपणे आळा घालून हा परिसर पर्यटकांच्या धिंगाण्यापासून सुरक्षित करण्यासाठी वनविभाग व वन्यजीव विभाग यावर्षी प्रयत्न करणार आहेत. काजवा महोत्सवाचे ‘ब्रॅन्डिंग’ मोठ्या प्रमाणात झाल्याने दरवर्षी या ठिकाणी सुमारे दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधीपर्यंत पर्यटकांची संध्याकाळपासून तर रात्री उशीरापर्यंत मोठी गर्दी उसळते. या अभयारण्याच्या क्षेत्रात सादडा, बेहडा, उंबर, बोंडारा, करंज, हिरडा या वृक्षांची संख्या जास्त असून या वृक्षांवर काजव्यांची संख्या जास्त असते. काजवे बिलांमधून बाहेर येऊन रात्रीच्या वेळी झाडांची पाने खातात. त्यामुळे ते चमकताना दिसतात. त्यांची चमचम बघण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडते. यावेळी प्रामाणिकपणे निसर्ग अनुभवणारे व निसर्गासोबत मैत्री जपणारे पर्यटक अपवादानेच येथे येतात. त्यांच्या तुलनेने धिंगाणा घालणारे पर्यटक येथे जास्त येतात. यावेळी वाहनांच्या हॉर्नचा कर्णकर्कश आवाज, साऊंडचा दणदणाट, वाहनांच्या दिव्यांचा लख्ख प्रकाश, प्लॅस्टिकचा कचरा, दारुच्या रित्या झालेल्या बाटल्या अशा सर्व प्रकाराने निसर्गाची अपरिमित हानी होते. यामुळे काजवा महोत्सव बंद करण्याची खरी गरज असल्याचे मतदेखील काही पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे. स्थानिक आदिवासींना या काजवा महोत्सवाचा रोजगाराच्या दृष्टीने कवडीचा फायदा होत नाही. महाराष्ट्र पर्यटन विकास महमंडळामार्फत जाणाऱ्या पर्यटकांना वगळले तर कोणतेही पर्यटक जे स्वयंस्फूर्तीने या अभयारण्याच्या परिसरात हजेरी लावतात त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारे स्वयंशिस्तीचे पालन किंवा निसर्गाच्या संरक्षणाची काळजी घेतली जात नसल्याचे विदारक चित्र पहावयास मिळते.