शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

काजवा महोत्सव : पर्यटकांच्या धिंगाण्याला लागणार चाप

By admin | Updated: May 22, 2017 15:54 IST

नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेरेषवरील परिसरात भरणाऱ्या काजवा महोत्सवामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण महिना ते दीड महिना कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरातील नैसर्गिक जैवविविधता धोक्यात येते.

नाशिक : नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेरेषवरील परिसरात भरणाऱ्या काजवा महोत्सवामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण महिना ते दीड महिना कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरातील नैसर्गिक जैवविविधता धोक्यात येते. पर्यटकांचा धिंगाणा सुरक्षेला तडा देणारा ठरतो. यामुळे या भागात वनविभाग व अकोला पोलीस ठाणेअंतर्गत गस्त वाढविली जाणार असून वाहनांची तपासणी केली जाणार आहे. मद्यप्राशनला संपुर्णपणे आळा घालून हा परिसर पर्यटकांच्या धिंगाण्यापासून सुरक्षित करण्यासाठी वनविभाग व वन्यजीव विभाग यावर्षी प्रयत्न करणार आहेत. काजवा महोत्सवाचे ‘ब्रॅन्डिंग’ मोठ्या प्रमाणात झाल्याने दरवर्षी या ठिकाणी सुमारे दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधीपर्यंत पर्यटकांची संध्याकाळपासून तर रात्री उशीरापर्यंत मोठी गर्दी उसळते. या अभयारण्याच्या क्षेत्रात सादडा, बेहडा, उंबर, बोंडारा, करंज, हिरडा या वृक्षांची संख्या जास्त असून या वृक्षांवर काजव्यांची संख्या जास्त असते. काजवे बिलांमधून बाहेर येऊन रात्रीच्या वेळी झाडांची पाने खातात. त्यामुळे ते चमकताना दिसतात. त्यांची चमचम बघण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडते. यावेळी प्रामाणिकपणे निसर्ग अनुभवणारे व निसर्गासोबत मैत्री जपणारे पर्यटक अपवादानेच येथे येतात. त्यांच्या तुलनेने धिंगाणा घालणारे पर्यटक येथे जास्त येतात. यावेळी वाहनांच्या हॉर्नचा कर्णकर्कश आवाज, साऊंडचा दणदणाट, वाहनांच्या दिव्यांचा लख्ख प्रकाश, प्लॅस्टिकचा कचरा, दारुच्या रित्या झालेल्या बाटल्या अशा सर्व प्रकाराने निसर्गाची अपरिमित हानी होते. यामुळे काजवा महोत्सव बंद करण्याची खरी गरज असल्याचे मतदेखील काही पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे. स्थानिक आदिवासींना या काजवा महोत्सवाचा रोजगाराच्या दृष्टीने कवडीचा फायदा होत नाही. महाराष्ट्र पर्यटन विकास महमंडळामार्फत जाणाऱ्या पर्यटकांना वगळले तर कोणतेही पर्यटक जे स्वयंस्फूर्तीने या अभयारण्याच्या परिसरात हजेरी लावतात त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारे स्वयंशिस्तीचे पालन किंवा निसर्गाच्या संरक्षणाची काळजी घेतली जात नसल्याचे विदारक चित्र पहावयास मिळते.