शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

पहिल्या पावसातील ‘कवळी’ने रानभाज्यांचा श्रीगणेशा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 01:29 IST

पेठ : तळपत्या उन्हाच्या काहिली नंतर बरसणारा पहिला पाऊस आणि त्याबरोबर रानावनात उगवणारी कवळीची भाजी म्हणजे आदिवासी जनतेसाठी रानभाज्यांचा श्रीगणेशा असतो. अगदी कमी दिवस आणि अल्प आयुष्य असलेल्या या कवळीच्या भाजीची चव चाखण्यासाठी खवय्ये अक्षरश: आतुर होत असतात.

पेठ : तळपत्या उन्हाच्या काहिली नंतर बरसणारा पहिला पाऊस आणि त्याबरोबर रानावनात उगवणारी कवळीची भाजी म्हणजे आदिवासी जनतेसाठी रानभाज्यांचा श्रीगणेशा असतो. अगदी कमी दिवस आणि अल्प आयुष्य असलेल्या या कवळीच्या भाजीची चव चाखण्यासाठी खवय्ये अक्षरश: आतुर होत असतात. पेठ, सुरगाणा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्याबरोवर विविध प्रकारच्या रानभाज्यांची रेलचेल सुरू होत असते. आयुर्वेदात सर्वाधिक महत्त्वाचे स्थान असलेल्या अनेक प्रकारच्या भाज्या रानावनात उगवत असतात. पहिल्या पावसाबरोबर दर्शन होते ते कवळीच्या भाजीचे. याच भाजीचा पहिला नैवेद्य दाखवून नागरिक रानभाज्या खाण्यास सुरु वात करतात. पाऊस पडल्यानंतर फक्त एक किंवा दोनच दिवस कवळीच्या भाजीचे दर्शन होत असते. त्यामुळे ही भाजी आणण्यासाठी पहाटेपासून जंगलाची वाट धरावी लागते. कोणत्याही प्रकारच्या रासायनिक व घातक मूलद्रव्यांचा स्पर्शही नसलेल्या कवळीच्या भाजीची चव चाखण्यासाठी सर्वच आतुर झालेले असतात. कवळीच्या भाजीनंतर शेवळा, करटोला, झारझुरा, बोखर, फांग, भुईफोड, वार्थट, आळींब, माट, चाईचा मोर यांसारख्या एका पेक्षा एक चविष्ट रानभाज्या दाखल होत असतात.----------------------शहरातही कवळीचे आकर्षण कायमआदिवासी व ग्रामीण भागातून नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने शहरात स्थलांतरित झालेल्या चाकरमान्यांनाही कवळीच्या भाजीचे मोठे आकर्षण असते. पहिला पाऊस पडल्यावर आपापल्या नातेवाइकांना खास कवळीची भाजी वानोळा पाठवण्याची काळजी घेतली जाते. यावर्षी लॉकडाऊनमुळे मिळालेल्या सुट्ट्यांमुळे बहुतांश नोकरदार गावाकडे आले असल्याने कवळीच्या भाजीचा आस्वाद घेत आहेत. आठवडे बाजार बंद असल्याने ग्रामीण भागातून कवळीच्या भाजीची आवक घटल्याने स्थानिकांना मिळणाऱ्या रोजगारावर यावर्षी पाणी सोडावे लागले असले तरी चांगला पाऊस झाल्याने सर्वांनाच पुरेशा प्रमाणात या भाजीचा आस्वाद घेता आला.

टॅग्स :Nashikनाशिक