शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

पहिल्या पावसातील ‘कवळी’ने रानभाज्यांचा श्रीगणेशा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 01:29 IST

पेठ : तळपत्या उन्हाच्या काहिली नंतर बरसणारा पहिला पाऊस आणि त्याबरोबर रानावनात उगवणारी कवळीची भाजी म्हणजे आदिवासी जनतेसाठी रानभाज्यांचा श्रीगणेशा असतो. अगदी कमी दिवस आणि अल्प आयुष्य असलेल्या या कवळीच्या भाजीची चव चाखण्यासाठी खवय्ये अक्षरश: आतुर होत असतात.

पेठ : तळपत्या उन्हाच्या काहिली नंतर बरसणारा पहिला पाऊस आणि त्याबरोबर रानावनात उगवणारी कवळीची भाजी म्हणजे आदिवासी जनतेसाठी रानभाज्यांचा श्रीगणेशा असतो. अगदी कमी दिवस आणि अल्प आयुष्य असलेल्या या कवळीच्या भाजीची चव चाखण्यासाठी खवय्ये अक्षरश: आतुर होत असतात. पेठ, सुरगाणा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्याबरोवर विविध प्रकारच्या रानभाज्यांची रेलचेल सुरू होत असते. आयुर्वेदात सर्वाधिक महत्त्वाचे स्थान असलेल्या अनेक प्रकारच्या भाज्या रानावनात उगवत असतात. पहिल्या पावसाबरोबर दर्शन होते ते कवळीच्या भाजीचे. याच भाजीचा पहिला नैवेद्य दाखवून नागरिक रानभाज्या खाण्यास सुरु वात करतात. पाऊस पडल्यानंतर फक्त एक किंवा दोनच दिवस कवळीच्या भाजीचे दर्शन होत असते. त्यामुळे ही भाजी आणण्यासाठी पहाटेपासून जंगलाची वाट धरावी लागते. कोणत्याही प्रकारच्या रासायनिक व घातक मूलद्रव्यांचा स्पर्शही नसलेल्या कवळीच्या भाजीची चव चाखण्यासाठी सर्वच आतुर झालेले असतात. कवळीच्या भाजीनंतर शेवळा, करटोला, झारझुरा, बोखर, फांग, भुईफोड, वार्थट, आळींब, माट, चाईचा मोर यांसारख्या एका पेक्षा एक चविष्ट रानभाज्या दाखल होत असतात.----------------------शहरातही कवळीचे आकर्षण कायमआदिवासी व ग्रामीण भागातून नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने शहरात स्थलांतरित झालेल्या चाकरमान्यांनाही कवळीच्या भाजीचे मोठे आकर्षण असते. पहिला पाऊस पडल्यावर आपापल्या नातेवाइकांना खास कवळीची भाजी वानोळा पाठवण्याची काळजी घेतली जाते. यावर्षी लॉकडाऊनमुळे मिळालेल्या सुट्ट्यांमुळे बहुतांश नोकरदार गावाकडे आले असल्याने कवळीच्या भाजीचा आस्वाद घेत आहेत. आठवडे बाजार बंद असल्याने ग्रामीण भागातून कवळीच्या भाजीची आवक घटल्याने स्थानिकांना मिळणाऱ्या रोजगारावर यावर्षी पाणी सोडावे लागले असले तरी चांगला पाऊस झाल्याने सर्वांनाच पुरेशा प्रमाणात या भाजीचा आस्वाद घेता आला.

टॅग्स :Nashikनाशिक