शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
3
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
4
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
5
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
6
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
7
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
8
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
9
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
10
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
11
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
12
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
13
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
14
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
15
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
17
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
18
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
19
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
20
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!

कश्यपीचे पाणी सोडण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांना पिटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 19:16 IST

सध्या गंगापूर धरणात ३३ टक्के पाणी असून, धरण समूहात ४५ टक्के जलसाठा आहे. त्यातील कश्यपी धरणात १६७९ दशलक्ष घनफूट म्हणजे ९१ टक्के पाणी अद्यापही कायम आहे. कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत धरणातील पाणी सोडू नये अन्यथा धरणग्रस्त धरणात उड्या घेतील, अशी धमकी

ठळक मुद्देप्रकल्पग्रस्त आक्रमक : सोमवारच्या बैठकीनंतर होणार निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गंगापूर धरण व समूहात दिवसागणिक पाण्याची पातळी खालावत चालली असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची चिन्हे दिसू लागताच, शनिवारी शासकीय सुटीच्या दिवशी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी पोलीस फौजफाटा घेऊन कश्यपी धरणातील पाणी सोडण्याचा प्रयत्न प्रकल्पग्रस्तांनी हाणून पाडला. महापालिकेने धरणाच्या पाण्याची जबाबदारी नाकारली असून, ज्यांच्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे त्यांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवावेत मगच पाणी सोडावे, अशी भूमिका घेत पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना धरणाच्या गेटवरच अडवून ठेवण्यात आले. अखेर प्रकल्पग्रस्तांशी सोमवारी बैठक घेण्याचे मान्य करत पाणी न सोडताच, पाटबंधारे व पोलीस खाते माघारी परतले.

सध्या गंगापूर धरणात ३३ टक्के पाणी असून, धरण समूहात ४५ टक्के जलसाठा आहे. त्यातील कश्यपी धरणात १६७९ दशलक्ष घनफूट म्हणजे ९१ टक्के पाणी अद्यापही कायम आहे. कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत धरणातील पाणी सोडू नये अन्यथा धरणग्रस्त धरणात उड्या घेतील, अशी धमकी प्रकल्पग्रस्तांनी दिली आहे. त्यांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिका-यांनीदेखील सकारात्मकता दर्शवून धरणातील पाणी सोडण्यात येणार नाही, असे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले आहे. असे असतानाही शनिवारी सकाळी अकरा वाजता पाटबंधारे खात्याचे मिसाळ, तांदळे या अधिका-यांनी हरसूल पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त घेऊन कश्यपी धरणाचे पाणी सोडण्यासाठी दाखल झाले. धरणातील पाणी सोडण्यात येणार असल्याचे वृत्त धोंडेवाडी, खाड्याची वाडी आदी गावांमध्ये पसरताच, तत्काळ शेकडो प्रकल्पग्रस्तांनी धरणावर धाव घेऊन अधिका-यांना पाणी सोडण्यापासून मज्जाव केला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने पाणी सोडण्यात येत असल्याचे सांगून प्रकल्पग्रस्तांना मज्जाव करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावर वादविवाद झाला. नाशिक महापालिकेने कश्यपी धरणाच्या पाण्याची गरज नसल्याचे कळविले असल्यामुळे कश्यपीचे पाणी कोणासाठी सोडले जात आहे, असा सवाल प्रकल्पग्रस्तांनी केला. ज्यांच्यासाठी पाणी सोडले जात आहे, त्यांनी प्रश्न सोडवावेत व मगच पाणी सोडावे, अशी भूमिका घेतली. त्यावर जिल्हाधिका-यांचे आदेश असल्याचे पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांनी सांगण्याचा प्रयत्न केला असता, जिल्हाधिकाºयांना धरणावर बोलवा, असा आग्रह त्यांनी धरला. शिवाय धरणातून पाणी सोडण्यापूर्वी ग्रामपंचायतीला पाटबंधारे खात्याने पत्र द्यावे, असे ठरलेले असताना अचानक पाणी सोडण्याचा उद्देश काय असा सवाल केला

टॅग्स :Governmentसरकारnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय