शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा गुंता वाढला;चेंडू शासनाच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 14:23 IST

शहराच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी महापालिकेने कश्यपी धरण बांधले, त्यासाठी तालुक्यातील धोंडेगावसह पाच गावांची जमीन संपादित करण्यात आली. जमीन संपादन करताना शेतकºयांना त्यांच्या जमिनीचा मोबदला अदा करण्याबरोबरच प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एका वारसास महापालिकेत नोकरी देण्याचे आश्वासनही देण्यात आले

ठळक मुद्दे महापालिकेने २४ वारसांना त्याचवेळी सेवेत सामावून घेतले जवळपास पंचवीस वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांनी महापालिकेच्या सेवेत नोकरी मिळण्यासाठी विविध प्रकारची आंदोलने

नाशिक : कश्यपी धरणासाठी जागा दिलेल्या शेतकºयांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यास महापालिकेच्या महासभेने मान्यता दिली असली तरी, तरी त्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी कोणती पद्धत अवलंबवावी याविषयी पाटबंधारे, महापालिका व पुनवर्सन या तिन्ही खात्यांमध्ये एकमत होत नसल्याने आता त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकारवर सोपविण्यात आला आहे. दुसरीकडे ज्या ३६ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीसाठी नावे निश्चित करण्यात आली, त्यांच्या नावाला गावातीलच अन्य प्रकल्पग्रस्तांनी विरोध दर्शविल्यामुळे नोकरीचा गुंता आणखीनच वाढला आहे.नाशिक शहराच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी महापालिकेने कश्यपी धरण बांधले, त्यासाठी तालुक्यातील धोंडेगावसह पाच गावांची जमीन संपादित करण्यात आली. जमीन संपादन करताना शेतकºयांना त्यांच्या जमिनीचा मोबदला अदा करण्याबरोबरच प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एका वारसास महापालिकेत नोकरी देण्याचे आश्वासनही देण्यात आले. त्यानुसार प्रारंभी महापालिकेने २४ वारसांना त्याचवेळी सेवेत सामावून घेतले व उर्वरिताना टप्प्याटप्प्याने नोकरी देण्याचे ठरविले, दरम्यान महापालिकेची नोकर भरती करताना शासनपातळीवरच धोरणात्मक निर्णय झाल्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना नोकरीपासून वंचित राहावे लागले. जवळपास पंचवीस वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांनी महापालिकेच्या सेवेत नोकरी मिळण्यासाठी विविध प्रकारची आंदोलने व पाठपुरावा करूनही आश्वासनापलीकडे त्यांच्या पदरात काहीच पडत नसल्याचे पाहून दोन वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक भूमिका घेतली, परिणामी शासन पातळीवर त्याची दखल घ्यावी लागली. महापालिकेसाठी धरण बांधण्यात आले असले तरी, त्याची उभारणी पाटबंधारे खात्याने केली व धरणासाठी जमीन संपादनाचे काम जिल्हाधिकाºयांनी केले त्यामुळे तिन्ही खात्यांशी निगडित असलेल्या या प्रश्नावर एकमत होत नसल्याने राज्य सरकारने त्यात मध्यस्थी करीत उच्चस्तरीय समिती गठित केली व या समितीने प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याची शिफारस केली. समितीच्या या निर्णयावर शासनानेही शिक्कामोर्तब केले, त्यानुसार महापालिकेने अलीकडेच झालेल्या महासभेत या विषयाला मंजुरी देत ३६ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यात आले.

टॅग्स :DamधरणNashikनाशिक