शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा गुंता वाढला;चेंडू शासनाच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 14:23 IST

शहराच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी महापालिकेने कश्यपी धरण बांधले, त्यासाठी तालुक्यातील धोंडेगावसह पाच गावांची जमीन संपादित करण्यात आली. जमीन संपादन करताना शेतकºयांना त्यांच्या जमिनीचा मोबदला अदा करण्याबरोबरच प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एका वारसास महापालिकेत नोकरी देण्याचे आश्वासनही देण्यात आले

ठळक मुद्दे महापालिकेने २४ वारसांना त्याचवेळी सेवेत सामावून घेतले जवळपास पंचवीस वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांनी महापालिकेच्या सेवेत नोकरी मिळण्यासाठी विविध प्रकारची आंदोलने

नाशिक : कश्यपी धरणासाठी जागा दिलेल्या शेतकºयांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यास महापालिकेच्या महासभेने मान्यता दिली असली तरी, तरी त्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी कोणती पद्धत अवलंबवावी याविषयी पाटबंधारे, महापालिका व पुनवर्सन या तिन्ही खात्यांमध्ये एकमत होत नसल्याने आता त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकारवर सोपविण्यात आला आहे. दुसरीकडे ज्या ३६ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीसाठी नावे निश्चित करण्यात आली, त्यांच्या नावाला गावातीलच अन्य प्रकल्पग्रस्तांनी विरोध दर्शविल्यामुळे नोकरीचा गुंता आणखीनच वाढला आहे.नाशिक शहराच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी महापालिकेने कश्यपी धरण बांधले, त्यासाठी तालुक्यातील धोंडेगावसह पाच गावांची जमीन संपादित करण्यात आली. जमीन संपादन करताना शेतकºयांना त्यांच्या जमिनीचा मोबदला अदा करण्याबरोबरच प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एका वारसास महापालिकेत नोकरी देण्याचे आश्वासनही देण्यात आले. त्यानुसार प्रारंभी महापालिकेने २४ वारसांना त्याचवेळी सेवेत सामावून घेतले व उर्वरिताना टप्प्याटप्प्याने नोकरी देण्याचे ठरविले, दरम्यान महापालिकेची नोकर भरती करताना शासनपातळीवरच धोरणात्मक निर्णय झाल्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना नोकरीपासून वंचित राहावे लागले. जवळपास पंचवीस वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांनी महापालिकेच्या सेवेत नोकरी मिळण्यासाठी विविध प्रकारची आंदोलने व पाठपुरावा करूनही आश्वासनापलीकडे त्यांच्या पदरात काहीच पडत नसल्याचे पाहून दोन वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक भूमिका घेतली, परिणामी शासन पातळीवर त्याची दखल घ्यावी लागली. महापालिकेसाठी धरण बांधण्यात आले असले तरी, त्याची उभारणी पाटबंधारे खात्याने केली व धरणासाठी जमीन संपादनाचे काम जिल्हाधिकाºयांनी केले त्यामुळे तिन्ही खात्यांशी निगडित असलेल्या या प्रश्नावर एकमत होत नसल्याने राज्य सरकारने त्यात मध्यस्थी करीत उच्चस्तरीय समिती गठित केली व या समितीने प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याची शिफारस केली. समितीच्या या निर्णयावर शासनानेही शिक्कामोर्तब केले, त्यानुसार महापालिकेने अलीकडेच झालेल्या महासभेत या विषयाला मंजुरी देत ३६ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यात आले.

टॅग्स :DamधरणNashikनाशिक