शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

पूर्व भागात कांदालागवड जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:20 IST

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामाची पिके पेरणीची लगबग मोठ्या प्रमाणात सुरू असून, त्यातही सध्या कांद्याला मिळालेला दर पाहता, शेतकऱ्यांचा कल कांदा लागवडीकडे अधिक आहे.

एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामाची पिके पेरणीची लगबग मोठ्या प्रमाणात सुरू असून, त्यातही सध्या कांद्याला मिळालेला दर पाहता, शेतकऱ्यांचा कल कांदा लागवडीकडे अधिक आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून थंडी व ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.तालुक्याच्या पूर्व भागातील एकलहरे, सामनगाव, चाडेगाव, बाभळेश्वर, मोहगाव, जुने सामनगाव, कोटमगाव, जाखोरी, चांंदगिरी, हिंगणवेढे, गंगापाडळी, कालवी, लाखलगाव, पिंप्री, ओढा, शिलापूर, माडसांगवी, गंगावाडी या पंचक्रोशीत रब्बी पिकांची लागवड करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. उन्हाळ कांदा लागवड, गहू, हरभरा, ज्वारी पिकांची पेरणी काही भागात झाली आहे, तर काही ठिकाणी अजूनही सुरू आहे. या भागातील शेतकरी गव्हाच्या पारंपरिक वाणांबरोबरच इतरही सुधारित वाणांना पेरणीसाठी पसंती देतात. मात्र गव्हाच्या बियाणांची कमतरता निर्माण झाल्याने त्यासाठी अव्वाच्या सव्वा किंमत आकारली जात असल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. एकलहरे, कोटमगाव, हिंगणवेढे शिवारात अजूनही अवकाळी पावसामुळे बºयाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतात ओल आहे. एकलहरे राखेच्या बंधाºयातील पाण्यामुळेही शेतांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे जमिनीतील ओलाव्यामुळे वावर तयार करताना अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. तर काही ठिकाणी उशिरानेच पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.एकलहरे, सामनगाव, कोटमगाव, जाखोरी, हिंगणवेढे शिवारात उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यासाठी वाफे पद्धती न वापरता मोठमोठे व लांबलचक बेड तयार करून त्यावर ठिबकच्या नळ्या पसरून कांद्याची लागवड सुरू आहे. त्यासाठी दोन महिन्यांपूर्वी टाकलेले रोप तयार झाले आहे. या रोपांची लागवड केली जात असली तरी, सध्याच्या बदललेल्या हवामानामुळे हे रोपही अनेक ठिकाणी पिवळसर पडू लागले आहे. परिसरात काही ठिकाणी यापूर्वीच काही शेतकºयांनी कांदा लागवड केली आहे. हे कांदे आता बºयापैकी पात धरू लागले आहेत.मात्र थंडी व धुक्यामुळे मावा, करपा, भुरी या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकºयांना महागडी औषधे फवारणी करावी लागत आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात काही ठिकाणी कांदापात गोल गुंडाळून कांदा पांढरा पडू लागला आहे. या हवामानाचा द्राक्षबागांनाही फटका बसू लागला असून, द्राक्ष मण्यांच्या फुगवणीवर विपरीत परिणाम होऊन मण्यांना तडे जाऊ लागले आहेत. सध्या द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरण्याची स्थिती आहे. थंडीमुळे मण्यांना क्रॅँक जाऊन पाण्याचे प्रमाण कमीहोण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.हवामान बदलामुळे रोपे पिवळी पडलीतालुक्याच्या पूर्व भागात कांद्याची लागवड सुरू आहे. त्यासाठी दोन महिन्यांपूर्वी टाकलेले रोप तयार झाले आहे. सध्याच्या बदललेल्या हवामानामुळे हे रोपही अनेक ठिकाणी पिवळसर पडू लागले आहे. परिसरात काही ठिकाणी यापूर्वीच काही शेतकºयांनी कांदा लागवड केली आहे. हे कांदे आता बºयापैकी पात धरू लागले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा