शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

पूर्व भागात कांदालागवड जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:20 IST

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामाची पिके पेरणीची लगबग मोठ्या प्रमाणात सुरू असून, त्यातही सध्या कांद्याला मिळालेला दर पाहता, शेतकऱ्यांचा कल कांदा लागवडीकडे अधिक आहे.

एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामाची पिके पेरणीची लगबग मोठ्या प्रमाणात सुरू असून, त्यातही सध्या कांद्याला मिळालेला दर पाहता, शेतकऱ्यांचा कल कांदा लागवडीकडे अधिक आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून थंडी व ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.तालुक्याच्या पूर्व भागातील एकलहरे, सामनगाव, चाडेगाव, बाभळेश्वर, मोहगाव, जुने सामनगाव, कोटमगाव, जाखोरी, चांंदगिरी, हिंगणवेढे, गंगापाडळी, कालवी, लाखलगाव, पिंप्री, ओढा, शिलापूर, माडसांगवी, गंगावाडी या पंचक्रोशीत रब्बी पिकांची लागवड करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. उन्हाळ कांदा लागवड, गहू, हरभरा, ज्वारी पिकांची पेरणी काही भागात झाली आहे, तर काही ठिकाणी अजूनही सुरू आहे. या भागातील शेतकरी गव्हाच्या पारंपरिक वाणांबरोबरच इतरही सुधारित वाणांना पेरणीसाठी पसंती देतात. मात्र गव्हाच्या बियाणांची कमतरता निर्माण झाल्याने त्यासाठी अव्वाच्या सव्वा किंमत आकारली जात असल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. एकलहरे, कोटमगाव, हिंगणवेढे शिवारात अजूनही अवकाळी पावसामुळे बºयाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतात ओल आहे. एकलहरे राखेच्या बंधाºयातील पाण्यामुळेही शेतांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे जमिनीतील ओलाव्यामुळे वावर तयार करताना अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. तर काही ठिकाणी उशिरानेच पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.एकलहरे, सामनगाव, कोटमगाव, जाखोरी, हिंगणवेढे शिवारात उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यासाठी वाफे पद्धती न वापरता मोठमोठे व लांबलचक बेड तयार करून त्यावर ठिबकच्या नळ्या पसरून कांद्याची लागवड सुरू आहे. त्यासाठी दोन महिन्यांपूर्वी टाकलेले रोप तयार झाले आहे. या रोपांची लागवड केली जात असली तरी, सध्याच्या बदललेल्या हवामानामुळे हे रोपही अनेक ठिकाणी पिवळसर पडू लागले आहे. परिसरात काही ठिकाणी यापूर्वीच काही शेतकºयांनी कांदा लागवड केली आहे. हे कांदे आता बºयापैकी पात धरू लागले आहेत.मात्र थंडी व धुक्यामुळे मावा, करपा, भुरी या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकºयांना महागडी औषधे फवारणी करावी लागत आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात काही ठिकाणी कांदापात गोल गुंडाळून कांदा पांढरा पडू लागला आहे. या हवामानाचा द्राक्षबागांनाही फटका बसू लागला असून, द्राक्ष मण्यांच्या फुगवणीवर विपरीत परिणाम होऊन मण्यांना तडे जाऊ लागले आहेत. सध्या द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरण्याची स्थिती आहे. थंडीमुळे मण्यांना क्रॅँक जाऊन पाण्याचे प्रमाण कमीहोण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.हवामान बदलामुळे रोपे पिवळी पडलीतालुक्याच्या पूर्व भागात कांद्याची लागवड सुरू आहे. त्यासाठी दोन महिन्यांपूर्वी टाकलेले रोप तयार झाले आहे. सध्याच्या बदललेल्या हवामानामुळे हे रोपही अनेक ठिकाणी पिवळसर पडू लागले आहे. परिसरात काही ठिकाणी यापूर्वीच काही शेतकºयांनी कांदा लागवड केली आहे. हे कांदे आता बºयापैकी पात धरू लागले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा