शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

पूर्व भागात कांदालागवड जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:20 IST

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामाची पिके पेरणीची लगबग मोठ्या प्रमाणात सुरू असून, त्यातही सध्या कांद्याला मिळालेला दर पाहता, शेतकऱ्यांचा कल कांदा लागवडीकडे अधिक आहे.

एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामाची पिके पेरणीची लगबग मोठ्या प्रमाणात सुरू असून, त्यातही सध्या कांद्याला मिळालेला दर पाहता, शेतकऱ्यांचा कल कांदा लागवडीकडे अधिक आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून थंडी व ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.तालुक्याच्या पूर्व भागातील एकलहरे, सामनगाव, चाडेगाव, बाभळेश्वर, मोहगाव, जुने सामनगाव, कोटमगाव, जाखोरी, चांंदगिरी, हिंगणवेढे, गंगापाडळी, कालवी, लाखलगाव, पिंप्री, ओढा, शिलापूर, माडसांगवी, गंगावाडी या पंचक्रोशीत रब्बी पिकांची लागवड करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. उन्हाळ कांदा लागवड, गहू, हरभरा, ज्वारी पिकांची पेरणी काही भागात झाली आहे, तर काही ठिकाणी अजूनही सुरू आहे. या भागातील शेतकरी गव्हाच्या पारंपरिक वाणांबरोबरच इतरही सुधारित वाणांना पेरणीसाठी पसंती देतात. मात्र गव्हाच्या बियाणांची कमतरता निर्माण झाल्याने त्यासाठी अव्वाच्या सव्वा किंमत आकारली जात असल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. एकलहरे, कोटमगाव, हिंगणवेढे शिवारात अजूनही अवकाळी पावसामुळे बºयाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतात ओल आहे. एकलहरे राखेच्या बंधाºयातील पाण्यामुळेही शेतांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे जमिनीतील ओलाव्यामुळे वावर तयार करताना अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. तर काही ठिकाणी उशिरानेच पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.एकलहरे, सामनगाव, कोटमगाव, जाखोरी, हिंगणवेढे शिवारात उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यासाठी वाफे पद्धती न वापरता मोठमोठे व लांबलचक बेड तयार करून त्यावर ठिबकच्या नळ्या पसरून कांद्याची लागवड सुरू आहे. त्यासाठी दोन महिन्यांपूर्वी टाकलेले रोप तयार झाले आहे. या रोपांची लागवड केली जात असली तरी, सध्याच्या बदललेल्या हवामानामुळे हे रोपही अनेक ठिकाणी पिवळसर पडू लागले आहे. परिसरात काही ठिकाणी यापूर्वीच काही शेतकºयांनी कांदा लागवड केली आहे. हे कांदे आता बºयापैकी पात धरू लागले आहेत.मात्र थंडी व धुक्यामुळे मावा, करपा, भुरी या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकºयांना महागडी औषधे फवारणी करावी लागत आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात काही ठिकाणी कांदापात गोल गुंडाळून कांदा पांढरा पडू लागला आहे. या हवामानाचा द्राक्षबागांनाही फटका बसू लागला असून, द्राक्ष मण्यांच्या फुगवणीवर विपरीत परिणाम होऊन मण्यांना तडे जाऊ लागले आहेत. सध्या द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरण्याची स्थिती आहे. थंडीमुळे मण्यांना क्रॅँक जाऊन पाण्याचे प्रमाण कमीहोण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.हवामान बदलामुळे रोपे पिवळी पडलीतालुक्याच्या पूर्व भागात कांद्याची लागवड सुरू आहे. त्यासाठी दोन महिन्यांपूर्वी टाकलेले रोप तयार झाले आहे. सध्याच्या बदललेल्या हवामानामुळे हे रोपही अनेक ठिकाणी पिवळसर पडू लागले आहे. परिसरात काही ठिकाणी यापूर्वीच काही शेतकºयांनी कांदा लागवड केली आहे. हे कांदे आता बºयापैकी पात धरू लागले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा