शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

कळवण : वीज कंपनीने सर्वेक्षण करून अनावश्यक खांब काढण्याची मागणी रस्त्यात अडथळा ठरणारे रोहित्र हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:11 IST

शहरातील शिवाजीनगर परिसरात गेल्या २० वर्षांपासून रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरत असलेले रोहित्र हटविल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला

कळवण : शहरातील शिवाजीनगर परिसरात गेल्या २० वर्षांपासून रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरत असलेले रोहित्र हटविल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून, नागरिकांना समाधान व्यक्त केले आहे. याबाबत लोकमतने सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केला होता. सदरच्या वृत्ताची दखल घेत वीज वितरण कंपनीने रोहित्र हटविाले आहे. वीज कंपनीने शहरात सर्वेक्षण करून गरज नसताना उभे असलेलेखांब हटविण्याची गरज असल्याचे मत कळवणकर जनतेने व्यक्त केले आहे.कळवण नगरपंचायत हद्दीतील शिवाजीनगर भागातील डॉ. सुभाषचंद्र न्याती हॉस्पिटल ते हनुमान मंदिरादरम्यान रस्त्याच्या रुंदीकरण, सुधारणा व डांबरीकरणांतर्गत कामास पावसाळ्यानंतर पुन्हा सुरुवात झाल्याने शिवाजीनगरकरांच्या चेहºयावर समाधानाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या रस्त्यावर बीके कॉम्प्लेक्ससमोर रस्त्यातच असलेले रोहित्र रस्त्याच्या विकासाला व वाहतुकीला अडथळा ठरत होते. अखेर २० वर्षांनंतर ते तेथून हटविल्याने पादचारींनी व परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. नगर पंचायतचे गटनेते कौतिक पगार, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष सुधाकर पगार, तहसीलदार कैलास चावडे, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता ऋषिकेश खैरनार, मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल, शेतकरी सहकारी संघाचे व्यवस्थापक लक्ष्मण गांगुर्डे यांनी आज घेतलेल्या पुढाकारातून रस्त्यावरील रोहित्र हटविण्यात आल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. नगरपंचायत असलेल्या कळवणचा दिवसागणिक विस्तार शहराच्या चारही बाजूने वाढत असल्याने लोकसंख्यादेखील वाढली आहे. त्याबरोबरच शहरात वाहनांची संख्यादेखील वाढली आहे. आता शहरातील रस्तेदेखील अपुरे पडू लागल्याने रस्त्यांची सुधारणा व रुंदीकरण करण्याच्या कामावर कळवण नगरपंचायतने भर दिला आहे. आमदार डॉ. राहुल अहेर व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्या सहकार्याने कळवणच्या नगराध्यक्ष सुनीता पगार व गटनेते कौतिक पगार यांनी विशेष लक्ष घालून दुर्लक्षित रस्त्याकडे लक्ष केंद्रित केल्याने नगरपंचायत हद्दीतील विविध भागातील रस्त्यांवरील वाहतुकीला वीज वितरण कंपनीने वीज पुरवठ्यासाठी उभारलेले विजेचे खांब हे अडथळा ठरू पहात असल्याने आता त्यांचे सर्वेक्षण करून खांब काढण्याची मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे. शिवाजीनगरमधील बीके कॉम्प्लेक्ससमोर उभे असलेले रोहित्र वाहतुकीला अडचणीचे ठरत असल्याने व रोहित्र रस्त्याजवळच असल्याने रस्त्याने जाताना जीव मुठीत धरूनच पादचाºयांना प्रवास करावा लागत होता. शिवाय तेथून जवळच असलेल्या छत्रपती शिवाजी मंगल कार्यालयात लग्न व अन्य कार्याच्या वेळी या रोहित्राच्या भोवताली वाहनाची मोठी गर्दी होत होती. शिवाय दुतर्फा वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती. शिवाजीनगरमधील रस्त्याचे रुंदीकरणाचे काम कळवण नगरपंचायतने हाती घेतले असल्याने या रस्त्यांच्या रुंदीकरणाला अडथळे निर्माण ठरणारे रोहित्रासह विजेचे खांब अन्यत्र हलविण्यात वीज वितरण कंपनीला महसूल व नगरपंचायत, पोलीस प्रशासन व ग्रामस्थ यांच्या मदतीने यश आले आहे. शिवाजीनगर भागातील वीजपुरवठ्याचे वीज वितरण कंपनीने नियोजन करून वीज खांबांचे सर्वेक्षण करून येथील अनावश्यक खांब हटवावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाPower Shutdownभारनियमन