शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कळसुबाई -हरिश्चंद्रगड अभयारण्यात पुनवेचा चंद्रप्रकाश पडलाच नाही; बुद्धपौर्णिमेचा मुहूर्त पावसाने हुकविला

By अझहर शेख | Updated: May 7, 2023 17:32 IST

बुद्धपौर्णिमेच्या चांदण्या रात्री नाशिक वन्यजीव विभागाकडून कळसुबाई, हरिश्चंद्रगड, यावल, अनेर डॅम अभयारण्यांमध्ये वन्यप्राणी गणनेचे नियोजन करण्यात आले होते.

नाशिक : वन्यजीव विभागाने कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यामध्ये वन्यप्राणी गणनेसाठी जय्यत तयारी केली होती. भंडारदरा, राजूर या दोन्ही वनपरिक्षेत्रांत एकूण २८ तात्पुरत्या मचाणीही उभारण्यात आल्या होत्या. मात्र, शुक्रवारी (दि. ५) संध्याकाळी झालेल्या जोरदार वादळी गडगडाटी बेमोसमी पावसाच्या हजेरीने वन्यप्राणी गणनेवर पाणी फेरले. ऐनवेळेस वन्यप्राणी गणना रद्द करण्यात आली.

बुद्धपौर्णिमेच्या चांदण्या रात्री नाशिक वन्यजीव विभागाकडून कळसुबाई, हरिश्चंद्रगड, यावल, अनेर डॅम अभयारण्यांमध्ये वन्यप्राणी गणनेचे नियोजन करण्यात आले होते. याबाबत कळसुबाईमधील भंडारदरा, राजूर या वनपरिक्षेत्रातील रतनवाडी, साम्रद तसेच कोथूळ या दोन भागांत वन्यप्राण्यांच्या गणनेसाठी मचाणी उभारणीही पूर्ण करण्यात आली होती. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात भंडारदरा वनपरिक्षेत्रातील रतनवाडी येथील वाघतळे, घाटगर येथील घाटनदेवी तळे, शिंगणवाडी, पांजरे बेट, उडदावणे या भागात एकूण १२, तर राजूर वनपरिक्षेत्रात एकूण १६ मचाणी उभारण्यात आल्या होत्या.

वन्यप्राणी गणनेसाठी वन्यजीव विभागाचे अधिकारी, कर्मचारीवर्ग सज्ज झाले होते. खासगी पर्यावरणप्रेमी संस्थांसह वन्यजीवप्रेमींकडूनही गणनेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करण्यात आली होती. मात्र, अचानकपणे लहरी निसर्गामुळे अभयारण्यातील वातावरण बदलले. संध्याकाळी ढग दाटून येण्यास सुरुवात झाली आणि विजांच्या कडकडाटासह गडगडाटी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे पुनवेचा चंद्रप्रकाश अभयारण्यात पडू शकला नाही. परिणामी या अभयारण्यात होणारी वन्यप्राणी गणना रद्द करण्याचा निर्णय सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्याकडून घेण्यात आला.

निरीक्षणाची संधी हुकली अन् साऱ्यांचाच हिरमोड

बुद्धपौर्णिमेची वाट वन्यजीवप्रेमी वर्षभर आतुरतेने बघत असतात. कारण या चांदण्या रात्रीच्या प्रकाशात वन्यप्राणी पाणवठ्यांवर सहज नजरेस पडतात. वन्यजीव विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह वन्यप्रेमींसाठी ही एकप्रकारची पर्वणीच असते. जंगलात रात्र मचाणीवर बसून जागून काढत वन्यप्राण्यांचा अधिवास व निरीक्षणे नोंदवून घेतली जात असतात. या निरीक्षणावरून वर्षभरात अभयारण्यात वन्यप्राण्यांचा असलेला वावर याविषयीचा अंदाज बांधला जातो. मात्र, ही संधी लहरी निसर्गामुळे हुकल्याने साऱ्यांचाच हिरमोड झाला.

 

टॅग्स :Nashikनाशिक