शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कळसुबाई -हरिश्चंद्रगड अभयारण्यात पुनवेचा चंद्रप्रकाश पडलाच नाही; बुद्धपौर्णिमेचा मुहूर्त पावसाने हुकविला

By अझहर शेख | Updated: May 7, 2023 17:32 IST

बुद्धपौर्णिमेच्या चांदण्या रात्री नाशिक वन्यजीव विभागाकडून कळसुबाई, हरिश्चंद्रगड, यावल, अनेर डॅम अभयारण्यांमध्ये वन्यप्राणी गणनेचे नियोजन करण्यात आले होते.

नाशिक : वन्यजीव विभागाने कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यामध्ये वन्यप्राणी गणनेसाठी जय्यत तयारी केली होती. भंडारदरा, राजूर या दोन्ही वनपरिक्षेत्रांत एकूण २८ तात्पुरत्या मचाणीही उभारण्यात आल्या होत्या. मात्र, शुक्रवारी (दि. ५) संध्याकाळी झालेल्या जोरदार वादळी गडगडाटी बेमोसमी पावसाच्या हजेरीने वन्यप्राणी गणनेवर पाणी फेरले. ऐनवेळेस वन्यप्राणी गणना रद्द करण्यात आली.

बुद्धपौर्णिमेच्या चांदण्या रात्री नाशिक वन्यजीव विभागाकडून कळसुबाई, हरिश्चंद्रगड, यावल, अनेर डॅम अभयारण्यांमध्ये वन्यप्राणी गणनेचे नियोजन करण्यात आले होते. याबाबत कळसुबाईमधील भंडारदरा, राजूर या वनपरिक्षेत्रातील रतनवाडी, साम्रद तसेच कोथूळ या दोन भागांत वन्यप्राण्यांच्या गणनेसाठी मचाणी उभारणीही पूर्ण करण्यात आली होती. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात भंडारदरा वनपरिक्षेत्रातील रतनवाडी येथील वाघतळे, घाटगर येथील घाटनदेवी तळे, शिंगणवाडी, पांजरे बेट, उडदावणे या भागात एकूण १२, तर राजूर वनपरिक्षेत्रात एकूण १६ मचाणी उभारण्यात आल्या होत्या.

वन्यप्राणी गणनेसाठी वन्यजीव विभागाचे अधिकारी, कर्मचारीवर्ग सज्ज झाले होते. खासगी पर्यावरणप्रेमी संस्थांसह वन्यजीवप्रेमींकडूनही गणनेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करण्यात आली होती. मात्र, अचानकपणे लहरी निसर्गामुळे अभयारण्यातील वातावरण बदलले. संध्याकाळी ढग दाटून येण्यास सुरुवात झाली आणि विजांच्या कडकडाटासह गडगडाटी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे पुनवेचा चंद्रप्रकाश अभयारण्यात पडू शकला नाही. परिणामी या अभयारण्यात होणारी वन्यप्राणी गणना रद्द करण्याचा निर्णय सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्याकडून घेण्यात आला.

निरीक्षणाची संधी हुकली अन् साऱ्यांचाच हिरमोड

बुद्धपौर्णिमेची वाट वन्यजीवप्रेमी वर्षभर आतुरतेने बघत असतात. कारण या चांदण्या रात्रीच्या प्रकाशात वन्यप्राणी पाणवठ्यांवर सहज नजरेस पडतात. वन्यजीव विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह वन्यप्रेमींसाठी ही एकप्रकारची पर्वणीच असते. जंगलात रात्र मचाणीवर बसून जागून काढत वन्यप्राण्यांचा अधिवास व निरीक्षणे नोंदवून घेतली जात असतात. या निरीक्षणावरून वर्षभरात अभयारण्यात वन्यप्राण्यांचा असलेला वावर याविषयीचा अंदाज बांधला जातो. मात्र, ही संधी लहरी निसर्गामुळे हुकल्याने साऱ्यांचाच हिरमोड झाला.

 

टॅग्स :Nashikनाशिक