शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
2
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
3
सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लाागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
4
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
5
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
6
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
7
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
8
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
9
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
10
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
11
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
12
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
13
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
14
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
15
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
16
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
17
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
18
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
19
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
20
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
Daily Top 2Weekly Top 5

कळसुबाई -हरिश्चंद्रगड अभयारण्यात पुनवेचा चंद्रप्रकाश पडलाच नाही; बुद्धपौर्णिमेचा मुहूर्त पावसाने हुकविला

By अझहर शेख | Updated: May 7, 2023 17:32 IST

बुद्धपौर्णिमेच्या चांदण्या रात्री नाशिक वन्यजीव विभागाकडून कळसुबाई, हरिश्चंद्रगड, यावल, अनेर डॅम अभयारण्यांमध्ये वन्यप्राणी गणनेचे नियोजन करण्यात आले होते.

नाशिक : वन्यजीव विभागाने कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यामध्ये वन्यप्राणी गणनेसाठी जय्यत तयारी केली होती. भंडारदरा, राजूर या दोन्ही वनपरिक्षेत्रांत एकूण २८ तात्पुरत्या मचाणीही उभारण्यात आल्या होत्या. मात्र, शुक्रवारी (दि. ५) संध्याकाळी झालेल्या जोरदार वादळी गडगडाटी बेमोसमी पावसाच्या हजेरीने वन्यप्राणी गणनेवर पाणी फेरले. ऐनवेळेस वन्यप्राणी गणना रद्द करण्यात आली.

बुद्धपौर्णिमेच्या चांदण्या रात्री नाशिक वन्यजीव विभागाकडून कळसुबाई, हरिश्चंद्रगड, यावल, अनेर डॅम अभयारण्यांमध्ये वन्यप्राणी गणनेचे नियोजन करण्यात आले होते. याबाबत कळसुबाईमधील भंडारदरा, राजूर या वनपरिक्षेत्रातील रतनवाडी, साम्रद तसेच कोथूळ या दोन भागांत वन्यप्राण्यांच्या गणनेसाठी मचाणी उभारणीही पूर्ण करण्यात आली होती. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात भंडारदरा वनपरिक्षेत्रातील रतनवाडी येथील वाघतळे, घाटगर येथील घाटनदेवी तळे, शिंगणवाडी, पांजरे बेट, उडदावणे या भागात एकूण १२, तर राजूर वनपरिक्षेत्रात एकूण १६ मचाणी उभारण्यात आल्या होत्या.

वन्यप्राणी गणनेसाठी वन्यजीव विभागाचे अधिकारी, कर्मचारीवर्ग सज्ज झाले होते. खासगी पर्यावरणप्रेमी संस्थांसह वन्यजीवप्रेमींकडूनही गणनेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करण्यात आली होती. मात्र, अचानकपणे लहरी निसर्गामुळे अभयारण्यातील वातावरण बदलले. संध्याकाळी ढग दाटून येण्यास सुरुवात झाली आणि विजांच्या कडकडाटासह गडगडाटी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे पुनवेचा चंद्रप्रकाश अभयारण्यात पडू शकला नाही. परिणामी या अभयारण्यात होणारी वन्यप्राणी गणना रद्द करण्याचा निर्णय सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्याकडून घेण्यात आला.

निरीक्षणाची संधी हुकली अन् साऱ्यांचाच हिरमोड

बुद्धपौर्णिमेची वाट वन्यजीवप्रेमी वर्षभर आतुरतेने बघत असतात. कारण या चांदण्या रात्रीच्या प्रकाशात वन्यप्राणी पाणवठ्यांवर सहज नजरेस पडतात. वन्यजीव विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह वन्यप्रेमींसाठी ही एकप्रकारची पर्वणीच असते. जंगलात रात्र मचाणीवर बसून जागून काढत वन्यप्राण्यांचा अधिवास व निरीक्षणे नोंदवून घेतली जात असतात. या निरीक्षणावरून वर्षभरात अभयारण्यात वन्यप्राण्यांचा असलेला वावर याविषयीचा अंदाज बांधला जातो. मात्र, ही संधी लहरी निसर्गामुळे हुकल्याने साऱ्यांचाच हिरमोड झाला.

 

टॅग्स :Nashikनाशिक