शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

कपाळमोक्ष : नागरिकांकडून मिळेना प्रतिसाद, योजना फलद्रूप होण्यात अडथळे महापालिकेच्या ‘स्मार्ट कार्ड’चा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:05 IST

नाशिक : कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने येस बॅँकेच्या संयुक्त विद्यमाने नियमित कर भरणाºया ५० हजार नागरिकांना मोफत प्रीपेड स्मार्ट कार्ड वितरणास सुरुवात केली असली तरी नागरिकांकडून मात्र त्याला प्रतिसाद मिळेनासा झाला आहे.

नाशिक : कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने येस बॅँकेच्या संयुक्त विद्यमाने नियमित कर भरणाºया ५० हजार नागरिकांना मोफत प्रीपेड स्मार्ट कार्ड वितरणास सुरुवात केली असली तरी नागरिकांकडून मात्र त्याला प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. पालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांना या कार्डच्या वितरणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे परंतु, नागरिकांपर्यंत कार्डची योजना नेऊन पोहोचविणे आणि त्यांच्याकडून कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून घेणे कर्मचाºयांना कष्टप्रद ठरत आहे. त्यामुळे प्रीपेड स्मार्ट कार्डची योजना लवकरच गुंडाळण्याची नामुष्की महापालिकेसह संबंधित बॅँकेवर ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महापालिकेने प्रीपेड स्मार्ट कार्ड तयार करत त्याचे वाटप विभागीय कार्यालयांमधून सुरू केले आहे. काही विभागीय कार्यालयांमध्ये कार्ड्स येऊन पडली आहेत परंतु, त्यांचे वाटप कसे करायचे हा यक्ष प्रश्न विभागीय अधिकाºयांना सतावतो आहे. नियमित कर भरणा करणाºया नागरिकांमधून ५० हजार लोकांची निवड करून त्यांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर विभागनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मात्र, आपल्याला स्मार्ट कार्ड मोफत मिळणार आहे, याची खबर अद्याप संबंधित निवड झालेल्या नागरिकांपर्यंत जाऊन पोहोचलेली नाही. सदर स्मार्ट कार्ड संबंधीची माहिती देणारे एसएमएस निवड झालेल्या नागरिकांच्या मोबाइलवर पाठविले जाणार असल्याचे महापालिकेकडून सांगितले जात असले तरी, निवड झालेल्या नागरिकांचे मोबाइल क्रमांकच कर विभागाकडे उपलब्ध नसल्याने एसएमएस कसे जाणार, हा प्रश्न उपस्थित होतो.कार्डचा आम्हाला काय उपयोग?सदर स्मार्ट कार्ड कोणत्याही कार्डप्रमाणे सर्व ठिकाणी म्हणजेच मॉल्स, शॉपिंग सेंटर्स व अन्य इतर ठिकाणी वापरता येणार आहे. सदर कार्डाद्वारे सर्व प्रकारची देयके, सेवाशुल्क भरता येईल. कार्डवर कॅश रिलोड व कॅश ट्रान्सफरसारख्या सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. परंतु, निवड करण्यात आलेले बव्हंशी करपात्र नागरिक हे सामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने त्यांच्याकडून ‘आम्हाला या कार्डचा काय उपयोग’ अशी उत्तरे मनपाच्या कर्मचाºयांना ऐकायला मिळत आहेत.सवलत योजनेचा विचार?संकेतस्थळावर विभागनिहाय नागरिकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे परंतु, विभागानुसार दहा हजार नागरिकांमधून आपले नाव शोधताना दमछाक होत आहे. मोबाइल नंबर नसल्याने नागरिकांना त्यांची निवड झाल्याचे कसे कळवावे, हा प्रश्न विभागीय अधिकाºयांपुढे आहे. घरपट्टी वसुली विभागातील कर्मचाºयांच्या माहितीतल्या नागरिकांना बोलावून घेत स्मार्ट कार्ड वितरणाची प्रक्रिया पार पाडली जात असली तरी, केवायसीसाठी कागदपत्रे देण्यास नागरिकांकडून नकार दिला जात आहे. नागरिकांना स्मार्ट कार्डबरोबरच काही इन्सेन्टीव्ह म्हणून सवलत योजना लागू करता येईल काय, असा एक विचार पुढे आला आहे. परंतु सदरचा निर्णय हा धोरणात्मक असल्याने आणि त्यासाठी खर्चाची तरतूद कोणी करायची हा एक वादाचा मुद्दा असल्याने प्रशासनाकडूनही चाचपणी सुरू आहे.एका बॅँकेच्या फायद्यासाठी महापालिका आपल्या खजिन्यातून निधी उपलब्ध करून देईल, असे वाटत नाही.