शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

आजी-माजी पालकमंत्र्यांची ‘खुशी-नाखुशी’

By admin | Updated: September 13, 2015 23:06 IST

श्रेयवाद : नियोजनावरून एकमेकांना शाब्दिक स्नान

नाशिक : सिंहस्थ महाकुंभपर्वणीला रामकुंड परिसरात गोदाघाटावर लक्षावधी भाविक गोदास्नान करत पुण्य पदरात पाडून घेत असताना रामकुंडाच्याच साक्षीने जिल्ह्याचे आजी-माजी पालकमंत्री प्रशासकीय नियोजनावरून एकमेकांना शाब्दिक स्नान घालण्यात व्यस्त होते. विद्यमान कुंभमेळामंत्री व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासकीय नियोजनाला शंभर टक्के गुण देत ६० ते ७० लाख भाविक आल्याचा दावा केला, तर माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ‘देर आये दुरुस्त आये’ असे म्हणतानाच पहिल्या पर्वणीला स्वत:सह नाशिककरांनी आवाज उठविल्यानेच दुसरी पर्वणी सुकर झाल्याचे श्रेय आपल्याकडे घेण्यास विसरले नाहीत.पहिल्या पर्वणीला दि. २९ आॅगस्ट रोजी पोलिसांच्या अतिरेकी बंदोबस्ताचा फटका भाविकांची संख्या घटण्यावर झाला. पोलिसांच्या बंदोबस्ताचे तीव्र पडसाद उमटले. शहरात ठिकठिकाणी बॅरिकेडिंगचे अडथळे निर्माण करतानाच अंतर्गत वाहतूक व्यवस्थाही बंद करण्यात आल्याने भाविकांना १५ ते २० कि.मी. पायपीट करत प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. शहरात अघोषित संचारबंदीच लागू करण्यात आली होती. प्रसिद्धीमाध्यमांनी या अतिरेकी नियोजनावर सडकून टीका केली. त्यानंतर माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही ‘कुंभकर्फ्यू’ अशी त्याची संभावना केली होती. जिल्हा प्रशासनासह राज्य सरकारवरही आयतीच चालून आलेली टीका करण्याची संधी भुजबळांनी गमावली नाही. भुजबळ यांनी जाहीर भाषणांतही या बंदोबस्ताची टर उडविली होती शिवाय मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले होते. प्रचंड टीका झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने फेरनियोजनावर भर दिला. महापर्वणीला ठिकठिकाणी असलेला बॅरिकेडिंगचा अडथळा दूर करताना भाविकांची पायपीटही कमी केली. त्यामुळे भाविकांचा ओघ वाढत गेला. महापर्वणीचे नियोजन यशस्वी झाल्याचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहणाऱ्या पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रामकुंडावर माध्यमांशी बोलताना नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. पहिल्या पर्वणीला झालेल्या चुका दुरुस्त केल्याने सर्व घाटांवर भाविकांची गर्दी दिसून येत आहे. भाविकांची पायपीट कमी झाल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले. याचदरम्यान, माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही माध्यमांशी संवाद साधताना फेरनियोजन चांगले झाले, परंतु तरीही आपण शंभर टक्के समाधानी नसल्याचे सांगितले. पहिल्या पर्वणीला पोलिसांची वागणूक चुकीचीच होती. त्यांनी भाविकांना त्रास देण्याचे पाप केले. कामचुकारपणा केला. भाविक येऊच नये, असेच त्यांनी नियोजन केले होते. त्याविरोधात सर्वांनी आवाज उठविला. मी स्वत: मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्याचा परिणाम म्हणून जुने-नवीन अधिकारी पाठविले. बॅरिकेडिंग हटविले. यापुढची पर्वणीही अशीच सुखकर होवो, अशी इच्छाही भुजबळांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

पालकमंत्र्यांचे साठ लाख;भुजबळांचे पंचवीस लाख   महापर्वणीला नाशिक व त्र्यंबकेश्‍वर या दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे ६0 ते ७0 लाख भाविकांनी हजेरी लावल्याचा दावा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला. त्यावर टिपणी करताना छगन भुजबळ यांनी महाजनांवर टीका करत २५ लाखांच्या आसपास भाविक असल्याचा अंदाज सांगितला. पालकमंत्री सूर मारतात, परंतु नंतर त्यांचे काम सारे बेसूर होते, अशी टीकाही भुजबळांनी केली.