शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आजी-माजी पालकमंत्र्यांची ‘खुशी-नाखुशी’

By admin | Updated: September 13, 2015 23:06 IST

श्रेयवाद : नियोजनावरून एकमेकांना शाब्दिक स्नान

नाशिक : सिंहस्थ महाकुंभपर्वणीला रामकुंड परिसरात गोदाघाटावर लक्षावधी भाविक गोदास्नान करत पुण्य पदरात पाडून घेत असताना रामकुंडाच्याच साक्षीने जिल्ह्याचे आजी-माजी पालकमंत्री प्रशासकीय नियोजनावरून एकमेकांना शाब्दिक स्नान घालण्यात व्यस्त होते. विद्यमान कुंभमेळामंत्री व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासकीय नियोजनाला शंभर टक्के गुण देत ६० ते ७० लाख भाविक आल्याचा दावा केला, तर माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ‘देर आये दुरुस्त आये’ असे म्हणतानाच पहिल्या पर्वणीला स्वत:सह नाशिककरांनी आवाज उठविल्यानेच दुसरी पर्वणी सुकर झाल्याचे श्रेय आपल्याकडे घेण्यास विसरले नाहीत.पहिल्या पर्वणीला दि. २९ आॅगस्ट रोजी पोलिसांच्या अतिरेकी बंदोबस्ताचा फटका भाविकांची संख्या घटण्यावर झाला. पोलिसांच्या बंदोबस्ताचे तीव्र पडसाद उमटले. शहरात ठिकठिकाणी बॅरिकेडिंगचे अडथळे निर्माण करतानाच अंतर्गत वाहतूक व्यवस्थाही बंद करण्यात आल्याने भाविकांना १५ ते २० कि.मी. पायपीट करत प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. शहरात अघोषित संचारबंदीच लागू करण्यात आली होती. प्रसिद्धीमाध्यमांनी या अतिरेकी नियोजनावर सडकून टीका केली. त्यानंतर माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही ‘कुंभकर्फ्यू’ अशी त्याची संभावना केली होती. जिल्हा प्रशासनासह राज्य सरकारवरही आयतीच चालून आलेली टीका करण्याची संधी भुजबळांनी गमावली नाही. भुजबळ यांनी जाहीर भाषणांतही या बंदोबस्ताची टर उडविली होती शिवाय मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले होते. प्रचंड टीका झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने फेरनियोजनावर भर दिला. महापर्वणीला ठिकठिकाणी असलेला बॅरिकेडिंगचा अडथळा दूर करताना भाविकांची पायपीटही कमी केली. त्यामुळे भाविकांचा ओघ वाढत गेला. महापर्वणीचे नियोजन यशस्वी झाल्याचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहणाऱ्या पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रामकुंडावर माध्यमांशी बोलताना नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. पहिल्या पर्वणीला झालेल्या चुका दुरुस्त केल्याने सर्व घाटांवर भाविकांची गर्दी दिसून येत आहे. भाविकांची पायपीट कमी झाल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले. याचदरम्यान, माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही माध्यमांशी संवाद साधताना फेरनियोजन चांगले झाले, परंतु तरीही आपण शंभर टक्के समाधानी नसल्याचे सांगितले. पहिल्या पर्वणीला पोलिसांची वागणूक चुकीचीच होती. त्यांनी भाविकांना त्रास देण्याचे पाप केले. कामचुकारपणा केला. भाविक येऊच नये, असेच त्यांनी नियोजन केले होते. त्याविरोधात सर्वांनी आवाज उठविला. मी स्वत: मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्याचा परिणाम म्हणून जुने-नवीन अधिकारी पाठविले. बॅरिकेडिंग हटविले. यापुढची पर्वणीही अशीच सुखकर होवो, अशी इच्छाही भुजबळांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

पालकमंत्र्यांचे साठ लाख;भुजबळांचे पंचवीस लाख   महापर्वणीला नाशिक व त्र्यंबकेश्‍वर या दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे ६0 ते ७0 लाख भाविकांनी हजेरी लावल्याचा दावा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला. त्यावर टिपणी करताना छगन भुजबळ यांनी महाजनांवर टीका करत २५ लाखांच्या आसपास भाविक असल्याचा अंदाज सांगितला. पालकमंत्री सूर मारतात, परंतु नंतर त्यांचे काम सारे बेसूर होते, अशी टीकाही भुजबळांनी केली.