शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सप्तशृंगगडावर ‘जोर’धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 18:13 IST

वणी : सप्तशृंगगडावर वादळी वाºयासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. यामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. रविवारी सकाळच्या सुमारास हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला तर दुपारी पावसाचे स्वरूप भयावह होते.

ठळक मुद्देजनजीवन विस्कळित : वादळी वाऱ्यासह परिसराला झोडपले

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : सप्तशृंगगडावर वादळी वाºयासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. यामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. रविवारी सकाळच्या सुमारास हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला तर दुपारी पावसाचे स्वरूप भयावह होते.वादळी वारा व पावसामुळे गडावर जिकडे तिकडे पाणीचपाणी साचले होते. अवघ्या पाण्याचे लोंढेचे लोंढे गडावरून पर्वतरांगाचा मार्ग शोधत प्रवाहीत होत असतानाचे फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावरुन व्हायरल झाले आहे. अनेक किलोमीटर अंतरावरुन पाण्याचा प्रवाह धबधब्याच्या स्वरुपात पवर्तावरुन भुभागाकडे येत असतानाचे आकर्षक नैसर्गिक सौंदर्याचे फोटो अनेकांनी शेअर केले . गडावरील दुकानामधील वस्तुंचे नुकसान झाले. दुकानाचे पडदे फाटले. काही दुकानांचे प्लास्टिक उडाले. काही दुकानाचे पत्रे उडाले तर अनेकांच्या दुकानातील प्रसाद साड्या व इतर वस्तु पावसामुळे ओल्या झाल्या. गडावर दुपारी दीड वाजेच्या सुमारास पावसास प्रारंभ झाला. दुपारी ४ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. त्या दरम्यान रस्त्यावरचे काही दिसेनासे झाले होते.वणी शहरातही रविवारी दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. देवनदीला पुर आला होता. गडावरील पावसामुळे देवनदीमार्गे जाणारे पाणी ओझरखेड धरणात जात असल्याने ओझरखेड धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. काही दिवस पावसाने ब्रेक घेतला होता, मात्र रविवारी पावसाने रौद्र स्वरुप दाखविल्याने सगळीकडे पाणीच पाणी दिसुन येत होते. दरम्यान दिंडोरी व चांदवड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पारेगाव धोडंबे त्यापुढे असलेले कानमंडळे खर्डे परीसरातही जोरदार पाऊस झाला पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतुकीचा खोळंबा या ठिकाणी झाला होता हा पाऊस काही पिकांना अनुकूल तर काही पिकांना प्रतिकुल मानन्यात येत आहे दरम्यान सोमवारी सकाळच्या सुमारास पावसाने उघडीप दिल्याने सूर्यनारायणाचे दर्शन झाले. लोहोणेरला ऊस भुईसपाटलोहोणेर : परिसरात रविवारी दुपारी झालेल्या पावसामुळे येथील प्रगतिशील शेतकरी रामराव देशमुख यांचे ऊस पिकाचे नुकसान झाले. ऊस अक्षरश: भुईसपाट झाला. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून सदर नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी रामराव देशमुख यांनी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी