शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जिगरवाला वायरमन... बंधाऱ्यात १०० फूट लांब पोहत जाऊन केली खांबावरील 'वीजदुरुस्ती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 18:11 IST

जिगरबाज कामगिरी : चार तासाच्या मेहनतीनंतर वीजप्रवाह सुरळीत

सिन्नर (जि. नाशिक) (शैलेश कर्पे) : वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर वीज वितरण कंपनी व कर्मचाऱ्यांना शिव्यांची लाखोळी वाहणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांच्या टीकेला सिन्नर तालुक्यातील वावी-पाथरे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याने आपल्या जिगरबाज कामगिरीने चोख उत्तर देऊन टीकाकारांची तोंड बंद केली आहे. वीज वितरण कंपनीच्या या कर्मचाऱ्याने जीवाची बाजी लावून बंधाऱ्यातून सुमारे १०० फूट लांब व २० फूट खोल पाण्यातून पोहत जाऊन वीजपुरवठा सुरळीत केल्याने त्याचे कौतुक होत आहे.

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील वावी येथील ३३ केव्हीच्या वीज उपकेंद्राचा वीजपुरवठा सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास खंडित झाला. यामुळे सुमारे २८ गावांची वीज बंद झाली. सिन्नरचे उपकार्यकारी अभियंता ऋषीकेश खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता अजय सावळे, पाथरेचे सहायक अभियंता हर्षल मांडगे यांच्यासह वावी व पाथरे वीज उपकेंद्राचे ८ ते ९ वीज कर्मचाऱ्यांचे पथक ‘ फॉल्ट ’ शोधण्यासाठी वावीपासून पेट्रोलिंगला लागले. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास गोंदे शिवारात एका बंधाऱ्यातील तीन विद्युत खांबावरील बंधाऱ्याच्या मधोमध असलेल्या खांबावरील जम्प तुटला असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सावळे, मांडगे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला. ज्या विद्युत खांबावर फॉल्ट होता तो खांब बंधाऱ्याच्या मधोमध सुमारे १०० फूट लांब होता. बंधाऱ्यात सुमारे २० फूट खोल पाणी होते. त्यामुळे या बंधाऱ्यात मधोमध असलेल्या खांबापर्यंत पोहचण्याचे दिव्य काम वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसमोर होते. होडीची सोय नसल्याने पोहत जाऊनच काम करावे लागणार होते.

वावी-पाथरे वीज कक्ष कार्यालयातील कर्मचारी योगेश बापू वाघ याने पोहत जाऊन खांबावर चढून दुरुस्तीचे काम करण्यास तयार असल्याचे सांगितले. वाघ यांच्या पाठीला दोर बांधून व संरक्षक साधने घेऊन त्यांनी पाण्यात उडी घेतली. सुमारे १०० फूट पोहत जाऊन वाघ यांनी विद्युत खांब गाठला. त्यानंतर त्यावर चढून दुरुस्ती केली. सकाळी साडेअकरा वाजता सापडलेला फॉल्ट अडीच वाजेच्या सुमारास दुरुस्त करण्यात आला. वाघ यांच्यासह वीज वितरण कंपनीच्या ७ ते ८ कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून विद्युत प्रवाह सुरळीत केल्यानंतर अडीच वाजेच्या सुमारास २८ गावांचा वीजपुरवठा सुरळीत सुरु झाला. दरवेळी वीज वितरण कंपनीवर टीका करणाऱ्या टीकाकारांना या योगेश वाघ यांनी चोख उत्तर देऊन गप्प केले.

‘वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर दरवेळी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर टीका करण्यापेक्षा त्यांना समजून घेत जा. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी ग्राहकांच्या आणि जनतेच्या सेवेसाठीच आहेत. आम्ही सहकार्य करतो जनतेने ही सहकार्य करावे.- अजय सावळे, सहायक अभियंता, वावी

टॅग्स :sinnar-acसिन्नरNashikनाशिक