शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

जयदर : वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी, महावितरण अधिकाºयांना निवेदन आदिवासी शेतकºयांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 12:18 AM

कळवण : कनाशी येथील वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत अभियंत्यांनी आश्वासन देत या भागातील वीज वितरण समस्या मार्चअखेरीस मार्गी लावण्याचा शब्द दिल्यानंतर आदिवासी शेतकºयांनी मांडलेला ठिय्या मागे घेण्यात आला.

ठळक मुद्देशेती व्यवसाय धोक्यात आलाबैठकीत तासभर ठिय्या

कळवण : कनाशी येथील १३२ केव्ही केंद्रासह पिंपळे येथील प्रस्तावित वीज उपकेंद्र, जयदर येथे पाच एमव्हीएच्या रोहित्रासह जयदर परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी आश्वासन देत या भागातील वीज वितरण समस्या मार्चअखेरीस मार्गी लावण्याचा शब्द महावितरणच्या यंत्रणेने दिल्यानंतर जयदर परिसरातील वीज समस्या संदर्भातील बैठकीत आदिवासी शेतकºयांनी मांडलेला ठिय्या मागे घेण्यात आला. जयदर परिसरातील आदिवासी गावे, खेडी, पाडे व वस्त्यांवरील वीजपुरवठा सुरळीत नाही. विजेच्या खेळखंडोब्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला असून, जयदर परिसरातील वीज समस्यांबाबत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, महावितरणचे कार्यकारी अभियंता टेंभुर्णे, उपकार्यकारी अभियंता ऋषिकेश खैरनार, पंचायत समिती उपसभापती विजय शिरसाठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, पंचायत समिती सदस्य लाला जाधव, अर्जुन बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. जयदर परिसरात पाणी असूनही विजेअभावी पिकांना देता येत नसल्याने आदिवासी शेतकरीबांधवांनी आक्रमक भूमिका घेऊन या समस्येसंदर्भात बैठकीत तासभर ठिय्या मांडला व विजेच्या समस्या यंत्रणेसमोर कथन केल्या. शेतीला लागणारे पाणी विजेवर अवलंबून आहे. वीजपुरवठा वेळेवर मिळत नसल्याने व सततच्या होणाºया भारनियमनामुळे पिकांचे नुकसान होत असल्याने शेती व्यवसाय उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. वीज ठरवून दिलेल्या निर्धारित वेळेत न मिळता केव्हाही येते आणि केव्हाही जाते. त्यामुळे जयदर परिसरातील शेती व्यवसायाचे वेळापत्रक कोलमडून गेले आहे. शेतीला पुरेसे पाणी विजेअभावी देता येत नाही. मात्र वीज वितरण कंपनी शेतकºयांकडून १०० टक्के वीजबिल वसुली करते. मात्र वीजपुरवठा सुरळीत करत नसल्याने जयदर परिसरातील आदिवासी शेतकरी बांधवांनी या बैठकीत नाराजी व्यक्त केली. बैठकीस रामदास चव्हाण, मन्साराम गायकवाड, अर्जुन बागुल, तुळशीराम चौधरी, पंडित गांगुर्डे, हिरामण पालवी, आनंदा पालवी, पोपट गायकवाड, पांडुरंग गायकवाड, रामा पवार, गुलाब चौधरी, रतन बर्डे, पप्पू चव्हाण, उत्तम भोये, धवळू चौरे, भावडू बर्डे, कृष्णा बर्डे, हिरामण पवार, शिवाजी पवार, पांडुरंग देशमुख उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन रघू महाजन यांनी केले.