शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जायकवाडी धरणात यंदाही पाणी सोडणार : महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 19:27 IST

नाशिक : परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यातील काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय हा १५ आॅक्टोबरनंतरच्या आढावा बैठकीनंतर घेतला जाणार असून, नियमानुसार जायकवाडीसाठी पाणी सोडले जाणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी (दि़१४) पत्रकारांशी बोलताना दिली़

ठळक मुद्देराज्यात दुष्काळी परिस्थिती : नाशिक व नगरकरांवर पाणीकपातीचे संकट१५ आॅक्टोबरनंतर निर्णय

नाशिक : परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यातील काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय हा १५ आॅक्टोबरनंतरच्या आढावा बैठकीनंतर घेतला जाणार असून, नियमानुसार जायकवाडीसाठी पाणी सोडले जाणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी (दि़१४) पत्रकारांशी बोलताना दिली़

दिंडोरीरोडवर आर्थिकदृष्ट्या मागास मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी तयार करण्यात आलेल्या डॉ़ पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या उद्घाटनानंतर महाजन बोलत होते़ जायकवाडी धरणात यंदा ६५ टक्के इतका साठा असून, मेंढीगिरी समितीच्या शिफारसीनुसार नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून पाणी सोडावे लागण्याची शक्यता असून, नेमके किती व केव्हा पाणी सोडणार या पत्रकारांच्या प्रश्नावर ते बोलत होते़ त्यांनी सांगितले की, १५ आॅक्टोबरनंतर धरणांची स्थिती, त्यातील उपयुक्त जलसाठा, पाण्याची आवश्यकता या बाबींचा अभ्यास करून आढावा बैठकीनंतर पाणी सोडण्याचा निर्णय घेऊ़ तसेच नियमानुसार जायकवाडीसाठी पाणी सोडले जाणार असल्याचे ते म्हणाले़

जायकवाडी धरण ६५ टक्क्यांपेक्षा कमी भरल्यास समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार उर्ध्व गोदावरी खोºयातील गंगापूर-दारणा-पालखेड-प्रवरा -मुळा धरण समूहातून मेंढीगिरी समितीच्या सूचनेनुसार पाणी सोडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. यंदाच्या वर्षी जायकवाडी धरणाचा एकूण उपयुक्त पाणी साठा ७६ टीएमसी म्हणजे शंभर टक्के इतका आहे. खरीप हंगामाचा वापर आणि आजचा पाणी साठा ४४ टीएमसी झाला आहे. त्यामुळे यावर्षी उर्ध्व गोदावरी खोºयातून जायकवाडी धरणासाठी साधारणपणे ६ टीएमसी पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.

जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा नाशिक-अहमदनगर विरुद्ध मराठवाडा असा पाणीवाद होण्याची शक्यता आहे़ दरम्यान, पाणी सोडल्यानंतर नाशिक व नगरकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे़

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीटंचाई