शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

जायकवाडी धरणात यंदाही पाणी सोडणार : महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 19:27 IST

नाशिक : परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यातील काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय हा १५ आॅक्टोबरनंतरच्या आढावा बैठकीनंतर घेतला जाणार असून, नियमानुसार जायकवाडीसाठी पाणी सोडले जाणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी (दि़१४) पत्रकारांशी बोलताना दिली़

ठळक मुद्देराज्यात दुष्काळी परिस्थिती : नाशिक व नगरकरांवर पाणीकपातीचे संकट१५ आॅक्टोबरनंतर निर्णय

नाशिक : परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यातील काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय हा १५ आॅक्टोबरनंतरच्या आढावा बैठकीनंतर घेतला जाणार असून, नियमानुसार जायकवाडीसाठी पाणी सोडले जाणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी (दि़१४) पत्रकारांशी बोलताना दिली़

दिंडोरीरोडवर आर्थिकदृष्ट्या मागास मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी तयार करण्यात आलेल्या डॉ़ पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या उद्घाटनानंतर महाजन बोलत होते़ जायकवाडी धरणात यंदा ६५ टक्के इतका साठा असून, मेंढीगिरी समितीच्या शिफारसीनुसार नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून पाणी सोडावे लागण्याची शक्यता असून, नेमके किती व केव्हा पाणी सोडणार या पत्रकारांच्या प्रश्नावर ते बोलत होते़ त्यांनी सांगितले की, १५ आॅक्टोबरनंतर धरणांची स्थिती, त्यातील उपयुक्त जलसाठा, पाण्याची आवश्यकता या बाबींचा अभ्यास करून आढावा बैठकीनंतर पाणी सोडण्याचा निर्णय घेऊ़ तसेच नियमानुसार जायकवाडीसाठी पाणी सोडले जाणार असल्याचे ते म्हणाले़

जायकवाडी धरण ६५ टक्क्यांपेक्षा कमी भरल्यास समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार उर्ध्व गोदावरी खोºयातील गंगापूर-दारणा-पालखेड-प्रवरा -मुळा धरण समूहातून मेंढीगिरी समितीच्या सूचनेनुसार पाणी सोडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. यंदाच्या वर्षी जायकवाडी धरणाचा एकूण उपयुक्त पाणी साठा ७६ टीएमसी म्हणजे शंभर टक्के इतका आहे. खरीप हंगामाचा वापर आणि आजचा पाणी साठा ४४ टीएमसी झाला आहे. त्यामुळे यावर्षी उर्ध्व गोदावरी खोºयातून जायकवाडी धरणासाठी साधारणपणे ६ टीएमसी पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.

जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा नाशिक-अहमदनगर विरुद्ध मराठवाडा असा पाणीवाद होण्याची शक्यता आहे़ दरम्यान, पाणी सोडल्यानंतर नाशिक व नगरकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे़

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीटंचाई