शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरणात यंदाही पाणी सोडणार : महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 19:27 IST

नाशिक : परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यातील काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय हा १५ आॅक्टोबरनंतरच्या आढावा बैठकीनंतर घेतला जाणार असून, नियमानुसार जायकवाडीसाठी पाणी सोडले जाणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी (दि़१४) पत्रकारांशी बोलताना दिली़

ठळक मुद्देराज्यात दुष्काळी परिस्थिती : नाशिक व नगरकरांवर पाणीकपातीचे संकट१५ आॅक्टोबरनंतर निर्णय

नाशिक : परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यातील काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय हा १५ आॅक्टोबरनंतरच्या आढावा बैठकीनंतर घेतला जाणार असून, नियमानुसार जायकवाडीसाठी पाणी सोडले जाणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी (दि़१४) पत्रकारांशी बोलताना दिली़

दिंडोरीरोडवर आर्थिकदृष्ट्या मागास मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी तयार करण्यात आलेल्या डॉ़ पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या उद्घाटनानंतर महाजन बोलत होते़ जायकवाडी धरणात यंदा ६५ टक्के इतका साठा असून, मेंढीगिरी समितीच्या शिफारसीनुसार नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून पाणी सोडावे लागण्याची शक्यता असून, नेमके किती व केव्हा पाणी सोडणार या पत्रकारांच्या प्रश्नावर ते बोलत होते़ त्यांनी सांगितले की, १५ आॅक्टोबरनंतर धरणांची स्थिती, त्यातील उपयुक्त जलसाठा, पाण्याची आवश्यकता या बाबींचा अभ्यास करून आढावा बैठकीनंतर पाणी सोडण्याचा निर्णय घेऊ़ तसेच नियमानुसार जायकवाडीसाठी पाणी सोडले जाणार असल्याचे ते म्हणाले़

जायकवाडी धरण ६५ टक्क्यांपेक्षा कमी भरल्यास समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार उर्ध्व गोदावरी खोºयातील गंगापूर-दारणा-पालखेड-प्रवरा -मुळा धरण समूहातून मेंढीगिरी समितीच्या सूचनेनुसार पाणी सोडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. यंदाच्या वर्षी जायकवाडी धरणाचा एकूण उपयुक्त पाणी साठा ७६ टीएमसी म्हणजे शंभर टक्के इतका आहे. खरीप हंगामाचा वापर आणि आजचा पाणी साठा ४४ टीएमसी झाला आहे. त्यामुळे यावर्षी उर्ध्व गोदावरी खोºयातून जायकवाडी धरणासाठी साधारणपणे ६ टीएमसी पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.

जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा नाशिक-अहमदनगर विरुद्ध मराठवाडा असा पाणीवाद होण्याची शक्यता आहे़ दरम्यान, पाणी सोडल्यानंतर नाशिक व नगरकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे़

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीटंचाई