शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

जायकवाडी धरणात यंदाही पाणी सोडणार : महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 19:27 IST

नाशिक : परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यातील काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय हा १५ आॅक्टोबरनंतरच्या आढावा बैठकीनंतर घेतला जाणार असून, नियमानुसार जायकवाडीसाठी पाणी सोडले जाणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी (दि़१४) पत्रकारांशी बोलताना दिली़

ठळक मुद्देराज्यात दुष्काळी परिस्थिती : नाशिक व नगरकरांवर पाणीकपातीचे संकट१५ आॅक्टोबरनंतर निर्णय

नाशिक : परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यातील काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय हा १५ आॅक्टोबरनंतरच्या आढावा बैठकीनंतर घेतला जाणार असून, नियमानुसार जायकवाडीसाठी पाणी सोडले जाणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी (दि़१४) पत्रकारांशी बोलताना दिली़

दिंडोरीरोडवर आर्थिकदृष्ट्या मागास मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी तयार करण्यात आलेल्या डॉ़ पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या उद्घाटनानंतर महाजन बोलत होते़ जायकवाडी धरणात यंदा ६५ टक्के इतका साठा असून, मेंढीगिरी समितीच्या शिफारसीनुसार नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून पाणी सोडावे लागण्याची शक्यता असून, नेमके किती व केव्हा पाणी सोडणार या पत्रकारांच्या प्रश्नावर ते बोलत होते़ त्यांनी सांगितले की, १५ आॅक्टोबरनंतर धरणांची स्थिती, त्यातील उपयुक्त जलसाठा, पाण्याची आवश्यकता या बाबींचा अभ्यास करून आढावा बैठकीनंतर पाणी सोडण्याचा निर्णय घेऊ़ तसेच नियमानुसार जायकवाडीसाठी पाणी सोडले जाणार असल्याचे ते म्हणाले़

जायकवाडी धरण ६५ टक्क्यांपेक्षा कमी भरल्यास समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार उर्ध्व गोदावरी खोºयातील गंगापूर-दारणा-पालखेड-प्रवरा -मुळा धरण समूहातून मेंढीगिरी समितीच्या सूचनेनुसार पाणी सोडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. यंदाच्या वर्षी जायकवाडी धरणाचा एकूण उपयुक्त पाणी साठा ७६ टीएमसी म्हणजे शंभर टक्के इतका आहे. खरीप हंगामाचा वापर आणि आजचा पाणी साठा ४४ टीएमसी झाला आहे. त्यामुळे यावर्षी उर्ध्व गोदावरी खोºयातून जायकवाडी धरणासाठी साधारणपणे ६ टीएमसी पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.

जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा नाशिक-अहमदनगर विरुद्ध मराठवाडा असा पाणीवाद होण्याची शक्यता आहे़ दरम्यान, पाणी सोडल्यानंतर नाशिक व नगरकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे़

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीटंचाई