शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

जावडेकर यांचा दावा : स्वतंत्र विदर्भाबाबत योग्य वेळी घेणार निर्णय

By admin | Updated: September 30, 2014 22:54 IST

शिवसेनेशिवाय भाजपाला मिळणार बहुमत

नाशिक : १९७८ नंतर प्रथमच महाराष्ट्रात राजकीय इतिहास बदलत असून, आघाडीऐवजी प्रथमच एका पक्षाला बहुमत मिळून सत्ता येणार आहे, असा दावा भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. शिवसेना बरोबर नसतानाही भाजपाला यश मिळेल काय, या प्रश्नावर त्यांनी भाजपालाच सत्ता मिळेल, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, स्वतंत्र विदर्भाबाबत भाजपा ठाम असून, त्याबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल, असा दावा त्यांनी केला.विधानसभा प्रचारासाठी मुलुखमैदान या उपक्रमांतर्गत नाशिकला आलेल्या प्रकाश जावडेकर यांनी वसंतस्मृती येथे पत्रकारांशी बोलताना कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीवर कडाडून टीका केली. दोन्ही पक्ष एकमेकांच्या पापात सहभागी होण्यास तयार नाहीत असे सांगत आहेत; परंतु पंधरा वर्षे त्यांनी संयुक्त पातक केले आहे. त्यामुळे त्यांना त्याची शिक्षा भोगावीच लागेल, असे सांगून त्यांनी या निवडणुकीत भाजपा महायुती निवडणूक लढवित आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाच्या यशाची प्रचिती आली आहे. राज्यात हीच परिस्थिती होणार असून, भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल, असा दावा त्यांनी केला. शिवसेनेशिवाय हे यश मिळेल, यालाही त्यांनी दुजोरा दिला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीनंतर कॉँग्रेस आणि आपला पक्ष एकत्र येऊ शकतात, असे म्हटले आहे. याबद्दल जावडेकर यांनी शरद पवार यांचे अभिनंदन करीत, त्यांनी हे अगोदरच कबूल केले हे बरे असल्याचे सांगितले. परंतु विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाला गरज भासल्यास शिवसेनेला बरोबर घेणार काय, या मुद्द्याला सोयीने बगल देत ते त्याच वेळी समजेल, असे सांगितले. भाजपाला स्वतंत्र विदर्भ हवा आहे, या मुद्द्यावरही त्यांनी बोलताना स्वतंत्र विदर्भ ही भाजपाची सैद्धांतिक भूमिका असून, त्यात स्थळ, काळ परत्वे योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)