शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

जलकुंभाचे काम १० महिन्यांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 15:57 IST

सिन्नर: तालुक्यातील वडांगळी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभाचे काम गेल्या १० महिन्यांपासून बंद आहे.जुना जलकुंभ जीर्ण झाला असून अद्यापही त्याद्वारेच गावाची तहान भागविली जात आहे.जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने तत्काळ अर्धवट बांधलेल्या जलकुंभाचे काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रीनव्हिजन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष सुदेश खुळे यांनी केली आहे.

ठळक मुद्देजलकुंभाचे आयुष्य २५ वर्षांचेच...

सिन्नर: तालुक्यातील वडांगळी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभाचे काम गेल्या १० महिन्यांपासून बंद आहे.जुना जलकुंभ जीर्ण झाला असून अद्यापही त्याद्वारेच गावाची तहान भागविली जात आहे.जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने तत्काळ अर्धवट बांधलेल्या जलकुंभाचे काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रीनव्हिजन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष सुदेश खुळे यांनी केली आहे.१९८०-८१ साली तत्कालीन सरपंच शिवाजी निवृत्ती खुळे यांनी गावात पिण्याच्या पाण्यासाठी नळ पाणीपुरवठा योजना राबविली. त्यासाठी १ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्यात आला.जलकुंभाला लागलेली गळती पाहून ४.५ वर्षांपूर्वी तत्कालीन सरपंच सुनीता पोपट सैद व कर्मचारी सुरेश काहंडळ यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून या जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले.त्यानंतर नवीन जलकुंभ मंजूर करायचा असल्याने शासनाने हा जलकुंभ निर्लेखित केला.तथापि, जलकुंभाचे काम सुरू झाल्यानंतर ६ महिन्यांच्या आत त्याचे बांधकाम पूर्ण होईल,अशी अपेक्षा असतांना गेल्या १० महिन्यांपासून ह्या जलकुंभाचे बांधकाम बंद आहे.ग्रामपंचायतने याबाबत संबंधित बांधकाम यंत्रणा पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद नाशिक यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार केला आहे.मात्र अद्यापही काम सुरू होऊ शकलेले नाही.सध्या जुना जलकुंभ अतिशय जीर्ण झाला असून त्याद्वारेच गावाची तहान भागविली जाते.ग्रामपंचायतकडे नळपाणी पुरवठा सुरू ठेवण्यासाठी पर्यायी जलकुंभ नसल्याने जुना जलकुंभ लगेच पाडल्यास गावचा पाणी पुरवठा बंद होईल.काम अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याबरोबरच हे काम चांगल्या व अनुभवी ठेकेदाराकडे देण्यात यावे,अशी मागणी सुदेश खुळे यांनी केली आहे.जलकुंभाचे आयुष्य २५ वर्षांचेच...'मी सरपंच असतांना सन १९८०-८१ साली नळपाणी पुरवठा योजना राबविली.त्यावेळी ह्या जलकुंभाचे आयुष्य २५ वर्षांसाठी असेल असे सांगितले गेले.आजरोजी त्याला ४० वर्ष होत आहे.मात्र नवीन जलकुंभाचे बांधकाम तात्काळ पूर्ण करून जुन्या जलकुंभावरील भार कमी करावा.शिवाजी खुळे, योजना राबविणारे तत्कालीन सरपंचपाठपुरावा करूनही प्रतिसाद नाही'जलकुंभाचे काम बंद झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाशी ग्रामपंचायतने पत्रव्यवहार केला आहे.मात्र जिल्हा परिषदेकडून आम्हांला उत्तरही मिळाले नाही आणि जलकुंभाचे कामही सुरू झाले नाही.किशोर खुळे, माजी उपसरपंच 

टॅग्स :Waterपाणीsinnar-acसिन्नर