शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

जलकुंभाचे काम १० महिन्यांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 15:57 IST

सिन्नर: तालुक्यातील वडांगळी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभाचे काम गेल्या १० महिन्यांपासून बंद आहे.जुना जलकुंभ जीर्ण झाला असून अद्यापही त्याद्वारेच गावाची तहान भागविली जात आहे.जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने तत्काळ अर्धवट बांधलेल्या जलकुंभाचे काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रीनव्हिजन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष सुदेश खुळे यांनी केली आहे.

ठळक मुद्देजलकुंभाचे आयुष्य २५ वर्षांचेच...

सिन्नर: तालुक्यातील वडांगळी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभाचे काम गेल्या १० महिन्यांपासून बंद आहे.जुना जलकुंभ जीर्ण झाला असून अद्यापही त्याद्वारेच गावाची तहान भागविली जात आहे.जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने तत्काळ अर्धवट बांधलेल्या जलकुंभाचे काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रीनव्हिजन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष सुदेश खुळे यांनी केली आहे.१९८०-८१ साली तत्कालीन सरपंच शिवाजी निवृत्ती खुळे यांनी गावात पिण्याच्या पाण्यासाठी नळ पाणीपुरवठा योजना राबविली. त्यासाठी १ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्यात आला.जलकुंभाला लागलेली गळती पाहून ४.५ वर्षांपूर्वी तत्कालीन सरपंच सुनीता पोपट सैद व कर्मचारी सुरेश काहंडळ यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून या जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले.त्यानंतर नवीन जलकुंभ मंजूर करायचा असल्याने शासनाने हा जलकुंभ निर्लेखित केला.तथापि, जलकुंभाचे काम सुरू झाल्यानंतर ६ महिन्यांच्या आत त्याचे बांधकाम पूर्ण होईल,अशी अपेक्षा असतांना गेल्या १० महिन्यांपासून ह्या जलकुंभाचे बांधकाम बंद आहे.ग्रामपंचायतने याबाबत संबंधित बांधकाम यंत्रणा पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद नाशिक यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार केला आहे.मात्र अद्यापही काम सुरू होऊ शकलेले नाही.सध्या जुना जलकुंभ अतिशय जीर्ण झाला असून त्याद्वारेच गावाची तहान भागविली जाते.ग्रामपंचायतकडे नळपाणी पुरवठा सुरू ठेवण्यासाठी पर्यायी जलकुंभ नसल्याने जुना जलकुंभ लगेच पाडल्यास गावचा पाणी पुरवठा बंद होईल.काम अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याबरोबरच हे काम चांगल्या व अनुभवी ठेकेदाराकडे देण्यात यावे,अशी मागणी सुदेश खुळे यांनी केली आहे.जलकुंभाचे आयुष्य २५ वर्षांचेच...'मी सरपंच असतांना सन १९८०-८१ साली नळपाणी पुरवठा योजना राबविली.त्यावेळी ह्या जलकुंभाचे आयुष्य २५ वर्षांसाठी असेल असे सांगितले गेले.आजरोजी त्याला ४० वर्ष होत आहे.मात्र नवीन जलकुंभाचे बांधकाम तात्काळ पूर्ण करून जुन्या जलकुंभावरील भार कमी करावा.शिवाजी खुळे, योजना राबविणारे तत्कालीन सरपंचपाठपुरावा करूनही प्रतिसाद नाही'जलकुंभाचे काम बंद झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाशी ग्रामपंचायतने पत्रव्यवहार केला आहे.मात्र जिल्हा परिषदेकडून आम्हांला उत्तरही मिळाले नाही आणि जलकुंभाचे कामही सुरू झाले नाही.किशोर खुळे, माजी उपसरपंच 

टॅग्स :Waterपाणीsinnar-acसिन्नर