शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पेठ तालुक्यात जलकुंभ स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 00:11 IST

पेठ : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणारे साथीचे आजार रोखण्यासाठी पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने पाणी गुणवत्ता कार्यक्र मांतर्गत सार्वजनिक जलकुंभ व हातपंप शुध्दीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली असून, पेठ तालुक्यात या अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पेठ : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणारे साथीचे आजार रोखण्यासाठी पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने पाणी गुणवत्ता कार्यक्र मांतर्गत सार्वजनिक जलकुंभ व हातपंप शुध्दीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली असून, पेठ तालुक्यात या अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे.ग्रामीण जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी ग्रामपंचायत, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रासह शासकीय व सार्वजनिक ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाची स्वच्छता करण्यास सुरु वात झाली आहे.ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य सहायक, जलसुरक्षा रक्षक यांच्या मदतीने जलकुंभांची स्वच्छता करण्यात येणार असून, हातपंपांची दुरु स्ती व शुद्धीकरणहीकरण्यात येणार आहे. पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.टीसीएल पावडरची उपलब्धता, वाटप नियोजन व कार्यवाही बाबतची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनावर सोपवण्यात आलीआहे.----------------------------शाळांच्या टाक्या झाल्या स्वच्छ१ जूनपासून सुरू झालेल्या अभियानाता पेठ तालुक्यातील २२६ शाळांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता केली असून, शिक्षकांनी सुटीच्या कालावधीत विद्यार्थी व ग्रामस्थांच्या मदतीने कोरोनाबाबत खबरदारी घेत टाक्यांची स्वच्छता करून घेतली. गटशिक्षण अधिकारी सरोज जगताप यांनी केलेल्या आवाहनाला शिक्षकांनी प्रतिसाद दिल्याने जवळपास सर्वच शाळांवर सदर अभियान राबवण्यात आले.साथीच्या आजारांवर उपाययोजनासध्या पावसाचे दिवस सुरू झाले असून, केवळ दूषित पाण्यामुळे अनेक प्रकारचे साथीचे आजार उद्भवतात. अशावेळी प्रशासनावर मोठा ताण पडत असून, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याचा संभव असतो. म्हणून पावसाळ्यापूर्वीच यावर उपाययोजना करण्यात येणार असल्यानेआगामी काळात साथीचे आजार रोखण्यात प्रशासनाला काही प्रमाणात यश येईल. सध्या कोरोनाचे संकट असल्याने त्यात साथीच्या आजारांची भर पडूनये, यासाठी प्रशासन सतर्कअसल्याचे गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी सांगितले.----------------------नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील सर्व पाण्याचे साठे, भांडी रिकामी करून स्वच्छ धुऊन उन्हात वाळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक जलकुंभाच्या दर्शनीभागात पक्क्या रंगांनी जलकुंभ स्वच्छतेची तारीख प्रदर्शित करण्याबाबत सुचवण्यात आले आहे.- नम्रता जगताप, गटविकास अधिकारी, पेठ

टॅग्स :Nashikनाशिक