शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला जललक्ष्मी पावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 02:03 IST

यंदाच्या पावसाळ्यानंतर गंगापूरसह अन्य धरणांतून ४६०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण देण्यास टाळाटाळ करणाऱ्या जिल्हा प्रशासनाने अचानक महापालिकेवर प्रसन्न होऊन तब्बल ४९०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी त्यावर मोहोर उमटविली असून, त्यामुळे नाशिककरांचा पाणीप्रश्न सुटला आहे.

नाशिक : यंदाच्या पावसाळ्यानंतर गंगापूरसह अन्य धरणांतून ४६०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण देण्यास टाळाटाळ करणाऱ्या जिल्हा प्रशासनाने अचानक महापालिकेवर प्रसन्न होऊन तब्बल ४९०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी त्यावर मोहोर उमटविली असून, त्यामुळे नाशिककरांचा पाणीप्रश्न सुटला आहे.  यंदा मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी पुन्हा पाणी सोडावे लागणार असल्याने नाशिक शहरास जिल्ह्यातून तीव्र पडसाद उमटले जात असताना मागणीपेक्षा राज्याचे जलसंपदा आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मोठा दिलासा दिला असून, त्यामुळे नाशिककरांचा रोष कमी होण्याची शक्यता आहे.  पावसाळा संपतानाच आॅक्टोबर महिन्यात आगामी दहा महिन्यांचे पाणी आरक्षण करण्यात येते. यंदा अशाप्रकारची बैठक प्रशासकीय पातळीवरच झाली. महापालिकेने गंगापूर धरणातून ४३०० दशलक्ष घनफूट, दारणा धरणातून तीनशे आणि मुकणे धरणातून तीनशे दशलक्ष घनफूट असे एकूण ४६०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मागितले होते; मात्र जिल्हाधिकाºयांनी विविध शंका उपस्थित केल्या होत्या आणि इतक्या पाणी आरक्षणाची गरज काय तसेच महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना इतके पाणी आरक्षण मागितल्याची माहिती आहे काय? अशी विचारणा केली होती. त्यातच मराठवाड्याला पाणी सोडण्याची तयारी सुरू झाल्याने नाशिककर नागरिक आपल्या हक्काच्या पाणी आरक्षणाची भाषा करू लागले होते. विशेषत: गंगापूर धरणावर शहरातील ८० ते ८५ टक्के भागाला पाणीपुरवठा होत असल्याने गंगापूरऐवजी दारणा किंवा मुकणे धरणातून मराठवाड्यातील जायकवाडीसाठी पाणी सोडा असा आग्रह धरला जात होता. अखेरीस जिल्हा प्रशासन आणि शासनाने पाण्याचे फेरआरक्षण करताना महापालिकेच्या मागणीत फेरबदल केला असून, गंगापूर धरण समूहातून ४३०० दशलक्ष लिटर्स पाणी मागितले असताना त्यात शंभर दशलक्ष घनफूट कपात करून ४२०० दशलक्ष घनफूट पाणी दिले. तर दारणा धरणातून तीनशेऐवजी चारशे दशलक्ष घनफूट पाणी दिले असून, मुकणे धरणातून मागणीप्रमाणेच तीनशे असे एकूण ४ हजार ९०० दशलक्ष घनफूट आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे मराठवाड्यास पाणी सोडले तरी शहराच्या पाणीपुरवठ्यावर फार परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे जलसंपदामंत्र्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.राजकीय आंदोलनाचा परिणाममराठवाड्यासाठी नाशिकमधून पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतल्यानंतर नाशिकमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. राजकीय पक्षांनी नाशिकच्या हक्काचे पाणी सोडले जात असल्याने अपयशाचे खापर भाजपा सरकारवर फोडल्याने त्याचा अनुकूल परिणाम झाल्याचे दिसत आहे.महासभेचाही दणकामहापालिकेच्या २६ आॅक्टोबर रोजी झालेल्या महासभेत पाणी आरक्षणाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी सत्तारूढ भाजपाने यासंदर्भात पाणी आरक्षण कमी पडणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर सोपविली होती. त्याचाही अनुकूल परिणाम झाला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी