शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

धोका पत्करून परप्रांतीयांचा ‘जय महाराष्ट्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 00:45 IST

नाशिक : मुंबईसह अन्य भागांतून पायपीट करीत मूळ गावी जाणाऱ्यांना ट्रकचालकांनी हात दिला आणि शनिवारी (दि.९) हजारो परप्रांतीयांनी त्यातून प्रवास करीत महाराष्ट्र’चा निरोप घेतला. अर्थात, ट्रकमध्ये आणि टपावर बसून अत्यंत धोकादायक प्रवास सुरू असताना पोलिसांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले.

नाशिक : मुंबईसह अन्य भागांतून पायपीट करीत मूळ गावी जाणाऱ्यांना ट्रकचालकांनी हात दिला आणि शनिवारी (दि.९) हजारो परप्रांतीयांनी त्यातून प्रवास करीत महाराष्ट्र’चा निरोप घेतला. अर्थात, ट्रकमध्ये आणि टपावर बसून अत्यंत धोकादायक प्रवास सुरू असताना पोलिसांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. त्यातच कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी फिजिकल डिस्टन्सिंग आवश्यक असतानादेखील त्याकडे दुर्लक्ष करून एकाच ट्रकमध्ये खच्चून सर्व जण बसून प्रवास करीत होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग गावागावात पोहोचण्याची भीती आहे.  लॉकडाउन आणि संचारबंदी वाढत गेली आणि ती वाढण्याची शक्यता अधिक असल्याने रोजगाराची चिंता तर आहेच, परंतु कोरोनामुळे आता घराकडे जाण्याची ओढ वाढली आहे. मात्र गावाकडे जाण्यासाठी बस आणि रेल्वे अशी कोणतीही साधने नसल्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, शहापूर याभागातून शेकडो परप्रांतीय नागरिक पायपीट करीत जात आहेत. उन्हा तान्हात लेकराबाळांसह जत्थ्याने जाणारे हे नागरिक नाशिकमार्गे जाताना दुपारी काही वेळ सावलीत विश्रांती घेतात आणि परत गावाकडे जातात, तर काहीजण रणरणत्या उन्हात जाण्याऐवजी रात्रीच्या वेळी प्रवास करतात. सुरुवातीला पोलिसांनी त्यांना अडविले मात्र आता सर्रास ते गावाकडे जात असतात. औरंगाबाद येथील रेल्वे ट्रॅकवर झोपलेल्या मजुरांचा मृत्यू झाल्यानंतर तर आता यंत्रणा अशा धोकादायक प्रवासापेक्षा सरळमार्गाने गावी जात असतील तर बरे अशा भूमिकेप्रत आली आहे. शनिवारी (दि.९) त्याचे प्रत्यंतर आले.मुंबईकडून भल्या पहाटे रिक्षा आणि सायकल तसेच पायपीट करीत निघालेले मजूर इगतपुरीपर्यंत येत असताना अक्षरक्ष: वाहतूक ठप्प झाली होती. मुंबईकडून येणारी अनेक वाहने त्या लोंढ्यांमुळे अडकली, तर दुसरीकडे या नागरिकांनी मालट्रकने प्रवास करण्याची तयारी दर्शविल्यानंतर पोलिसांनी त्यांना अडथळे आणले नाही.मालट्रकच्या टपावर आणि मागेदेखील अत्यंत कोंबून बसलेले हे नागरिक धोकादायक पद्धतीने प्रवास करीत होते. त्यात मास्क तर कोणाकडे नव्हतेच, शिवाय फिजिकल डिस्टन्सिंग नव्हते. काही जण तर टपावर बसून प्रवास करीत होते. त्यामुळे अत्यंत धोकादायक चित्र होते. नाशिक शहरात द्वारका भागातदेखील सर्रास ट्रकमध्ये बसवून नागरिकांना नेले जात होते.--------परप्रांतीय सुसाट, निवारागृह रितेलॉकडाउननंतर जिल्ह्याच्या सीमासिल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर जिल्ह्यात आणि शहरात येणाºया मजुरांना पकडून निवारागृहात पाठविले जात होते. परंतु सुमारे दोन हजार इतकी संख्या झाल्यानंतर पोलिसांनी मजुरांना अडविले नाही की जिल्हा प्रशासनाने त्यांना निवारागृहात घेतलेले नाही.

टॅग्स :Nashikनाशिक