शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

एल्गार मेळाव्यात आरक्षणाचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 18:23 IST

धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह कुठल्याच पक्षाचा विरोध नाही मग आरक्षण देण्याला अडचण काय? आम्हाला आरक्षणाचे राजकारण करायचे नाही. मात्र आरक्षणाच्या लढाईत आड येणाºया सरकारला हद्दपार केल्याशिवाय समाजबांधव स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा समाजाचे ज्येष्ठ नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला. मनमाड येथे धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने आयोजीत एल्गार महामेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

ठळक मुद्देमनमाड : धनगर समाज कृती समाजातर्फे महामेळावा

मनमाड : धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह कुठल्याच पक्षाचा विरोध नाही मग आरक्षण देण्याला अडचण काय? आम्हाला आरक्षणाचे राजकारण करायचे नाही. मात्र आरक्षणाच्या लढाईत आड येणाºया सरकारला हद्दपार केल्याशिवाय समाजबांधव स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा समाजाचे ज्येष्ठ नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला. मनमाड येथे धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने आयोजीत एल्गार महामेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.राज्यातील धनगर समाज अनुसूचित जमातीला मिळणाºया आरक्षणाच्या सवलतींपासून वंचित असून, या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनमाड येथे उत्तर महाराष्टÑातील समाजबांधवांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अक्षदा माने, चैत्राली मार्कंड, साक्षी देवकाते या विद्यार्थींनींनी मनोगतातून मेळाव्याची भूमिका स्पष्ट केली. सभास्थानाच्या मार्गावर सर्वत्र पिवळे झेंडे व पताका लावण्यात आल्या होत्या. कालेलकर आयोगाच्या शिफारशीनुसार अनुसूचित जमातीच्या ३६ व्या क्रमाकांवर धनगर समाजाचाउल्लेख केला आहे. परंतु इंग्रजी उच्चारानुसार धनगरऐवजी धनगड असा उल्लेख केला गेला आणि आजही तो तसाच आहे. ज्यांच्या नावाने धनगरांचे आरक्षण दिले गेले नाही ते धनगड राज्यातच काय देशात कुठे अस्तित्वात नसल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले.मेळाव्याच्या यशस्वितेसाठी विजय हाके, राजाभाऊ खेमनार, राजेंद्र शेळके, गंगाधर बिडगर, साईनाथ गिडगे, मच्छिंद्र बिडगर, यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मच्छिंद्र बिडगर यांनी केले.मंत्रालयावर मोर्चासरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवला आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी मंत्रालय पेटवण्याची वाट पाहाताय की काय, असा परखड सवाल उत्तमराव जानकर यांनी सरकारला विचारला. धनगर आरक्षणावर एकही आमदार विधानसभेत तोंड उघडत नाही. धनगर समाजात सरकारचा पराभव करण्याची ताकद असून, येणाºया निवडणुकीत हे सरकार गाडून टाका, असे अवाहन जानकर यांनी समाजबांधवांना केले.गोपीचंद पडाळकर यांनी भाषणातून सरकारवर टीकेची झोड उठवली. आजपर्यंत प्रत्येक सरकारने धनगर समाजाचा फक्तवापर करून घेतला आहे. या सरकारचा निषेध करण्यासाठी जानेवारीत महाड येथील चवदार तळ्यापासून मुंबई मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. आरक्षणाचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याने त्यांनी लक्ष घालून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. समाज बांधवांना आरक्षण देण्याबरोबरच योग्य प्रमाणात सत्तेतसुद्धा वाटा मिळाला पाहिजे यासाठी युवावर्गाने राजकारणात या असे अवाहन पडळकर यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिकreservationआरक्षण