शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

एल्गार मेळाव्यात आरक्षणाचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 18:23 IST

धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह कुठल्याच पक्षाचा विरोध नाही मग आरक्षण देण्याला अडचण काय? आम्हाला आरक्षणाचे राजकारण करायचे नाही. मात्र आरक्षणाच्या लढाईत आड येणाºया सरकारला हद्दपार केल्याशिवाय समाजबांधव स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा समाजाचे ज्येष्ठ नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला. मनमाड येथे धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने आयोजीत एल्गार महामेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

ठळक मुद्देमनमाड : धनगर समाज कृती समाजातर्फे महामेळावा

मनमाड : धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह कुठल्याच पक्षाचा विरोध नाही मग आरक्षण देण्याला अडचण काय? आम्हाला आरक्षणाचे राजकारण करायचे नाही. मात्र आरक्षणाच्या लढाईत आड येणाºया सरकारला हद्दपार केल्याशिवाय समाजबांधव स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा समाजाचे ज्येष्ठ नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला. मनमाड येथे धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने आयोजीत एल्गार महामेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.राज्यातील धनगर समाज अनुसूचित जमातीला मिळणाºया आरक्षणाच्या सवलतींपासून वंचित असून, या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनमाड येथे उत्तर महाराष्टÑातील समाजबांधवांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अक्षदा माने, चैत्राली मार्कंड, साक्षी देवकाते या विद्यार्थींनींनी मनोगतातून मेळाव्याची भूमिका स्पष्ट केली. सभास्थानाच्या मार्गावर सर्वत्र पिवळे झेंडे व पताका लावण्यात आल्या होत्या. कालेलकर आयोगाच्या शिफारशीनुसार अनुसूचित जमातीच्या ३६ व्या क्रमाकांवर धनगर समाजाचाउल्लेख केला आहे. परंतु इंग्रजी उच्चारानुसार धनगरऐवजी धनगड असा उल्लेख केला गेला आणि आजही तो तसाच आहे. ज्यांच्या नावाने धनगरांचे आरक्षण दिले गेले नाही ते धनगड राज्यातच काय देशात कुठे अस्तित्वात नसल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले.मेळाव्याच्या यशस्वितेसाठी विजय हाके, राजाभाऊ खेमनार, राजेंद्र शेळके, गंगाधर बिडगर, साईनाथ गिडगे, मच्छिंद्र बिडगर, यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मच्छिंद्र बिडगर यांनी केले.मंत्रालयावर मोर्चासरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवला आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी मंत्रालय पेटवण्याची वाट पाहाताय की काय, असा परखड सवाल उत्तमराव जानकर यांनी सरकारला विचारला. धनगर आरक्षणावर एकही आमदार विधानसभेत तोंड उघडत नाही. धनगर समाजात सरकारचा पराभव करण्याची ताकद असून, येणाºया निवडणुकीत हे सरकार गाडून टाका, असे अवाहन जानकर यांनी समाजबांधवांना केले.गोपीचंद पडाळकर यांनी भाषणातून सरकारवर टीकेची झोड उठवली. आजपर्यंत प्रत्येक सरकारने धनगर समाजाचा फक्तवापर करून घेतला आहे. या सरकारचा निषेध करण्यासाठी जानेवारीत महाड येथील चवदार तळ्यापासून मुंबई मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. आरक्षणाचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याने त्यांनी लक्ष घालून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. समाज बांधवांना आरक्षण देण्याबरोबरच योग्य प्रमाणात सत्तेतसुद्धा वाटा मिळाला पाहिजे यासाठी युवावर्गाने राजकारणात या असे अवाहन पडळकर यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिकreservationआरक्षण