शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

एल्गार मेळाव्यात आरक्षणाचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 18:23 IST

धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह कुठल्याच पक्षाचा विरोध नाही मग आरक्षण देण्याला अडचण काय? आम्हाला आरक्षणाचे राजकारण करायचे नाही. मात्र आरक्षणाच्या लढाईत आड येणाºया सरकारला हद्दपार केल्याशिवाय समाजबांधव स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा समाजाचे ज्येष्ठ नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला. मनमाड येथे धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने आयोजीत एल्गार महामेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

ठळक मुद्देमनमाड : धनगर समाज कृती समाजातर्फे महामेळावा

मनमाड : धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह कुठल्याच पक्षाचा विरोध नाही मग आरक्षण देण्याला अडचण काय? आम्हाला आरक्षणाचे राजकारण करायचे नाही. मात्र आरक्षणाच्या लढाईत आड येणाºया सरकारला हद्दपार केल्याशिवाय समाजबांधव स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा समाजाचे ज्येष्ठ नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला. मनमाड येथे धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने आयोजीत एल्गार महामेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.राज्यातील धनगर समाज अनुसूचित जमातीला मिळणाºया आरक्षणाच्या सवलतींपासून वंचित असून, या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनमाड येथे उत्तर महाराष्टÑातील समाजबांधवांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अक्षदा माने, चैत्राली मार्कंड, साक्षी देवकाते या विद्यार्थींनींनी मनोगतातून मेळाव्याची भूमिका स्पष्ट केली. सभास्थानाच्या मार्गावर सर्वत्र पिवळे झेंडे व पताका लावण्यात आल्या होत्या. कालेलकर आयोगाच्या शिफारशीनुसार अनुसूचित जमातीच्या ३६ व्या क्रमाकांवर धनगर समाजाचाउल्लेख केला आहे. परंतु इंग्रजी उच्चारानुसार धनगरऐवजी धनगड असा उल्लेख केला गेला आणि आजही तो तसाच आहे. ज्यांच्या नावाने धनगरांचे आरक्षण दिले गेले नाही ते धनगड राज्यातच काय देशात कुठे अस्तित्वात नसल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले.मेळाव्याच्या यशस्वितेसाठी विजय हाके, राजाभाऊ खेमनार, राजेंद्र शेळके, गंगाधर बिडगर, साईनाथ गिडगे, मच्छिंद्र बिडगर, यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मच्छिंद्र बिडगर यांनी केले.मंत्रालयावर मोर्चासरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवला आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी मंत्रालय पेटवण्याची वाट पाहाताय की काय, असा परखड सवाल उत्तमराव जानकर यांनी सरकारला विचारला. धनगर आरक्षणावर एकही आमदार विधानसभेत तोंड उघडत नाही. धनगर समाजात सरकारचा पराभव करण्याची ताकद असून, येणाºया निवडणुकीत हे सरकार गाडून टाका, असे अवाहन जानकर यांनी समाजबांधवांना केले.गोपीचंद पडाळकर यांनी भाषणातून सरकारवर टीकेची झोड उठवली. आजपर्यंत प्रत्येक सरकारने धनगर समाजाचा फक्तवापर करून घेतला आहे. या सरकारचा निषेध करण्यासाठी जानेवारीत महाड येथील चवदार तळ्यापासून मुंबई मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. आरक्षणाचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याने त्यांनी लक्ष घालून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. समाज बांधवांना आरक्षण देण्याबरोबरच योग्य प्रमाणात सत्तेतसुद्धा वाटा मिळाला पाहिजे यासाठी युवावर्गाने राजकारणात या असे अवाहन पडळकर यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिकreservationआरक्षण