शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

हल्ली सच्चा माणूस मिळणे कठीण :  तात्याराव लहाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 01:29 IST

सामाजिक जीवनात काम करताना सहजासहजी लोकमान्यता मिळत नाही, अशा परिस्थितीत कामाचा ध्यास आणि अविरत सेवा केल्यानंतरच खरी ओळख मिळते. बाळासाहेब गामणे यांनी गेली ५० वर्षे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या सेवेमुळे त्यांनी आपले स्थान निर्माण केल्याचे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले.

नाशिक : सामाजिक जीवनात काम करताना सहजासहजी लोकमान्यता मिळत नाही, अशा परिस्थितीत कामाचा ध्यास आणि अविरत सेवा केल्यानंतरच खरी ओळख मिळते. बाळासाहेब गामणे यांनी गेली ५० वर्षे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या सेवेमुळे त्यांनी आपले स्थान निर्माण केल्याचे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले. नागरी सत्कार समितीच्या वतीने बाळासाहेब गामणे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी लहाने बोेलत होते. श्रद्धा लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी प.पू. महामंडलेश्वर श्रीश्री शांतिगिरी महाराज, महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार जयवंत जाधव, बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, सुधीर तांबे, राजाभाऊ वाजे आदी उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बाळासाहेब गामणे, मीरा गामणे यांचा मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तात्याराव लहाने म्हणाले, ३५ वर्षेे मी डोळंवर निष्ठा ठेवून काम केल्यानंतर डॉक्टर म्हणून मला ओळख मिळाली. त्याप्रमाणे बाळासाहेब गामणे यांनी वयाच्या ५० वर्षांपर्यंत समाजासाठी केलेले काम आणि दिलेले योगदान यामुळे त्यांना लोकमित्र म्हणून ओळख मिळाली. राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळेच या क्षेत्रातील मान्यवर येथे मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. आधुनिक काळात सच्चा माणूस मिळणे कठीण आहे. अशा स्थितीत बाळासाहेब गामणे यांच्यासारख्या सच्चा माणसाचा हा सत्कार नवीन पिढीसाठी आदर्श असल्याचे तात्याराव म्हणाले.  याप्रसंगी सरपंच पोपटराव पवार, जि.प. अध्यक्ष शीतल सांगळे, शाहू खैरे, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, प्रकाश आंधळे यांनी विचार मांडले प्रास्ताविक शिवाजी मानकर यांनी केले. व्ही.एन. नाईक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी आभार मानले. यावेळी सत्कार समितीचे अध्यक्ष राधाकिसन चांडक, डॉ. डी.एल. कराड, आदिवासी आयुक्त अर्जुन कुलकर्णी, व्ही.एन. संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, माजी मंत्री शोभा बच्छाव, पंढरीनाथ थोरे, माधवराव पाटील, नितीन भोसले, पुंजाभाऊ सांगळे आदी उपस्थित होते. गावापासून ते मंत्रालयापर्यंत सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या व्यक्ती निवडून आल्यास प्रत्येक गाव स्वावलंबी होईल. राजकारण फक्त निवडणुकांपर्यंत मर्यादित असावे. प्रत्येक शहरामध्ये ६० टक्के झोपडपट्ट्या वसल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण किंवा शहरी भागात पर्यावरण, पाणी, स्वच्छता आणि व्यसनमुक्ती यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत. या स्वरूपाचे कार्य गामणे यांनी उभे केले आहे़ - पोपटराव पवार, सरपंच, हिवरगाव

टॅग्स :Nashikनाशिक