शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

हल्ली सच्चा माणूस मिळणे कठीण :  तात्याराव लहाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 01:29 IST

सामाजिक जीवनात काम करताना सहजासहजी लोकमान्यता मिळत नाही, अशा परिस्थितीत कामाचा ध्यास आणि अविरत सेवा केल्यानंतरच खरी ओळख मिळते. बाळासाहेब गामणे यांनी गेली ५० वर्षे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या सेवेमुळे त्यांनी आपले स्थान निर्माण केल्याचे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले.

नाशिक : सामाजिक जीवनात काम करताना सहजासहजी लोकमान्यता मिळत नाही, अशा परिस्थितीत कामाचा ध्यास आणि अविरत सेवा केल्यानंतरच खरी ओळख मिळते. बाळासाहेब गामणे यांनी गेली ५० वर्षे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या सेवेमुळे त्यांनी आपले स्थान निर्माण केल्याचे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले. नागरी सत्कार समितीच्या वतीने बाळासाहेब गामणे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी लहाने बोेलत होते. श्रद्धा लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी प.पू. महामंडलेश्वर श्रीश्री शांतिगिरी महाराज, महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार जयवंत जाधव, बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, सुधीर तांबे, राजाभाऊ वाजे आदी उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बाळासाहेब गामणे, मीरा गामणे यांचा मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तात्याराव लहाने म्हणाले, ३५ वर्षेे मी डोळंवर निष्ठा ठेवून काम केल्यानंतर डॉक्टर म्हणून मला ओळख मिळाली. त्याप्रमाणे बाळासाहेब गामणे यांनी वयाच्या ५० वर्षांपर्यंत समाजासाठी केलेले काम आणि दिलेले योगदान यामुळे त्यांना लोकमित्र म्हणून ओळख मिळाली. राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळेच या क्षेत्रातील मान्यवर येथे मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. आधुनिक काळात सच्चा माणूस मिळणे कठीण आहे. अशा स्थितीत बाळासाहेब गामणे यांच्यासारख्या सच्चा माणसाचा हा सत्कार नवीन पिढीसाठी आदर्श असल्याचे तात्याराव म्हणाले.  याप्रसंगी सरपंच पोपटराव पवार, जि.प. अध्यक्ष शीतल सांगळे, शाहू खैरे, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, प्रकाश आंधळे यांनी विचार मांडले प्रास्ताविक शिवाजी मानकर यांनी केले. व्ही.एन. नाईक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी आभार मानले. यावेळी सत्कार समितीचे अध्यक्ष राधाकिसन चांडक, डॉ. डी.एल. कराड, आदिवासी आयुक्त अर्जुन कुलकर्णी, व्ही.एन. संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, माजी मंत्री शोभा बच्छाव, पंढरीनाथ थोरे, माधवराव पाटील, नितीन भोसले, पुंजाभाऊ सांगळे आदी उपस्थित होते. गावापासून ते मंत्रालयापर्यंत सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या व्यक्ती निवडून आल्यास प्रत्येक गाव स्वावलंबी होईल. राजकारण फक्त निवडणुकांपर्यंत मर्यादित असावे. प्रत्येक शहरामध्ये ६० टक्के झोपडपट्ट्या वसल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण किंवा शहरी भागात पर्यावरण, पाणी, स्वच्छता आणि व्यसनमुक्ती यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत. या स्वरूपाचे कार्य गामणे यांनी उभे केले आहे़ - पोपटराव पवार, सरपंच, हिवरगाव

टॅग्स :Nashikनाशिक