शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

एकलहरे रोडवर महिनाभरापासून अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:27 AM

येथील वीज केंद्रापासून सिन्नर फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. किर्लोस्कर कंपनीजवळील रस्त्यावर वीजतारा तुटून पडल्याने गेल्या महिनाभरापासून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या वीजतारा त्वरित दुरु स्त करून बंद असलेले पथदीप सुरू करावेत, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

एकलहरे : येथील वीज केंद्रापासून सिन्नर फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. किर्लोस्कर कंपनीजवळील रस्त्यावर वीजतारा तुटून पडल्याने गेल्या महिनाभरापासून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या वीजतारा त्वरित दुरु स्त करून बंद असलेले पथदीप सुरू करावेत, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.येथील एकलहरे वीज केंद्रापासून किर्लोस्कर टेकडीपर्यंत महानिर्मिती कंपनीने पथदीपांची व्यवस्था केलेली आहे. किर्लोस्कर टेकडीपासून पुढे सिन्नर फाट्यापर्यंत महानगरपालिकेने पथदीप बसविले आहेत. मात्र हे पथदीप गेल्या महिनाभरापासून बंद असल्याने किर्लोस्कर टेकडी ते गवळीबाबा मंदिरापर्यंत अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. याच रस्त्यावर किर्लोस्कर कंपनीचा कारखाना आहे. तेथे चौकीदार रात्रं-दिवस पहारा देत असल्याने कंपनीच्या आतल्या भागात दिवे आहेत. मात्र मुख्य रहदारीच्या रस्त्यावर अंधार असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. रेल्वे ट्रॅक्शनच्या पुढे गवळीबाबा मंदिरापासून किर्लोस्कर टेकडीपर्यंतचा हा रस्ता आधीच निर्जन आहे.अंधाराचा गैरफायदा घेऊन या रस्त्यावर अनेक गैरप्रकार व लुटमारीचे प्रसंगही घडले आहेत.सायंकाळनंतर या रस्त्यावर प्रेमीयुगुलांचा वावर वाढतो. अनेकदा गैरप्रकारही नागरिकांनी पाहिले आहेत. अंधाराचा फायदा घेत अनेकदा या रस्त्याच्या कडेला मेलेली जनावरे आणून टाकली जातात. रस्त्याच्या कडेला धनदाट झाडी असल्याने सापांचे प्रमाणही वाढले आहे. रात्री-बेरात्री वाहनधारकांना सापांचे दर्शन झाले आहे. गेल्याच आठवड्यात किर्लोस्कर कंपनीच्या चौकीदाराला बिबट्याचे रात्री साडेआठच्या सुमारास दर्शन झाले. त्याचवेळी एकलहरेकडे जाणाऱ्या रिक्षावाल्यालाही बिबट्या रस्ता ओलांडताना दिसला. त्यामुळे रिक्षा पुढे नेण्यास त्याने हिंमत केली नाही. बिबट्या किर्लोस्कर टेकडीच्या जंगलात दिसेनासा झाल्यावर रिक्षा पुढे नेली.वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणीया रस्त्यावरील अंधाराचा फायदा घेत अनेकदा छोट्या-मोठ्या रस्ता लुटीच्या व चोरीच्या घटनाही घडल्या आहेत. गेल्या महिनाभरापूर्वी जोरदार पावसाने विजेच्या तारांवर झाड उन्मळून पडल्याने तारा तुटून लोंबकळत होत्या. तेव्हापासून सुमारे महिना-दीड महिन्याच्या कालावधीत कोणीही दुरुस्तीच्या कामाकडे लक्ष दिले नाही, असे नागरिक सांगतात.महानगरपालिका विद्युत विभागाने एकलहरे रस्त्यावरील गवळीबाबा मंदिरापासून किर्लोस्कर टेकडीपर्यंतच्या तुटलेल्या विजेच्या तारा दुरु स्त करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :electricityवीजNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका